Posts

Showing posts from May, 2024

वक्त्याची भूमिका - स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे

  वक्त्याची भूमिका                स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे.               स्वाध्याय करणे आणि कथा कीर्तन ऐकण्यात फरक आहे. लहानपणी कथा ऐकल्याने माणूस कार्यासाठी उद्युक्त होत असेल म्हणजे तत्पर होत असेल पण भक्ती क्षेत्रात नारदाने लिहिले आहे तसे न ते राजपरितोषात् क्षुधा शान्तिर्वा || नारद म्हणतात की केवळ ऐकल्याने किंवा क्षुधाशांति होत नाही. ध्रुवाची गोष्ट ऐकल्याने ध्रुवपद नाही मिळत किंवा सुदाम्याच्या गोष्टी ऐकून सुदामपुरी नाही मिळत. म्हणून स्वाध्याय हा कथा, अख्यान, व्याख्यान यापेक्षा वेगळाच आहे.              कथा किंवा अख्यान श्रोत्यांना रोचक वाटतात, चांगले वाटतात. त्यांना आवडतील अशा एक दोन गोष्टी वक्त्याने सांगितल्या की आबालवृद्ध सर्व आकर्षित होतात. पण त्यात वक्त्याची भूमिका श्रोत्यांना संतुष्ट करण्याची असते. कारण श्रोते संतुष्ट होण्यावर, खुश होऊन जाण्यावर त्याची जीविका आधारित असते.   ...

वेदत्रैयी

 वेदत्रैयी             वेदत्रैयी माणसाला दैवी, उच्च आणि सुखी बनवते. आज माणसाकडे सुख, दैवी जीवन, तेजस्विता, आनंद नसेल तर त्यांचे एकमेव कारण वेदांची उपेक्षा. दोनशे पाचशे वर्ष नाही तर दहा दहा हजार वर्षांपासून या भारत देशातल्या लोकांनी वेदांची उपेक्षा केली आहे! वेदांची हत्या ही ब्रह्म हत्या आहे. हे फार मोठे पाप आहे. ते जाणून बुजून केले आहे असे मी म्हणत नाही, अजाणताही केले असेल. ऋग्वेदात कित्येक सुंदर वर्णाने आहेत. सूर्योदय- सूर्यास्तकालीन वर्णन, उषाकाळाचे वर्णन फार सुंदर आहे. आजचे साहित्यिक ही वेदांतील ते वर्णन वाचून उडवून दिला. ऋग्वेद , यजुर्वेद आणि सामवेद मानवी जीवनात आले पाहिजेत.         रावणाशी रामाचा विरोध एवढ्या साठीच होता की रावणाने वेदांची उपेक्षा केली होती. रावणाने वेदांना स्वर दिले आहेत, वेदांचे रक्षण केले आहे. पण त्याचा वेदांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की वेदांमध्ये काही थोडे बहुत चांगले लिहिले आहे ते साहित्याच्या दृष्टीने चांगले आहे, पण हा काही माझा जीवन विकास करणारा महान ग्रंथ नाही.           ...

एक सुंदर पत्र - आईने आपल्या लग्नाला आलेल्या मुलीला लिहिलेले

Image
एक सुंदर पत्र लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा,           सध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे.. नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात. अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेले आहे. आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे..        त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेकीला पत्र             प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद .       लेक लाडकी माहेरची होणार सुन तु सासरची यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी. कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्...

माहेर

.        माहेर             जीवनाच्या संध्याकाळी स्वतःच्या घरी जाण्याची तयारी केली पाहिजे. कसेही अtसले तरी आपले घर ते आपले घर. माहेर ते माहेर. स्त्रीला स्वतःच्या माहेरी जाताना केवढा आनंद होतो! साठ वर्षाची म्हातारी असली, सगळे केस पिकलेले असले, माहेरी आता काही राहिले नसले, सारे साफ झाले असले तरीही माहेरच्या गावी जायचे असले की ती आजारी असली तरी पटकन उभी राहते. तिला माहेरच्या गावी जायचे सुख वाटते तिला वाटते, की हे माझ्या वडिलांचे घर आहे त्यामुळे तिला माहेरी जाण्याची ओढ असते.            माणसाला परलोकात जाण्याचीही अशी उत्सुकता वाटली पाहिजे. तिथे जाण्याचे भय काढून टाकले पाहिजे. आपले विशिष्ट प्रकारचे जीवन असले तर भय निघून जाते. दुसऱ्याच्या घरात सर्व सुखसोयी असल्या तरी स्वतःचे घर ते स्वतःचे घर. जीवनाच्या संध्याकाळी माणसाने शांतपणे परलोकाचा विचार केला पाहिजे. त्यात भिण्याचे काही कारण नाही. भ्यायल्याने काही परलोके जाण्याचे टळू शकत नाही, ही गोष्ट पक्की आहे. आपले शास्त्रकार म्हणतात की तु भितोस कशाला? अरे मुला! तू भिऊ नकोस...

लौकिक परिवार - निजधामाचे आकर्षण

निजधामाचे आकर्षण               संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले की सर्वजण ऑफिस मधून जातात. ऑफिसमध्ये पाच मिनिटे आधीच माणूस तोंड धुऊन, कोट घालू लागतो. माझ्यासारखा कोणी विचारतो की 'अजून पाच मिनिटे वेळ आहे एवढी घाई कशासाठी?' तर म्हणतो नंतर एक मिनिटही बसायचं नाही म्हणून आधीपासूनच जाण्याची तयारी करायची.' याचा अर्थ हा की प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते.                मला माझ्या निजधामाचे आकर्षण आहे कारण तिथे प्रेमळ व्यक्ती माझी वाट पाहत बसली आहे असे वाटते. माणसाने घरी कोणाशी करार केलेला नसतो की संध्याकाळी सहा वाजता मी घरी येईन. घरात पत्नी पण कागदावर तसे लिहून घेत नाही. दोघांनाही खात्री आहे की संध्याकाळी घरी भेटायचं आहे.                 संध्याकाळी सागर किनारी बसलात तर पक्षांचे थवे उत्सुकतेने स्वतःच्या घरी जाताना दिसतात. जीवणाच्या संध्याकाळी घरी जाण्याची अशी उत्सुकता असली पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या घरी जाण्याचे उत्सुकता वाटत नाही. आपल्याला भीती वाटते की दुसऱ्याच्या घरी गेल...

अव्यक्त धाम - स्वतःच्या घराची ओढ असावी

Image
परमधाम  स्वतःच्या घराची ओढ         एक गोष्ट निश्चित आहे की आपण असत् मधून आलेलो नाही, तर सत् मधून आलो आहोत. आपण 'होतो' आणि पुढे 'राहणार' या दोन गोष्टी नक्की झाल्या की मग मला दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जायचं आहे याचा पण माणसाने विचार केला पाहिजे. म्हणजेच पर लोकांचा विचार केला पाहिजे. परलोकांची गोष्ट करून आपलेन शास्त्रकार आपल्याला सांगतात की परका लोक समजू नकोस‌. परलोक म्हणजे ईश्वराचा लोक. परलोक म्हणजे निजधाम. व्यवहारातही कोणी मरण पावला की आपण म्हणतो आमका निजधामाला गेला; म्हणजे तो स्वतःच्या घरी गेला.         दुसऱ्या लोकात जायचं आहे तर त्याला पर लोक समजू नका, स्वतःचे घर समजा असे आपले शास्त्रकार सांगतात. तुम्ही त्याला स्वतःचे घर समजला तर तुम्हाला परकेपणा वाटणार नाही. परलोक हे माझे घर आहे. म्हणून माणसाला परलोक जाण्याची ओढ असली पाहिजे. संध्याकाळ झाली की प्रत्येक माणसाला स्वतःच्या घरी जाण्याची ओढ असते. आपण इतके अज्ञानात आहोत की आपल्याला तशी उत्कंठा वाटत नाही. याचा अर्थ माणसाने मरण्याची इच्छा करावी असे नाही, पण स्वतःच्या घराची ओढ प्रत्येकाला असावी.

तलवारीच्या धारे सारखे जीवन

Image
     तलवारीच्या धारे सारखे जीवन         ज्याला कीर्ती मिळवायची असते त्याला लोकांच्या हृदयात स्थान मिळत नाही. लोकांना सर्वत्र कीर्ती मिळते, त्यांचे नाव होते पण त्यांना लोक हृदयात स्थान मिळवत नाही.         मामाला मारले तर लोक मला काय बोलतील? मावशीला मारलं तर लोकांना काय वाटेल? असा विचार कृष्णाने केला नाही. मला लोकांचे मन सांभाळायचे आहे, जतन करायचे आहे, हा विचारच नाही. तलवारीच्या धारे सारखे जिवन जगला आहे, लोकांना प्रेमही देत गेला आहे. कृष्ण पूर्णावतार आहे. त्याच्या तोला मोलाची त्याच्या बरोबरीने उभे राहील अशी व्यक्ती एकही सापडत नाही.         लोकांचे मन सांभाळणारे लोक बघायला मिळतात, लोकांचे मन जपत, कुरवाळत पुढे चालणारे लोक दिसतात पण कृष्णाने असा विचार केलेला दिसत नाही. ज्याचे मन तुटले आहे अशी माणसे पण त्याच्यावर सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करताना दिसतात.        कृष्ण लोकांचा हृदय सम्राट आहे, याला यश म्हणतात. माणसाचे नाव पुष्कळ ठिकाणी होते. आज पुष्कळ माणसांचे नाव होते पण त्यांनी दहा माणसात, दहा क...

इंद्र पूजा बंद करून गोवर्धन पूजा करण्याची नवी रुढी आणण्याचा श्रीकृष्णाचा प्रयत्न.

Image
मोठा लीडर...नन      श्रीकृष्णाने म्हटले,  'आजपासून इंद्र पूजा बंद, आता गोवर्धन पूजा करायची' रुढी तोडली. त्याबाबतीत त्याने कोणाचे मानले नाही. कृष्णाने असा Uविचार केला नाही की गोकुळच्या लोकांना काय वाटेल?      दहा दहा पिड्यापासून इंद्रपूजा चालत आली आहे असे हजारो लोक एकत्र गोळा झाले आहेत, आणि त्यांच्यासमोर कृष्णाने एक भाषण दिले आहे. कुणाला ठाऊक काय झाले? पण रूढीप्रमाणे चालणाऱ्या म्हाताऱ्या लोकांनी पण चटकन रूढी तोडून टाकली. इंद्रपूजा सोडून गोवर्धन पूजा सुरू केली! आज कितीही आवडत्या व्यक्तीने येऊन तुम्हाला सांगितले की दहा पिढ्यापासून चालत आलेला तुमचा व्यवहार बंद करा तर तुम्ही बंद कराल? तो वाटेल तेवढा मोठा लीडर असेल, त्याला कितीतरी मान मिळत असेल, लाखोच्या संख्येत त्याला लोक बघायला किंवा ऐकायला जात असतील. पण तो जर रूढी तोडण्याबाबत एखादी गोष्ट सांगू लागला तर लोक त्याचे ऐकणार नाहीत. क‌ष्णाने फक्त एक भाषण देवून ते काम करून दाखवले आहे. त्या वेळेचे गोकुळचे मोठमोठे शिकलेले लोक कृष्णा सारख्या नवीन रक्ताच्या मुलाचे भाषण ऐकून त्याच्यासमोर नमून पिढ्यानपिढ्या...

प्रेमाचा सम्राट - श्रीकृष्ण

Image
प्रेमाचा सम्राट                लोकांच्या हृदयात स्थान मिळते त्याला यश म्हणतात. कृष्णाला प्रेमाचा सम्राट म्हणतात. त्याला लोक हृदयाचा सम्राट म्हणतात. रामाला पण लोकोत्तर प्रेम मिळाले आहे पण रामाला प्रेमाचा सम्राट म्हणत नाहीत. रामाला लोकांनी खूप प्रेम दिले यात शंका नाही. रामाने लोकांना जपले आहे. लोकांचे मन सांभाळले आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे‌. कृष्ण स्वतःच्या विचारसरणीनुसार धावत राहिलेला दिसतो. कोणाला काय वाटेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही‌. कृष्णाचे जीवन तलवारीच्या दुहेरी धारे सारखे आहे. एखादी रुढी मोडली तर लोक माझ्याबद्दल काय बोलतील? असा विचार त्याने कधी केला नाही. मी खोट्या रुढी तोडल्या, म्हणून लोक मला अनैतिक म्हणतील तर? असे कृष्णाने पर्वा केली नाही‌. लोकांना काय वाटेल ते कृष्णाने कधी पाहिले नाही, त्याला जे योग्य वाटले तो ते करत गेला. तरीही लोक त्याला प्रेम देत गेले. लोक कृष्णाच्या प्रेमाने वेडे झाले आहेत म्हणून कृष्णाला प्रेमाचा सम्राट म्हणतात.

आध्यात्मिक पातक हे कश्यास समजले जाते

आध्यात्मिक पातक             काही आध्यात्मिक पातके आहेत. व्यक्तीने निरूत्साही राहणे , आकर्मण्य असणे, निष्प्रेम, भावशून्य आणि निस्तेज असणे ही सर्व आध्यात्मिक पातके आहेत. सामाजिक पातके शिक्षणाने नाहीशी होतात. पण आध्यात्मिक पातकांचा रंग असा पक्का बसतो की निघता निघत नाही. अध्यात्मिक विकासात काही पातके अडथळा आणतात. माणसाला कामावर जायला उत्साह असतो तेवढा उत्साह स्वाध्यायात जायला नसतो. आज मन लागत नव्हते म्हणून स्वाध्यायाला गेलो नाही. पण एका दिवशी कामावर जाण्याबाबत असे होते का ? मन लागत नसले तरी कामावर जातोच आणि जावे लागतेच, कामावर जाऊन बसतोच. म्हणजे माणसापाशी उत्साहा नाही असे नाही! असे एखादे तरी काम तुम्ही स्वीकारले आहे का, की ज्याचा आज तुम्हाला काहीही फायदा नाही? मेल्यावर फायदा होतो ती गोष्ट वेगळी. 'आज मला या कामाचा काही फायदा नाही तरीही निरंतर, सतत मी ते काम करतो.' असे म्हणू शकाल?  स तू दीर्घकालनैरन्तर्य सत्कारासेवितो दृढभूमी:|             या रीतीने काम करायला योगदर्शनकार सांगतात. माणूस नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो, गरबा प...

पातकी दुनियेचा कल आणि हेतू

पातकी            भगवान करुणामय, प्रेममय आणि शक्तीपूर्ण आहे. आपण केवढी पातके केली असतील! मानवाचा जन्म घेतला परंतु गाढवासारखे राहिलो. ऐंद्रिय सुखाच्या मागे गुलाम बनून धावत राहिलो. हे केवढे मोठे पातक आहे. कशा प्रकारे राहावे याची समज असली पाहिजे. मानवी शरीरात राहून काय करायचे हा विचारच ज्याने केला नाही, त्याला काय म्हणायचे? मानव बनून राहिला नाही‌. मानव ही भगवंताची अंतिम कलाकृती आहे तरीही त्याने ती ठुकरावली हे फारच मोठे पातक आहे.        आम्ही चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही म्हणजे आम्ही पातकी नाहीत असे आपण समजतो. चोरी करणे, व्यभिचार करणे त्यालाच आपण सामाजिक पातके समजतो; जे लोक ह्या गोष्टी करत नाही ते पातकी नाहीत अशी आपली समजूत आहे. वास्तुत: असे नाही. मिळालेल्या शरीराचा उपयोग केलास? मिळालेल्या बुद्धीचा उपयोग केलास? भगवंतासाठी शरीर आणि बुद्धीचा उपयोग केलास? स्वतःचे निपुणता भगवंताच्या पायी प्रामाणिकपणे वाहिलीस? भगवंताने दिलेले वित्त भगवंतासाठी वापरलेस? असा विचार कराल तेव्हा कळेल की पाप कशाला म्हणतात? अशी पातके केल्यावरही भगवान आपल्यावर करुणा...

सर्वव्यापी भगवंत - सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे

Image
  मेरा बाबा सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे           सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे हाच केवलाद्वैताचा सिद्धांत आहे. चराचरात प्रभुच भरलेला आहे. माझ्यात भगवंत आहे ही पहिली गोष्ट स्थिर झाल्यावर, मानव उत्तरोत्तर विकासाच्या मार्गाने वर वरच जाईल. तो दुर्गुणा बरोबर लढू शकेल, सदगुणांना उचलण्याचा प्रयत्न करेल. जसा माझ्यात राम आहे तसाच दुसऱ्यातही राम आहे, ही समज आल्यावर खरी नीती प्रस्थापित होईल. नीतीच्या मुळात भक्ती असली पाहिजे, उपयुक्तता नाही. उपयुक्ततेवर आधारित नीती असेल तर तिचा पाया कच्चा आहे असे समजून चला. प्रत्येक व्यक्तीत राम जागृत केला तर जीवन वेगळेच बनवून जाईल. दुसऱ्या व्यक्तीशी सबंध बांधण्यासाठी रामाचा सबंध उचलला तर संबंध पक्का बांधला जाईल. एवढ्यासाठीच आपले लोक म्हणतात की कलियुगात कीर्तन - रामकीर्तन करा. पण लोक असे समजले की हातात माळा घेऊन राम राम जपा. वास्तविक त्याचा अर्थ असा आहे की व्यक्ती - व्यक्तीत राम घेऊन जा, व्यक्ती - व्यक्तिच्या संबंधात राम घेऊन जा.        जशी मनूष्य सृष्टी आहे तशी पशु सृष्टी पण आहे. तिच्यामध्ये सुद्धा भगवंत पाहण्याचा ...

एकता - भगवंताच्या दारात असलेली एकता

एकता     दुसऱ्याबरोबर एकता कशी उभी राहील? स्वाध्यायात एकत्र होऊ तेव्हा किंवा मंदिरात एकत्र येऊ तेव्हा एकता उभी होईल. एवढ्यासाठी ऋषींनी मंदिर उभे केले. मानवात सबंध प्रस्थापित करण्यासाठी मंदिर दिले. एवढ्यासाठीच मंदिर होते. पण आज मंदिरात एक माणूस आठ वाजता येतो आणि दुसरा नऊ वाजता. बारा बारा वर्षापर्यंत दोघेही लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात दर्शनाला जातात पण त्यांनी एकमेकांचे तोंड पण पाहिलेले नसते. याला काय मंदिर म्हणायचे? आपण एका भगवंताची मुले आहोत म्हणून एकत्र बसू. जिथे स्वतःच्या मुलांना एकत्र बसलेले पाहून भगवंताला गुदगुल्या होतात ते मंदिर होय. स्वतःच्या मुलांना एकत्र बसलेले पाहून भगवंताला गुदगुल्या व्हायला पाहिजे.           गावात एक वृद्ध व्यक्ती असते. तिला चार मुले आहेत. एक इंजिनिअर आहे, त्याने डॉक्टरेट केले आहे, तो मुंबईचा मॅनेजर आहे. दुसरा अहमदाबादचा शेरीफ आहे. बाकीचे दोघेही गावी शेती करतात. ते दोघे जास्त शिकलेले नाहीत. एक चार इयत्ता शिकलेला आहे व दुसरा मॅट्रिक पर्यंत शिकलेला आहे. चौघे गावातल्या घरी एकत्र जमले आहेत. सगळे भाऊ एकत्र जेवायला बसले आहेत आणि आई...

उन्नत जिवन हे कसे पाहिले जाते ?

Image
         उन्नत जिवन               भगवंत सर्वत्र आहे असे उपनिषद् सांगत आहे. भगवंत माझ्यात आहे ही पहिली पायरी आहे. भगवंत दुसऱ्यात पण आहे ही दुसरी पायरी आहे. दुसऱ्या जवळ जायचं आहे, घ्यायचं काही नाही आणि द्यायची काही अभिलाषा पण नाही आणि देतो असा अहंकार पण नाही, तरी दुसऱ्याला भेटायचं आहे. भेटण्यासाठी काहीच कारण नाही तरी भेटायचं आहे, म्हणजेच भक्तीच्या दृष्टीने भेटायचे आहे. जो भगवान् माझ्यात आहे तोच भगवान् त्याच्यात पण आहे. म्हणून ज्याच्या जवळ जायचं आहे त्याची दृष्टी बदलायची आहे. त्याला समजवायचे आहे की दुःख, दैन्य, दारिद्र्याची मागणी मनात ठेवणे तुला शोभत नाही. माझ्यात भगवंत आहे, मग मी जर दिन बनलो तर ते मला शोभणार नाही आणि माझ्या आत बसलेल्या शक्तीला ते आवडणार नाही.            जीवनातून दुःख, दैन्य, दारिद्र्य कसे काढू? स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याने, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याने दुःखाची तीव्रता कमी होते, दैन्य निघून जाते. तुझ्याजवळ मोटार नाही, तुझ्याजवळ बंगला नाही असे सांगून सगळे आपल्य...

चित्त एकाग्रताचे रहस्य

Image
  चित्ताकाग्रतेचे रहस्य            भक्ती करायची म्हणजे भगवंताची स्तुती करायची असे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेले नाही. जो भगवंताची जास्त स्तुती करेल तो भगवंताला जास्त आवडेल असे नाही, आपल्या विकारांचे, वासनांचे उदात्तीकरण करायचे असेल तर चित्त एकाग्रते शिवाय ते शक्य नाही, सगुण उपासने शिवाय ते शक्य नाही. म्हणजे भक्ती शिवाय शक्य नाही. त्यात दुसरी कोणतीही भक्ती चालणार नाही. केवळ प्रार्थना करणे ही शास्त्रीय भक्ती नाही. संपूर्ण जगात प्रार्थना चालतात, कर्मकांडे चालतात, पण ते चित्त एकाग्रता नाही. त्यामुळे चित्तावर जे परिणाम व्हायला पाहिजे ते होत नाहीत. चर्चमध्ये जाणारे प्रार्थना करतात, काही कर्मकांड करतात. ते कदाचित बायबलचे उतारेही वाचतात, पण त्यांना चित्त एकाग्रतेची कल्पना नाही. तुम्ही आपल्या मंदिरात जाल तर मंदिरातही चित्त एकाग्रतेची कल्पना नाही. मंदिरवाल्यांना, मंदिर बांधणाऱ्यांना, मंदिर चालवणाऱ्यांना कोणालाही चित्र एकाग्रतेची कल्पना नाही.           ऋषिंनी जे मंदिर उभे केले त्यांच्या विचारांच्या बैठकी चित्त एकाग्रता आहे....

शास्त्रीय मूर्तीपूजा कशासाठी असावी ?

शास्त्रीय मूर्तीपूजा               कुणी विचारल तुमचा भगवंतात एकाग्र व्हायचा आग्रह का? त्यांना सांगा की ज्यात चित्तएकाग्र होते त्याचे गुण चित्तात येतात. पैशातच एकाग्र झालेला माणूस जडच होतो. त्याला सगळीकडे पैसाच दिसतो. बाप मेला तरी खर्च किती होईल असेच विचारणार. स्त्रीचे चिंतन करणारा स्रेणच होतो. एकाग्र होताना ज्याचे चिंतन करतो त्याचे परिणाम मनावर होत असल्याने सर्व गुणसंपन्न सर्व शक्तिमान सायुधं सशक्तीकं भगवंतात माणसाने चित्त एकाग्र केले तर त्याचा परिणाम चित्तावर होतो आणि दिवसेंदिवस चित्ताचे उन्नती करण होत जाते आणि माणसाचा जीवन विकास होतो.            जीवन विकास म्हणजे काय? आपले शरीर फुगले तर डॉक्टर म्हणतात कमी खा. ह्रदय मोठे झाले तरी तो रोग म्हणतात. मग जीवन विकास म्हणजे काय? चितात अमुक गुण आले तर त्याला जीवन विकास म्हणतात.           अदृश्य शक्ती-भगवंत आहे त्याचे आवाहन करा. चित्तएकाग्र करताना आपल्या समोर जी मूर्ती आहे ते साक्षात भगवंत आहे, दगडाची मूर्ती नाही. जगातले सर्वच गुण त्याच्यात भरलेले...

कठडा - दैनंदिन जीवनात असलेले बंधन किंवा मर्यादा.

कठडा           जीवन हे चिंतामुक्त असले पाहिजे. जीवनात भक्तीचा कठडा असेल तर तुम्ही जीवन सुखी कराल. जीवनात भक्तीचा कठडा असला पाहिजे.         भक्तीला सामाजिक बनवा. भक्तीच्या दृष्टीतून लोकांजवळ जा तर तूष्यन्ति च रमन्ति च जीवन बनेल. माणसाने नवीन घर घेतले असेल, अजून पूर्ण तयार झाले नसेल त्यावेळेस पती-पत्नी घर बघायला जातात. बाल्कनी मध्ये जायचं आहे पण भीती वाटते कारण कठडा अजून तयार झाला नाही. बिल्डर आपल्याला बाल्कनीत घेऊन जातो आणि म्हणतो, 'पहा, निसर्ग किती सुंदर दिसत आहे!' कठडा नसल्याने दोघे उभे राहूनच भीत भीत बघत असतात. पण त्यात आनंद नाही. जर त्या ठिकाणी एखादे लाकूड किंवा बांबू बांधलेला असेल तर निर्भयतेने दोघे बाहेरील निसर्गाचा सुंदर देखावा बघू शकतात. त्यांचा अनुभव आनंद अनुभवू शकतात कारण कठडा बांधलेला आहे. अशा रीतीने जीवनात भक्ती हा कठडा आहे. तो असेल तर तुम्ही जीवनात चिंतामुक्त अनुभव आनंद अनुभवू शकता.

भगवंताचे अस्तित्व.

Image
रडायचे कशाला?            आज लोक विविध प्रकारच्या दुःखाने दुःखी आहेत. सर्व म्हातारे तर फारच दुखी आहेत. कथाकारांनी जन्माचे एक घृणास्पद चित्र उभे केले आहे. नऊ महिने आईच्या पोटात, अंधार्या कोठडीत राहावे लागते.  पुनरपी जननं पुनरपी मरणं पुनरपि जनानी जठरे शयनम्|               परंतु जेव्हा भक्ती उभी राहते तेव्हा तसे वाटत नाही. माझ्याबरोबर माझा प्रभू आहे ही समज नसेल तर माणूस म्हणतो मला जन्म नको. आज मुक्तीच्या मागे पुष्कळ लोक लागले आहेत. सर्व लोक आईच्या पोटातून जन्माला आले आहेत. कोणी आकाशातून पडलेला नाही. कुणाला गर्भवासाचे दुःख आठवते ?तुम्हाला त्याचा अनुभव आहे का? तुमचे अनुमान आहे की दुःख आहे पण त्याचा अनुभव नाही. मग रडायचे कशाला? रडविणारा रडवतो आणि आपण रडू लागतो? भगवंता! मला जन्म पाहिजे जननी जननं यातु मम वै अशी दृष्टी श्रीमद् आद्य शंकराचार्य देतात.             काही लोकांना उपजीविकेचे दुःख आहे. भाकरी मिळेल की नाही? आज तर भाकरी मिळते आहे, उद्या मिळेल काय? आज माझी परिस्थिती चांगली आह...

स्व - प्रक्षेपण

Image
  प्रक्षेपण          सत्पुरुषरूपी तीर्थत स्नान केल्याने काय होते? यावर. सत्पुरुषरूपी उत्तरतात, आपल्यात भाव निर्माण होतो. या लोकांचा दिन-प्रतिदिन भगवंता वरचा दुर्दम्य विश्वास पाहून आणू मात्र तरी आपल्यातही विश्वास येऊ लागतो. जो दिसत नाही अशा भगवंतावरती विश्वास ठेवायचा ही सोपी गोष्ट नाही. ज्यांना भगवंता एकशेएक टक्के विश्वास निर्माण झाला आहे असे विश्वास युक्त जीवन पाहून, त्यांचे जीवन जवळून न्याहाळून, त्यांचा बनून, तोच विश्वास आणि तोच भाव आपल्यात संक्रात होण्याचा संभव आहे. जसा सूर्यप्रकाशाचे प्रक्षेपण करतो तसे हे लोक प्रेमाचे प्रक्षेपण करत असतात. ते               स्वीकारण्यासाठी आपले मशीन, आपली इंद्रिये तयार असली पाहिजेत. अशा प्रकारे इंद्रिये तयार करणे हाच अभ्यास आहे

सत्यभामा आणि नारद यांच्यात घडलेला संवाद

Image
भगवंताला पवित्र करणारे लोक              पुराणात एक गोष्ट आहे. एकदा देवर्षी नारद सत्यभामाला भेटण्यासाठी आले. त्यांनी बघितले तर सत्यभामा कसल्याशा चिंतेत पडलेली असावी असे वाटले. ते सत्यभामाला म्हणाले, असा कृष्णासारखा पती लाभला आहे आणि अशा विचारात काय पडलेल्या आहात आपण? सत्यभामा म्हणाली, 'काय सांगू तुम्हाला? या जन्मी तरी कृष्णा सारखा पती मिळाला पण पुढच्या जन्मी जर कोणाकडे छगनरावाशी संसार करण्याचा प्रसंग आला तर? येत्या जन्मी पण हाच पती लाभावा यासाठी कोणता उपाय असला तर सांगाल का?' नारद म्हणाले, तुमचे म्हणणे खरे आहे. या जन्मी असा तेजस्वी पती लाभला असेल आणि पुढील जन्मी कुणा फुकटरावा सोबत संसार करण्याची पाळी आली तर कठीणच प्रसंग म्हणावा लागेल.            परंतु शास्त्रात याला एक उपाय दाखवला आहे बरे का! सत्यभामा उदगारली, असे ! तर लगेच सांगा.' नारद पुढे म्हणाले ' शास्त्रात असे लिहिले आहे की तुम्हाला पुढील जन्मी जे हवे असेल त्याचे या जन्मात दान करून टाका. म्हणजे पुढील जन्मात तेच तुम्हाला मिळेल. तुम्हाला पुढच्या जन्मी हाच पती...

मैत्री

Image
  मैत्री              मला दुसरा पाहिजे, परंतु दुसऱ्याला मला सुख द्यायचा आहे की दुसऱ्याला माझ्या सुखाच्या साधन बनवायचा आहे? दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टि कोणती आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लोकसंग्रह खूप केला, पुष्कळ लोक गोळा केले. परंतु त्यांच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी कोणती त्याच्यावर स्नेहाचे मूल्य ठरते. स्नेहाची किंमत होणारच नाही पण त्याला मूल्य आहे. किंमत आणि मूल्य यांच्यात फरक आहे. एका परिवाराचे असणे, एका राष्ट्राचे असणे, राजनीतीत एका पक्षाचे असणे ह्या गोष्टी ऐक्य निर्माण करत नाहीत. त्याला ऐक्य म्हणायचे पण नाही. ऐक्यात एकमेकांसाठी तळमळ असली पाहिजे. आज आम्हाला चार पैसे पाहिजेत, त्यासाठी आम्ही एकत्र येतो. पण एकमेकांसाठी तळमळ नसते एकमेकांसाठी तळमळ कशी निर्माण होईल? केवळ एकत्र आल्याने तळमळ निर्माण होणार नाही. चौपाटीवर फिरण्यासाठी पुष्कळ लोक एकत्र येतात तसेच काही लोक स्वार्थ साधायला युनियन बनून एकत्र येतात पण ते एकत्र येतात. स्वार्थ साधण्यासाठीच जशी कामगारांची युनियन असते तसेच मालकांची युनियन , असोसिएशन असते. पण त्यात परस्पराबद्द...

स्नेह - आपल्या नात्यांमध्ये स्नेह हा कसा असला पाहिजे ?

Image
स्नेह         समजा, चार चोर हे एकमेकांचे मित्र झाले, तर काय करतील? जास्त चोरी करतील. त्यांच्या मैत्रीने समाजाचे सुद्धा नुकसान आणि त्यांचे स्वतः चे सुद्धा नुकसान. श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखी मैत्री असली पाहिजे.          स्नेह असला पाहिजे परंतु स्नेह धर्म वाढवणारा असला पाहिजे. स्वधर्मात बाधा आणणारा स्नेह असेल तर? युद्धाच्या मैदानात आल्यावर भीष्म, द्रोण इत्यादींना बघून अर्जुनाच्या डोक्यात स्नेह उभा राहिला. मी भीष्म, द्रोणांना कसा काय मारू? असा स्नेह उभा राहिला पण गीतेने त्याला स्नेह मानले नाही. वास्तविक ही चांगली विचारधारा आहे की एवढ्या सगळ्या लोकांना मारणे चांगले नाही. त्याच्या डोक्यात स्नेह उभा राहिला. अर्जुनाच्या डोक्यात स्नेह उभा राहणे चांगले होते. पण त्या स्नेहाला मोह ठरवले आहे. स्नेह नाही म्हटले.           विद्यार्थ्यांवर शिक्षकाचे प्रेम आहे पण प्रेमाच्या आधीन होऊन विद्यार्थ्याला परीक्षेचा पेपर आधीच दिला तर? किंवा उत्तर पत्रिका तपासताना जास्त मार्क दिले तर? त्यात विद्यार्थ्यी आणि समाज दोघांचे नुकसानच आहे...

न एकाकी रमते जिवन

Image
  न एकाकी रमते |          समाजातून पैसा कमवायचा आहे. पैसा काय झाडाला लागतो? म्हणून समाज पाहिजे. दुकानदाराला गिऱ्हाईक पाहिजे. जिथे वस्ती नसेल तिथे दुकान कसे चालेल? समाजातून पैसा कमवायचा आहे पण समाजापासून पैसा वाचवायचा आहे. समाजाच्या जाळ्यात मला अडकायचं नाही अशी स्थिती आहे. हे आजचे जीवन आहे. जीवनाच्या बाबतीत विचार केला तर पुष्कळ विचार करण्यासारखे आहे. लोकांनी स्मृति कशासाठी लिहिली? त्याच्या मागे काही विचारधारा असेल की नाही? आज डोक्यात काही आले म्हणून सोडून दिले. की फार मोठी समस्या आहे. माझ्या शेजाऱ्याशिवाय चालत नाही. परंतु शेजारी माझ्यापासून दूर राहिला पाहिजे. जेव्हा मला जरूर असेल तेव्हाच माझ्याकडे यायला पाहिजे. जसा काय तो माझा गुलामच नव्हे काय?           उपनिषदांनी एक समस्या उभी केली आहे न एकाकी रमते |मी एकटा राहू शकत नाही, मला दुसरा पाहिजे. खेळण्यासाठी पण दुसरा पाहिजे‌. पुष्कळ वेळा दुसऱ्यासाठी सुद्धा आपल्याला खेळावे लागते. आम्हाला ब्रिज खेळायचा आहे. आम्ही तिघे आहोत, आम्हाला चौथा पाहिजे. चौथी आला तर खेळता येईल. अशा प्रकार...

नीतिमत्ता

Image
  नीतिमत्ता            दुसरा आहे पण तो मनुष्य आहे. त्यात मानव्य आहे. मानव्याचा स्वीकार केला की अव्दैत येईल. जसा मी आहे तसाच दुसरा पण आहे. भगवंताने जसे माझे सर्जन केले आहे तसेच दुसऱ्याचेही केले आहे. जे काही मला पाहिजे ते दुसऱ्याला सुद्धा पाहिजे. जर देऊ शकलो तर त्याला देईन, नाही देऊ शकलो तर त्याच्या फायद्याच्या आड येणार नाही. कमीत कमी त्याच्याजवळ जे काही आहे ते खेचून घेणार नाही. ह्या तीन गोष्टी आल्या की नीतिमत्ता आली.           दुसऱ्याच्या फायद्याच्या आड येणार नाही अशी नीतिमत्ता कशासाठी या प्रश्नाचे उत्तर वेदांत देतो आणि भक्ती देते. यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैत हे एक जीवन आहे. अद्वैत हे एक जीवनदर्शन आहे‌. आणि 'द्वैती' आहोत अथवा आम्ही 'अद्वैती' आहोत असे बोलणेच व्यर्थ आहे. व्दैतामुळे कचरा होतो. पती-पत्नीच्या संबंधात भेद आले की कचरा आला. बाप्पा मुलामध्ये व्दैत आले की कचरा आलाच समजा.         अव्दैतात भगवंत आहे, अद्वैत्वात सुख आहे, अद्वैताच शांती आह. द्वैतात संघर्ष आहे, व्दैतात दुःख आहे. म्हणूनच अद्वैत ...

शेजारी - माणसाने शेजार धर्म कसा पाळावा ?

Image
शेजारी            शेजारी असणे अनिवार्य आहे. शेजाऱ्याशिवाय असलेले घर लोक घेत नाहीत. माणसाचे मानसशास्त्र विचार करण्यासारखे आहे. शेजारी तर असलाच पाहिजे, तो अनिवार्य आहे. पण तो येऊन मला त्रास देऊ लागला तर? ही विवंचना आहे. त्याच्याशी मी अति प्रेमाचा संबंध ठेवीन तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हैराण करेल. एवढ्यासाठीच तर ब्लॉक सिस्टीम आली आणि चाळ सिस्टीम गेली. समोर कोण आहे ते मला बघायचं नाही, जाणायचं नाही. दुसरा पाहिजे, पण दुसरा दूर राहिला पाहिजे. आणि मला जरूर असेल तेव्हा माझ्याजवळ आला पाहिजे. तोपर्यंत मला नको. ही एक अजब गोष्ट आहे.           दुसरी गोष्ट भुकेची तृप्ती. त्यात सर्व प्रकारची भूक आली. इंद्रयांची भूक पण त्यातच आली. त्याची तृप्ती झाली पाहिजे. संरक्षण आणि मनोरंजन यासाठी मला दुसरा पाहिजे. त्याच्याशिवाय माझे चालणारच नाही. दुसरा आला की धर्म उभा राहतो, संकेत उभा राहतो, परंपरा उभी राहते. ते मला बाधा रूप ठरते. आज सर्व लोकसंस्था विरोधी झाले आहेत.  परंतु कोणता नवा रस्ता बनवण्याची हिंमतच नाही. दूरचे पाहण्याची बौद्धिक ताकद नाह...

तीर्थ - लज्जातीर्थ

लज्जातीर्थ            माणसाला दुष्कृत्यांची लाज वाटली पाहिजे, ते लज्जातीर्थ आहे. माणसाला असे वाटले पाहिजे की माझ्यासारख्या कडून हलके काम होऊ नये!ll जीवनात दुष्कृत्यांची लाज आहे, तसेच माणसाला क्षुद्र विचारांची लाज वाटली पाहिजे. आपण गीता वाचतो किंवा गीतेचे पारायण करतो त्यावेळी भगवंत माझ्यात बसला आहे ही गोष्ट जाऊ द्या पण भगवंत माझे जीवन चालवतो एवढी गोष्ट तरी ध्यानात येते की नाही? मी बघत नाही, मी कमी ब्ब चालत नाही, मी बसत नाही या सर्व कृती करणारा दुसरा आहे. त्याचा मी आहे आणि तरी माझे विचार असे? त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे.     आपण बोलतो की भगवंत सर्वत्र आहे, नदीत आहे, समुद्रात आहे, पर्वतात आहे, सर्वच ठिकाणी आहे. सर्वत्र भगवंत असेल तर माझ्यात कसा नसेल? माणसाला सर्वांच्यात भगवंत आहे ही समज आली आहे तरी तो रडतो आहे. सर्वांच्यात भगवंत असेल तर मला सोडून भगवंत असा राहील? स्वतःमध्ये सुद्धा भगवंत आहे याचा विचारच माणूस करत नाही. म्हणून तो उगाच रडतो आहे. त्याला फक्त एवढेच सांगायचे की सर्वांच्याच भगवंत आहे तर स्वतःपासूनच सुरुवात कर. हे त्याला दाखवायचा आहे. भ...

तीर्थ - ध्यान तीर्थ

  ध्यान तीर्थ                ध्यान ही मोठी गोष्ट आहे. ध्यानाने चित्त बदलते, माणूस मोठा होतो. ध्यान कशाचे करायचे? योगदर्शन शास्त्र असल्याने एकाग्रता समजावताना योगदर्शनकारानी असे म्हटले नाही की भगवंतातच चित्रएकाग्र करा. चित्तवृत्ती चा निरोध कराल तर योग होतो. ध्यानात काय काय गोष्टी येतात? ध्यानाचा जो प्रश्न आहे तो अज्ञात शक्तीच्या ध्यानासाठी आहे. एकाग्रता कठीण नाही, भगवंतात एकाग्र होणे कठीण आहे.         कुणी विचारेल तुमचा भगवंता एकाग्र व्हायचा आग्रह का? त्यांना सांगा की ज्यात चित्तएकाग्र होते त्याचे गुण चित्तात येतात. पैशातच एकाग्र झालेला माणूस जडच होतो. त्याला सगळीकडे पैसा दिसतो. स्रीचे चिंतन करणारा स्रेणच होतो. एकाग्र होताना ज्यांचे चिंतन करतो त्याचे परिणाम मनावर होत असल्याने सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तीमान स्थायुधं सशक्तीकं भगवंताच माणसाने चित्त एकाग्र केले तर त्याचा परिणाम चित्तावर होतो आणि दिवसेंदिवस चित्ताचे उन्नतीकरण होत जाते आणि माणसाचा जीवन विकास होतो.         जीवन विकास म्हणजे काय ? चित्तात अमुक गुण...

तीर्थ - सद्ग्रंथ

Image
 सद्ग्रंथ            ग्रंथात कल्पना असते आणि अनुभव असतो. जे ग्रंथ कल्पनात्मक असतात त्यांच्यात उदा . गुणवंतराव आणि गुणवंती ताई यांच्यात प्रेम कसे जमले मग लग्न कसे झाले? कादंबरी संपली. दुसरे अनुभवात्मक लिखाण असते. ज्ञानेश्वरी वाचाल तर त्यात अनुभवभावात्मक लिखाण पाहायला मिळेल. अशा अनुभवात्मक ग्रंथांनाच सदग्रंथ म्हणतात. ग्रंथात काय आहे हे पाहिलं पाहिजे. जो आपल्याला तेजस्विता देईल, भाव वृद्धी करेल, जीवनाची दृष्टी देईल आणि जीवनातीत असलेल्याचा संबंध समजावेल त्या ग्रंथालाच आपण सद् ग्रंथ म्हणतो. तो ग्रंथ पूजनिय गणला जातो. सदग्रंथ सतत वाचल्याने आपले जीवन कसे बदलते ते आपल्याला कळतही नाही आणि जीवन बदलत जाते. ग्रंथातही ताकद आहे.          ग्रंथ आपल्यावर परिणाम केव्हा करतात? ग्रंथाच्या लेखकावर आपले अत्यंत प्रेम असेल तर. गीता वाचतांना कृष्णावर अत्यंत प्रेम असले पाहिजे, तरच गीता तुमच्याशी बोलेल नाहीतर गीतेचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही पहिली गोष्ट दुसरे म्हणजे जे लिखाण आहे त्याबद्दल अत्यंतिक भाव पाहिजे. त्या ग्रंथाबद्दल भाव ...