Posts

Showing posts from February, 2024

स्वाध्याय - गीतेला समाजापर्यंत पोहोचवण्याचे एक मार्ग.

Image
स्वाध्याय           ज्या लोकांनी कठोर व्रत म्हणून स्वाध्याय व्रत घेतले आहे त्यांच्यासमोर मी स्वाध्याय बद्दल काय बोलू? आपण रात्रंदिवस स्वाध्याय करीत आहोत. स्वाध्याय एक जीवन दीक्षा आहे, एक जीवनदर्शन आहे. स्वाध्याय म्हणजे केवळ कथा कीर्तन ऐकणे नाही. कथा आणि स्वाध्याय यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. टांगेवाल्याचा घोडा आणि भागवान इंद्राचा उच्चै:श्रवस अश्व त्यांच्यात जेवढा फरक असेल तेवढाच फरक स्वाध्याय आणि कथा कीर्तन यांच्यात आहे. स्वाध्याय निराळा आणि कथा कीर्तन निराळे.  स्वाध्यायात एक निराळी दृष्टी आहे. स्वाध्याय करणाऱ्यांचे आणि करवणाऱ्याचें वर्तन निराळे असते. केवळ पुस्तक वाचणे म्हणजे स्वाध्याय नाही.           स्वाध्याय करण्यासाठी माध्यम तर पाहिजे.  माध्यम म्हणून स्वाध्यायात कोणते पुस्तक घ्याल? स्वाध्यायात भेजा बदलायचा आहे, डोके बदलायचे आहे त्यासाठी पुस्तक किंवा ग्रंथ पाहिजे.  तुम्ही सध्या कोणता ग्रंथ घ्याल? आपल्या जीवनात प्राण भरणारा, जीवन निष्ठा उभी करणारा, मृत्युंजय वृत्ती उभी करणारा, जीवनात तेज भरणारा असा ग्रंथ ह...

प्रत्येक मानवाच्या कर्माचा कर्मयोग.

Image
       कर्मयोग्यांचा कर्मयोग         व्यक्तीला भौतिक जीवनासाठी आणि अध्यात्मिक जीवनासाठी तयार करावे लागेल. त्याखेरीज तो साधना करू शकणार नाही. कुणी गुरु मला भगवंतापर्यंत घेऊन जाईल असे मानण्यात लाचारी आहे. आज ईश्वरवादी कमी नाहीत पण ते कोमेजून गेले आहेत. 'मी ईश्वराला नमस्कार करतो' असं सांगण्यात माणसाला शरम वाटते. उपनिषद ऐकायला जातोय असे सांगण्यात काय हरकत आहे? यावर तो म्हणतो विचारणारे लायन्स क्लबचे मेंबर आहेत. लायन्स क्लब चे लोक काय आकाशातून आले आहेत? पण त्यांच्यासमोर उपनिषद नाव घ्यायला तो घाबरतो. मी भगवंताला नमस्कार करतो त्यात तुझे काय जाते? असे सांगण्याची ईश्वरवाद्यांत हिम्मतच नाही, असा जमाना आला आहे. निरेश्वरवादी ईश्वराला आव्हान देतात आणि ईश्वरवादी म्लान झाले आहेत, कोमेजून गेले आहेत त्यांच्यात चैतन्य निर्माण करावे लागेल.           धर्म आणि भक्ती मधून चैतन्य निघून गेले आहे. त्यांच्यात चैतन्य राहिलेच नाही. व्यक्तीला उभे करण्याची त्यांच्यात ताकदच नाही. ते कर्मकांडी आहेत. धर्म आणि भक्तीवर कचरा साचला आहे. हा कचरा क...

अर्थप्रधानता - भौतिक गोष्टी यात सूख आहे का ?

Image
अर्थप्रधानता ऋषींना वित्ताची गरज नसते. त्यांच्या दृष्टीने वित्त खोटे ठरले आहे. त्यासाठी मेहनत करण्याची ऋषींना काय गरज आहे? समाजात अर्थप्रधानता आली की भेदभावामुळे समाज खलास होऊन जातो. नीती खलास होते आणि त्यामुळे मानवी जीवन खलास होते. आज सर्वांच्या डोक्यात एकच गडबड आहे. आम्ही धर्माची भाषा बोलतो पण डोक्यात अर्थप्राधानता बाळगतो. हे दोन्ही एकत्र कसे राहील? समाजात अर्थप्रचुरता असेल पण अर्थ प्रधानता असू नये. अर्थाची असक्ती सुद्धा असेल, आवश्यकता सुद्धा असेल पण अर्थ प्राधानता असलेली चालणार नाही. एकदा तुम्ही अर्थप्रधान त्याचा स्वीकार केला की मग दुसऱ्याला बोलणे व्यर्थ आहे. लोक लाच -लुचपतीच्या विरुद्ध ओरड करतात, काळ्या बाजाराला विरोध करतात. परंतु त्यांनी अर्थप्रधानतेचा स्वीकार केलेला असतो. तुम्ही मंदिरात जाता तेव्हा अर्थ मागता. अर्थप्रधानतेचा स्वीकार केल्यावर लाच घेणे आणि काळाबाजार करणे या आर्थिक सिद्धांत बनून जातात. अर्थाची आवश्यकता आहे पण अर्थ प्रधानता असता कामा नये.          दुसऱ्या पाशी कमी आहे ती वस्तू माझ्यापाशी असेल तर ही पैसा कमवायला चांगली संधी आहे. पैस...

भगवंताचे धरतीवर येण्याचे नियोजन

Image
भगवंत येण्याचे प्रयोजन          तथाकथित ईश्वरवादी म्लान आणि आकर्मण्य बनले आहेत आणि म्हणून बोलतात की सर्व ईश्वराच्या इच्छेने चालले आहे. भगवंताच्या इच्छेनेच जग असे झाले आहे. भगवंताचीच अशी इच्छा आहे म्हणून सारे बिघडले आहेत, कलियुग आले ते भगवंताच्या इच्छामुळेच. भगवान इथे येईल आणि सगळे सुधारेल. ते म्हणतात की, 'तुमची स्वाध्याय प्रवृत्ती ईश्वर विरोधी आहे तुम्ही सर्व लोकांना चांगले करायला निघाला आहात .तुम्ही स्वाध्याय प्रवृत्ती करून भगवंताला येण्यापासून रोखत आहात .'त्यांना काही विचारच करायचा नाही. ते काही अभ्यासच करत नाहीत. अशा लोकांना सांगितले पाहिजे की तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही काही वाचले नाही. सगळे बिघडले की मग भगवान् येईल ही खोटी मान्यता आहे. सगळ्या बिघडल्यांना भगवान मासे बनवून समुद्रात सोडून देऊ शकतो आणि माशांना माणसे बनवू शकतो. त्यासाठी त्याला जगात येण्याची जरूर नाही. भगवंताने गीतेत सांगितले आहे: परित्राणाय साधूनाम्... सज्जन लोक, सात्विक लोक, भगवंत प्रिय लोक रात्रंदिवस भगवंताचे काम करतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी भगवंत येतो.  अशा लोकांना मार्गदर्...

अध्यात्मात कश्या पद्धतीने आश्वासने दिली जातात ?

Image
      माझ्या आत देव आहे तर मला कळत असे नाही? या विचाराने व्यग्र झालेले लोक अध्यात्माचे अधिकारी आहेत. या विचारानेच अध्यात्माची सुरुवात होते. आत जी तत्वे भरलेले आहेत, देव आत बसला आहे, त्याबाबत विचार करणे, आत असणाऱ्या तत्त्वांचे उन्नतीकरण करणे याचे नाव अध्यात्म.      कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणेल की, ' बेटा! तुला मुक्ती मिळाली' म्हणून काही मुक्ती मिळत नाही. कोणी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला की, 'तुझे ध्यान लागले', म्हणून काही ध्यान लागत नाही. अध्यात्मात अशा गोष्टींना स्थान नाही. त्यामागे काही शास्त्र आहे, विज्ञान आहे. ते समजायला पाहिजे.       एवढ्यासाठीच गीतेत सांगितले आहे बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्धते| अर्जुनाला पण देवाने खोटे आश्वासन दिले नाही की मी तुला मुक्ती देईन. मुक्ती विकसित जीवाची स्थिती आहे. जेव्हा विषयाचा शिक्का बुद्धीत बसत नाही अशी स्थिती येते त्यावेळेस आवड-नावड बंद होते ही सामान्य गोष्ट आहे. ही स्थिती प्राप्त केल्याशिवाय मुक्ती कशी मिळेल? आपण अध्यात्माच्या दृष्टीने मन आणि बुद्धीच्या बाबती...

सतयुगाचा राजा श्री कृष्ण

Image
  कृष्ण       आम्ही कृष्ण पूजाक आहोत. कृष्णाचा अर्थ काय आहे, माहित आहे? काळा. जिथे जिथे काळेपणा असेल त्याची आम्ही पूजा करतो. कुठलीही व्यक्ती आली की तिच्यात चांगले काय आहे ते आम्ही बघणार नाही. आम्ही वाईट काय हेच बघणार. माणसाने दोषज्ञ असावे तसे गुणज्ञ पण असले पाहिजे. स्वतःची कृती, स्वतःचे जीवन, स्वतःचे भोग यांचे कठोर आत्मनिरीक्षण करण्याची  ज्याने सवय नाही लावली, अशी व्यक्ती ज्याने विकसित नाही केली तो अध्यात्मिक कसा असेल? म्हणून आत्मनिरीक्षण असले पाहिजे.          ज्याला कधीच स्वतःची चूक पहायची इच्छा होत नाही तो आध्यात्मिक कसा होऊ शकेल? अध्यात्म ही आतली समाज आहे. म्हणून स्वतःच्या बुद्धीत चिकित्सा करण्याची शक्ती पडून आहे ती वाढवली पाहिजे, विकसित केली पाहिजे. त्यामुळे काय होईल? सत्कृती वाढेल. असत् कृती असली तर पुन्हा होणार नाही. म्हणून आत्मनिरीक्षण ही पहिली गोष्ट आहे.           बुद्धीत दुसरी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे अमृत स्वरूपात विचार करण्याची शक्ती. तिला म्हणतात, सुजनात्मक चिंतन . या शक्तीने जसा आर्किटेक्ट डिझाईन त...

समाज एकत्र टिकावून ठेवण्यासाठी ऋषींचे प्रयत्न.

Image
ऋषींचे प्रयत्न  तीस वर्षांपूर्वीच्या समाजात आणि आजच्या समाजात जबरदस्त फरक पडला आहे. विचारांमध्ये फरक पडला आहे. परंतु हा फरक चांगला आहे की वाईट आहे ते माहित नाही. आजची सामाजिक स्थिती पाहून अस्वस्थ होतात. ते आजची सामाजिक स्थिती, विचार पाहू शकत नाहीत, आज जो फरक होत चालला आहे तो अपेक्षित आहे की नाही?         आपले ऋषी आत्मसाधना, आत्मज्ञान, समाधीत दंग राहू शकत होते. त्यांना कशाची गरज होती?  आद्य शंकराचार्य किंवा वल्लभाचार्य बाहेर कशासाठी पडले? त्यांना भक्ती करायची होती तर त्यांनी समाधी लावायची ,भगवंतापाशी बसायचे. त्यांना सर्व ठिकाणी फिरण्याची काय गरज होती? भगवंतामध्ये तल्लीन होऊन बसून राहण्यात काय हरकत होती? तहान भूकही विसरून जायचे असे त्यांची भक्ती होती. परंतु समाज परिवर्तन व्हावे, समाज सन्मार्गाने चालावा असे काम ते करत होते. त्यांनी लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न कशासाठी केले? प्रत्येकाच्या शरीरात भगवान बसला आहे, तो अस्वस्थ व्हावा असे जीवन जे लोक जगतात त्यांचे जीवन सुधारले तर भगवंताचे अस्वस्थता कमी होईल. भगवंतावरील प्रेमामुळे ते लोकांमध्ये जात होते....

भक्तीप्रधान धर्म - विषमता मिटवण्याचा महापुरुषांचा प्रयत्न

Image
  विषमता मिटवण्याचा महापुरुषांचा प्रयत्न         सामाजिक अन्याय आणि आर्थिक भेद, आर्थिक विषमता मिटवण्यासाठी मनू महाराजांनी लेखन केले आहे, काम केले आहे. याज्ञवल्क्य यांनीही त्यासाठी काम केले आहे. याज्ञवल्क्य सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते नव्हते, परंतु त्यांची भाषा ऐकल्यावर ते तसे असतील असा गैरसमज तयार होतो. वास्तविक हे महापुरुष किती महान होते!  त्यांनी असे काम कशासाठी केले? समाजातून, सामाजिक आणि आर्थिक विषमता गेली पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या जीवनाद्वारा, त्यांच्या विचाराद्वारा, त्यांच्या अस्तित्वाद्वारा समाजात परिणाम होतो.           आपल्याला कोणीतरी निर्माण केले आहे, पण हा हिंदूधर्माचा, हा इस्लामधर्माचा, हा ख्रिस्तीधर्माचा असा शिक्का कोणी मारला? आपण जन्मलो तेव्हा शेंडी आणि जाणवे घेऊन थोडेच आलो होतो. तर मग आपण सामाजिक अन्याय आणि आर्थिक विषमता मिटवण्यासाठी विचार करायला नको? हे काम करण्यासाठी जो रात्रंदिवस काम करतो तो भगवंताला सुंदर वाटतो. गीतेत भगवान धर्मसंस्थापनार्थाय संभवानी युगे  युगे असे म्हणतो. हा धर्म कोणता...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 10. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात भावना असतात.

Image
10. Anything is beautiful which is an expression          ते सुंदर आहे की जिथे अविष्कार दिसतो. ज्याच्या बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यात, काम करण्यात आत्माविष्कार दिसतो तो सुंदर आहे. सुखदुःखाच्या बाबतीत जो बेदरकार आहे, तो सुंदर आहे. आत्माविष्कार ही निराळी गोष्ट आहे. आमचे ऋषी जेव्हा भगवंताच्या विषयी बोलू लागले तेव्हा अश्रद्धाळू नव्हते, संशयवादी देखील नव्हते. तळहातावर ठेवलेला आवळा जसा स्पष्ट दिसतो तसे ते भगवंताच्या बाबतीत बोलत होते. तै नि:संशय होते. ज्याच्या बोलण्यात, राहण्यात आत्माविष्कार असतो तो सुंदर वाटतो. शब्दाविष्कार नाही, शब्दाविष्कार ही वेगळी गोष्ट आहे. आणि आत्मविश्कारी वेगळी गोष्ट आहे ज्याच्यात आत्मविष्कार आहे तो सुंदर आहे.

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 9. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती

Image
9. Anything is beautiful, which leads to disrable social effect.       ही सौंदर्याची फारच सुंदर व्याख्या आहे. ते सुंदर आहे, जे पाहिल्यावर समाजाचे काम होते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही सौंदर्याची व्याख्या कवितेला उद्देशून आहे. हे महापुरुष भगवंताची कविता आहेत. त्यांच्या असण्याने समाजाचे काम होते. शिव आणि हिताचा आग्रह राखून बुद्धी, कर्तुत्वशक्ती वापरणारे ऋषी समाधी लावूनच का बसले नाहीत? त्यांच्यात समाधी लावण्याची शक्ती आहे. ते आत्मनिष्ठ आनंद भोगू शकतात. त्यांना कोणाजवळून कशाचीही गरज नाही, त्यांना पैशाची जरूर नाही; मोठेपणाची जरूर नाही, तरीही ते समाजात सामान्यामधील सामान्य होऊन राहतात. समाज त्यांना मोठे ठरवणारा कोण? समाजात जे मोठमोठे लोक मानले जातात ते पण खुजे असतात. ते या व्यासवाल्मिकीसारख्या महापुरुषांचे मोठेपण कसे समजू शकणार? आदिवासी लोकांमध्ये दोन पुस्तके शिकलेला माणूस गेला तर आदिवासी माणूस तर त्याचे शिकलेला म्हणून वर्णन करतो . जसं पीएचडी झालेला आपल्याला मोठा वाटतो . तसा त्यांना दोन बुक शिकलेला मोठाच वाटतो. जगात विद्येची, तसेच वित्ताची महत्त्ता आहे पण ही गोष्ट म...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 8. नद्यांसह काहीही सुंदर गोष्ट्य आहे.

Image
 8. Anything is beautiful with rivers the ideal      ज्याच्या जीवनात खरा आदर्श आहे तो सुंदर होय. जो खलास होत नाही, जो खंडित नाही, जो बाध्य नाही, जो निराकरणीय नाही, तो सोडावा लागतो, असा आदर्श असला पाहिजे. वित्तवान व्हायचा आहे हा आज आपला आदर्श आहे. वित्त हातात आल्यावर, थोडी संपत्ती हाती आल्यावर व्यक्ती त्याने कंटाळून जाते. पण ती आता पुरे असे म्हणत नाही. कारण दुसऱ्या काय करायचं ते तिला सुचत नाही. ती वित्त सोडू शकत नाही. पण वित्ताचा तिला मोह राहिलेला नसतो.         'तुझा' बनण्याचा आदर्श ज्याने पहिल्यापासून स्वीकारला आहे तो कंटाळत नाही. 'मी कमविन, अभ्यास करीन, मोठा होईल, विद्वान होईल परंतु हे सगळं 'तुझा' होण्यासाठी  संकल्प देखील सोडतो! लग्न करतो. कशासाठी लग्न करतो आहे? हा रथ  तुझ्यापाशी लवकर यावा, मी तुझा बनावे म्हणून गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार करतो आहे. असे म्हणून आपण लग्न करताना उद्क सोडलेले असते. पण आपल्याला ते माहीत नाही. एकजण मला म्हणाला आपल्या लग्नाला पंचवीस वर्षे झाले म्हणून जुबली करायचे आहे. मी म्हटलं युरोप, अमेरिकेत लग्नाची जुबल...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 7. काहीही सुंदर आहे जिथे सत्य, निसर्ग, आदर्श आणि विश्वाची आत्मा प्रकट आहे.

Image
  7. Anything is beautiful which reveals truth, the spirit of nature, ideal and universe.         या एकाच व्याख्येत चार प्रकार येऊन जातात. ते सुंदर आहे की ज्यामध्ये सत्याचे, निसर्गतत्त्वाचे, आदर्शतत्वाचे, तसेच सामान्याचे दर्शन घडते.           ते सुंदर आहे, ज्यातून सत्याचे दर्शन होते. सत्यासाठी कवीने पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. मी आणि विश्व वेगळा आहे. ज्याचे सर्व आहे, त्याला जो मानतो आणि स्वतःची शक्ती, वैभव यांचा त्याच्यासाठी उपयोग करतो तो सच्चा आहे. तो सत्याचा अविष्कार आहे. सत्य आणि सुंदरता एकत्र नांदत नाहीत. जीवनात विरूपतेचाही एक भाग आहे, तो काय सुंदर होऊ शकतो?. तरीही ती वास्तविकता आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये क्रोध आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ती विरुपता आहे, जी सत्य आहे पण सुंदर नाही. क्रोध सत्य आहे पण सुंदर नाही. म्हणून तो सुंदरतेचा भाग नाही होऊ शकत. सत्य आणि सौंदर्य एकत्र नांदतात की नाही? हा एक प्रश्न आहे. सत्य सर्वथा सुंदरच असेल असे नाही. द्वेष सत्य आहे पण सुंदर नाही. सगळे सुंदर सत्यच असेल असेही नाही. जीवनात द्वेष आहे, मत्सर आह...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 6. कोणतीही गोष्ट सुंदर असते जी आपल्याला भ्रम निर्माण करते.

Image
6. Anything is beautiful which produces us illusion.       नाट्य कलेमध्ये आभास दिसतो. चित्रकलेत प्रकृतीचा आभास दिसतो. तसा ज्याच्या जीवनात आभास दिसतो. तो सुंदर आहे. वेदात चमे चमे म्हणत ऋषींनी काय काय मागितला आहे? त्यांना केवढी जीवनासक्ती असेल? त्यांच्या जीवनात जीवनासक्तीचा आभास आसेल. ते सामान्य माणसासारखेच राहताना दिसतात. याज्ञवल्क्यांनी कोणाला विचारले असेल, काय बाबा, सून माहेराहून आली? त्यांचा आणि सुनेचा काय संबंध? पण तरीही विचारतात.  ऋषी झोपडीत जाऊन शेतकऱ्याला विचारतात की 'तुझी म्हैस व्याली? किती दूध देते? त्यांना हे सर्व विचारण्याची काय गरज आहे? ऋषी शेतकऱ्यांच्या जीवनात वाकून बघतात. कशासाठी?स्वतःच्या जीवनातील प्रसाद त्यांना द्यायचा आहे. त्यांच्या जीवनात सुंगध भरायचा आहे. म्हणून हे महापुरुष वाकून बघतात, तो अभ्यास आहे. लहान बालकाला उचलून घ्यायचा असले तर तुम्हालाच वाकावेच लागते. बालक वरती येत नाही‌. अशाच प्रकारे समाजात कोणाला उचलायचा असेल तर महापुरुषांना वाकावेच लागते. मी माझ्या गादीवर बसेन, ज्याला यायचे असेल त्याने माझ्यापाशी यावे असे ते म्हणत नाहीत....

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 5. कोणतीही गोष्ट सुंदर असते जी अलौकिक बुद्धिमत्तेचे काम असते.

Image
5. Anything is beautiful which is the work of genius.       महापुरुषांची प्रत्येक क्रिया- बघणे, हसणे, बोलणे वगैरे प्रसादिक बनून जाते. प्रसादस्तू प्रसन्नता| त्यांना बघून प्रसन्नता येते. सर्व महापुरुषांना या स्थितीचा अनुभव समानच आहे. कारण भगवंताकडून त्यांना परत मिळालेले मन आणि बुद्धि प्रसादिक असते. हे महापुरुष बिना तिकिटाचे प्रवासी आहेत. त्यांचे स्वतःचे कोणतेही खाते नसते. त्यांची कुंडली बनवणे व्यर्थ आहे. वशिष्ठांची कुंडली काय कामाची? ते वैश्विक गरज म्हणून आलेले असतात. वैश्विक गरज म्हणून भगवान त्यांच्यासारख्यांना पाठवतो. ते भगवंताची सुंदर कृती आहे. आपण वासनेने जन्म घेतो. आपला कचरा आपल्याबरोबर असतो. आपण परोपजीवी नाही. आपण स्वावलंबी आहोत. आपण आपली कर्मे आणि नशीब घेऊन आलो आहोत. मागील जन्मात कर्म केली होती. ती खलास झाली.          या महापुरुषांना मागावे लागत नाही. त्यांना भगवंत पाठवून देतो. महापुरुषांची बुद्धी बदलून जाते. एक अशी समाधीची स्थिती येते की त्यांची बुद्धी बदलून जाते. त्यांचे मन बदलून जाते. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाराष्ट्राचे महान सं...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 4.माध्यमाच्या यशस्वी प्रदर्शनामुळे कोणतीही गोष्ट सुंदर असते.

Image
4. Anything is beautiful which results from successful expolition of medium         मानबुद्धी हे विकासाचे माध्यम आहे. बुद्धीला विकासाचे माध्यम बनवले पाहिजे. गीतेने म्हटले आहे बुद्धीयोगमुपास्रित मच्चित: सततं भव| माझी बुद्धी टिकली पाहिजे. म्हणून स्थितप्रज्ञाला महत्त्व आहे. आपली बुद्धी हालते, त्या बुद्धीला सांभाळा. कोणी घेऊन जाईल तिथे आपली बुद्धी जाते. आपण बुद्धी विकतो. पंडित बुद्धी विकतात. बुद्धीला सतत सांभाळले पाहिजे. त्याने विषय त्याग केला पण तिरस्काराने केला तर त्यात सौंदर्य नाही. चाळीस वर्षाचा झाल्यावर तो तत्वज्ञान सांगू लागतो की 'आम्ही तर ऋषी सारखे राहू इच्छितो'. त्याने विषय त्याग केला पण तिरसकाराने केला. विषय त्या विकासाचे माध्यम झाले पाहिजे विषयत्याग केला तो साधन बनवून केला पाहिजे. अमुक एका कार्याचे मी साधन, निमित्तमात्रं भव सव्यासचिन अशी साधन भक्ती गीतेने सांगितले आहे.             एक व्हायोलिन वादक होता. त्याने व्हायोलिन वाजून पुष्कळ धन मिळवले होते. तो रात्री दुसऱ्या गावी जायला निघाला. चोरांना बातमी लागली आणि त्यांनी त्...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 3. निसर्गाचे अनुकरण करणारी कोणतीही गोष्ट सुंदर असते.

Image
3.  Anything is beautiful which is an immitation of nature.          निसर्ग आत्मारात आहे. जीवन निसर्गासारखे हिरवेगार वाटले पाहिजे. इंग्रजीत ज्याला evergreen म्हणतात तसे. संपत्ती किंवा विपत्ती ज्याचे जीवन बदलू शकत नाही, त्यांचे जीवन हिरवेगार आहे असे म्हणतात.       जीवन आत्मरत असले पाहिजे. झरा किंवा झाडाला काही मिळाले नाही तरी निराश होत नाही. आपण नाटक बघायला गेलो आणि तिकीट नाही मिळाले की नाराज होतो. चेहऱ्यावरून आपली स्थिती कळते.        आपले सर्व सद्गुण दाखवण्यासाठी असतात. आपण भगवंताची पूजा देखील दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो. सकाळी साडेसात वाजता कोणाची अपॉइंटमेंट असेल तर सात पंचविसला पूजा करायला बसतो. येणाऱ्याला कळले पाहिजे की मी पूजा करायला बसलो आहे. मी पुजारी आहे.         आपले सौंदर्य देखील दुसऱ्याला दाखवण्यासाठी असते. एक दिवस बादशहा अत्तर लावत होता. बाटली कलंडली आणि आत्तराचा एक थेंब खाली सांडला. बादशहाने खाली पडलेले अत्तर  टिपून घेतले, वाया जाऊ नये म्हणून. त्याचवेळी बिरबलाने ते पाहिले. ब...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 2. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात एक विशिष्ट आहे.

Image
2. Anything is beautiful which has a pecific from         ते सुंदर आहे की ज्याला काही वैशिष्ट्यपूर्ण आकार आहे. पोटालाही काही विशिष्ट मर्यादा आहे, ती मर्यादा सोडून ज्याचें पोट मोठे होते त्याला कोण सुंदर म्हणेल? ते शोभत नाही. मर्यादा सुटली की सुंदरता निघून जाते. मनालाही आकार असला पाहिजे. मनावर बुद्धीचा हुकूम चालला पाहिजे. परंतु आज मनावर बुद्धीचा हुकूम चालत नाही. उलट बुद्धीवर मनाचा हुकुम चालतो. एखाद्या मुलाला विचारा की काय रे तू शिकायचं का सोडलास? तेव्हा तो म्हणतो की शिकण्यात मन लागत नाही. वास्तविक मनाने बुद्धीच्या हुकूमत राहिले पाहिजे. माणसाच्या बुद्धीत जी गोष्ट उतरत नाही, ती, तो मानत नाही. तुझी बुद्धी केवढी? बुद्धीला देखील एक मर्यादा आहे.           बुद्धीवादी, बुद्धीजीवी आणि बुद्धीनिष्ठ असे लोकांचे तीन प्रकार आहेत. काही लोक केवळ बुद्धिवादी असतात, ते केवळ वादविवाद करतात.        जे बुद्धीत उतरले ते उचलण्याची तयारी खरी तर असतेही,पण बुद्धीत किती उतरते? पुष्कळ गोष्टी बुद्धीत उतरत नाही. पाच वर्षाच्या मुलीच्या बुद...

सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 1. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात सौंदर्याचा साधा दर्जा असतो.

Image
  सौंदर्याच्या पंधरा व्याख्या, 1. Anything is beautiful which possesses simple quality of beauty.           सौंदर्याचा गुण केवळ आकर्षकता आहे. ही प्रथम व्याख्या आहे. मन, बुद्धी, संकल्प आकर्षक आहे, ही सुंदरता आहे. भगवंताला आकर्षक वाटेल असे जीवन बनवा. ज्याला आवश्यकता नाही अशा भगवंताला आकर्षक सुंदर वाटलं पाहिजे. त्यासाठी मन, बुद्धी, संकल्प आकर्षक करा.         सफलता, विफलता, संघर्ष या सर्वांमध्ये जीवन आकर्षक असले पाहिजे. ते ज्यामुळे मिळते तिला विद्या म्हणतात. मनुष्याची जी संघर्षवृर्ती आहे तेच जीवनाचे प्रेम आहे. आणि संघर्षकार्पण्य जीवनाची उदासीनता आहे. मला दुसरे काही उचलायचं नाही गुण उचलायचे आहेत. शरीराहून मन वेगळे आहे‌. गुण उचलण्यासाठी मनाने चांगले संकल्प केले पाहिजेत. संकल्पात सुगंध आणला पाहिजे.        असे सगळे बोलतात. ही एक बोलायची पद्धत, प्रथा होऊन गेली आहे. देवा सर्वांना सुखी कर ह्या संकल्पला तेव्हाच सुगंध येतो. जेव्हा संकल्पच्या मागे प्रामाणिकपणा चे मिश्रण असते.        आपला संकल्प आकर्षक वाटला...

श्रेष्ठ जीवनाचे पैलू - सत्यं, शिवं, सुंदरम्

Image
         भक्तीत सुंदरता आहे. त्यांची भक्ती लाचारीतून उभी राहत नाही. आकर्मण्य भक्तीला दुर्गंध येतो. भक्तीत सुगंध आला पाहिजे. सौंदर्य व्यक्तीनिष्ठ असते. जी सुंदर वस्तू किंवा विषय असतो, त्याचा आस्वाद घेणारा त्याहून भिन्न असतो. तो स्वतःच्या कल्पनेनुसार वस्तूकडे बघतो. म्हणून सौंदर्य वस्तुनिष्ठ मानले जात नाही. तर सौंदर्य व्यक्तीनिष्ठ किंवा आत्मलक्षी असते. आपल्या डोक्यात सौंदर्याची कल्पना असते तीच घेऊन आपण चित्र पाहतो. सौंदर्य वस्तुगत असत नाही. त्यामुळे त्याची व्याख्या करणं केवळ मुश्कील नाही तर महाकठीण आहे. जे आत्मलक्षी असतो त्याची व्याख्या कशी करणार? त्याची व्याख्या होऊ शकत नाही.          आता वस्तुत असलेले जे आकर्षण सामर्थ्य आहे ते ज्याला आकर्षक वाटेल त्याला ती वस्तू सुंदर वाटेल, तीच त्याची सुंदरता होय. म्हणून असे म्हणू शकतो की सौंदर्य वस्तू गत आहे. पण अनुभूती व्यक्तिगत आहे. वस्तूसौंदर्य आणि व्यक्तिरसिकता यांचा मेळ म्हणजे सुंदरता.       सहचार्यामुळे सौंदर्य येते. परंतु सुंदरतेसाठी सहचार्य अपेक्षित आहे का याचा विचार करायला हवा. न...

भगवंता सोबत मानवी जीवन कसे असावे ?

Image
       भगवंत ज्याचे ध्यान करतो तो श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे सत्यं, शिवं, सुंदरम् जीवन असले पाहिजे. आपले जीवन भगवंताला सुंदर वाटले पाहिजे. जो भगवंताला चांगला वाटतो त्याचे जीवन अंतिम, उच्च स्थितीवर आहे. त्याचे आपण पाय धरतो. त्याला श्रीफळ अर्पण करतो. सुंदर बनायचे असेल तर जीवनाकडे बघण्याची दृष्टी सौंदर्यवादी झाली पाहिजे. सौंदर्याची व्याख्या करता येऊ शकत नाही. जीवन सुंदर बनवायचे आहे. भगवंताला चांगले आवडेल असे बनायचे आहे. आदर्श सौंदर्यात साधेपणा आणि शांती असली पाहिजे. (The ideal of beauty is simplicity and tranquility).     काही लोकांच्या जीवनात अस्वस्थता दिसत नाही तसाच उतावळेपणाही दिसत नाही. गटे म्हणतो की स्वतःच्या नैसर्गिक विकासाचा उत्कर्ष झाला की वस्तू किंवा व्यक्ती सुंदर वाटते. तेव्हा जीवन सुंदर वाटते. वसिष्ठ, याज्ञवल्क्यांचे जीवन सुंदर वाटते.     सौंदर्य म्हणजे सत्य आणि असत्य यांची संध्यावस्था. अर्थात सौंदर्य म्हणजे प्रकाशही नाही आणि अंधार देखील नाही. सौंदर्य म्हणजे भगवंता सारखे प्रकाशमान जीवन नाही. आणि क्षुद्र शंकररावा सारखे अंधकारमय जीवनही नाही. सौ...

ओंकार - प्रत्येक मंत्रात दडलेला

Image
प्रत्येक मंत्रात दडलेला ओंकार           देवाने हृदयस्त प्राणाचे उदगीथ रूपात उपासना सुरू केली.त्याच्यावर केलेले असुरांचे प्रहार निष्फळ ठरले आणि शेवटी असुरांचा नाश झाला. याप्रमाणे निस्वार्थरीत्या इंद्रियांचे रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे आणि प्रणव हे प्राणाचे प्रतीक आहे. माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी उब प्राणापासून मिळते व विश्वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृतत्त्वाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे. छांदोग्य उपनिषदात एक मूलभूत दाम्पत्याची कल्पना आहे. हे दाम्पत्य वाणी व प्राणाचेच आहे. आणि दोघांचे मिलन ओंकारातच होते. वाणी व प्राणाच्या विशिष्ट सहयोगाने ओंकाराचा उच्चार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर ओंकार रूपी बालकाला जन्म देऊन वाणी व प्राणाचे दांपत्य जीवन कृतार्थ बनले‌ ब्रृहस्पतीने देखील त्याची उदगीथ रुपाने उपासना केली आहे. आणि तिचा पती म्हणजे प्राण‌. वेदांमधील तो बृहस्पती तोच पुराणातील गणपती. ओम साडेतीन अक्षराचा बनला आहे. ...

ओंकार - प्रत्येक मंत्रात दडलेला शब्द

Image
ओंकार     सर्व मंत्रामध्ये ओंकार उत्तम रीतीने ख्याती पावलेला आहे. ओंकाररुपी होडीनेच संसार सागर तरू शकू.   जगामध्ये जन्म घेणारा प्राणीमात्र मर्त्य आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवाने वेदत्रयीचा आश्रय घेतला आहे. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणून वेदांना छंदस्य असे संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्युने देवाचा पिच्छा केला. तेव्हा देवानी ओंकाराचा आश्रय घेतला. ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले दुर्गम व अभेद्य स्थान. तेथे मृत्यूला प्रवेश मिळाला नाही. देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदांच्या ऋषींनी माणसाला सल्ला दिला की ज्याला मृत्यूच्या भयापासून सुटायचे असेल त्याने ओंकाराचे उपासना करावी. ओंकाराचा महिमा उद्घोषित करणारी ही अख्यायिका छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आलेली आहे. ओंकार म्हणजे उपनिषदाचे सार. ओंकार विद्या ही अक्षर विद्या आहे. अक्षर म्हणजे अविनाशी व अविनाशी म्हणजे परब्रम्ह. ओमित्येकाक्षरं ब्रह्म या शब्दांनी भगवंताने त्याचा महिमा वर्णन केला आहे.  वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर्ग मिळेल. पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात अमृतत...

प्रतीक दर्शन - मानवी जीवनातील काही अदृश्य गोष्टी

Image
प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात. असंदिग्ध असतात. सारगर्भित व व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकाबद्दलही तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ सामावलेला असतो, एका लहानशा बी मध्ये विशाल वृक्षाचा विस्तार सामावलेला असतो तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते.         भौतिक रित्या पाहता राष्ट्रध्वज हा कपडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाही परंतु सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणार्पणानेही त्याचे रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुंकू त्याच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा स्त्रीच्या सौभाग्याचा विषय बनवून उभ्या राहतात त्यावेळी त्यांच्या मागे असलेली भावना ही लहानशा वस्तूचे मूल्य अनेक पटीने वाढावीते. सामान्य दगडाला शेंदूर फासताच तो दगड न राहता तो देव बनतो. त्याची पूजा होते. प्रतीक ही मौनाची भाषा आहे‌ शांतीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मुख गीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिंदूमध्ये...

चित्त एकाग्रतेत येणारे अडथळे

Image
चित्तएकाग्रतेत मनाचे विक्षेप  1. व्याधी- व्याधी पासून शरीराला सांभाळायचं आहे . शरीर तूच्छ नाही, शरीर मंदिर आहे. शरीर अस्वस्थ असले की मन किंवा बुद्धी अस्वस्थ होते. शरीर अस्वस्थ असेल तर मन काम करत नाही. 2. स्त्यान- म्हणजे चित्ताचे अकर्मन्यता. करण्याची इच्छा आहे पण हातून काही घडत नाही.  3. संशय- परमार्थात शांती ( निवृत्ती ) हवी की प्रवृत्ती? ह्याविषयी आपल्याला शंका आहे. दिवस हवा की रात्र हवी. रात्र ही शांतीची मूर्ती आहे आणि दिवश प्रवृत्तीची मूर्ती आहे आणि दोन्ही नको ही स्थिती तर भगवंत भेटेल तेव्हाच येईल .तोपर्यंत येणार नाही. दोन्ही हवेत असे वाटले की भीती आली. आपण प्रवृत्ती किंवा निवृत्ती त्याच्यातून बाहेरच येत नाही. भगवंता आम्हाला शांती हवी आहे. भगवंता तुझ्या पाशी आहे तशी प्रवृत्ती हवी व तशी शांती हवी. प्रवृत्ती करूनही शांती चलित होत नाही. आणि शांती बाळगूनही प्रवृत्ती चालते. अशी एक वृती तयार झाली पाहिजे.  4.प्रमाद- ज्ञान आहे, बुद्धिमान्य करते आहे. तरी मन काम करत नाही. त्याला प्रमाद म्हणतात. बुद्धीचा मनावर काबू नसतो. तेव्हा प्रमाद घडतो. मन नको म्हणत असतानाही आग्रह...