Life and Skills | जीवन कौशल्ये
कलाकौशल्य कमी असतील तरी एकवेळ चालेल पण जीवन जगण्याची कला मुलाला साधलीच पाहिजे. भले तो अर्धी भाकरी मिळवेल, पण खुमारीत जगण्याची ताकद त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. याचं शिक्षण सर्वात प्रथम त्याला दिलं पाहिजे. आधी त्याचं मन तयार करा, त्याची वृत्ती तयार करा. मुलाला एक वेळ लिहिता - वाचता येत नसेल तर ते नंतरही पाहून घेता येईल; मुलात एखादी skills - त्याला कमी असेल तरी हरकत नाही, पण आधी त्याची जीवन वृत्ती तयार करा. वृत्तीवर्तन जीवने ही महत्त्वाची गोष्ट आहे. नचिकता म्हणतो आहे की, 'बाबा! अनुपश्य यथा पूर्वे आपले पूर्वज अटीतटीच्या प्रसंगांना कसे सामोरे गेले त्याचा तुम्ही विचार करा. तसंच प्रतिपश्य तथापरे - सध्याचे जे कोणते सद् पुरुष आहेत त्यांचे जीवन ध्यानात घ्या. म्हणजे तुमची शोकाविष्ठता कमी होईल. तुम्ही मला यम राजाला दिला आहे तर आता मला यम राजाकडे जाऊ द्या. त्यात कसला शोक करायचा?' अशी ध्येयनिष्ठा आपल्या देशातल्या पूर्वजांनी दाखवलेली आहे. राजा हरिश्चंद्र ने स्वप्नात दिलेले वचन पाळण्यासाठी आपल्या राज्यावर पाणी सोडलं. तेव्हा तारामती किंवा रोहिदासांनी अशी तक्रार नाही केली की...