महान व्यक्तिमत्त्वाची ओळख | Recognition of great personality
जीवन प्रगल्भ बनले पाहिजे.तर आनंद - म्हणजे काय हे लक्षात येईल. ही जीवणाची साधना आहे. साधना करता करता जीवन बदलून जाते. सुरुवातीला माणसाचे जीवन शुद्ध बनले तरी लोकांना तो मोठा भगत बुवा वाटतो. त्याला अजून तर आणखी चार पायऱ्या चढायचे आहेत. हे चारचे चार गुण ज्यांच्या जीवनात येतात ते वाल्मिकी, याज्ञवल्क्य सारखे महापुरुष गणले जातात. लहान सहान भगत तर पुष्कळ सापडतात. त्यांच्या जीवनात काही गुण आलेले सुद्धा दिसतात. ते लोकांचे मार्गदर्शक सुद्धा बनतात. त्यांच्या योगे लोकांची जीवने चांगली बनतातही. पण तरीही ते पैल तीरावर पोहोचलेले भक्त गणले जाऊ शकत नाहीत. मी त्यांना कमी लेखत नाही, पण हकीकत आहे ती सांगावीच लागते. मला अशांची नावे घेण्याची इच्छा देखील होते पण मी ती इच्छा रोखून धरत असतो. कारण समज कमी असलेल्या लोकांचा त्यांच्याबद्दल गैरसमज होईल. याज्ञवल्क्य, वाल्मिकी यांची जीवने शुद्ध, दैवी, तेजस्वी, प्रगल्भ आहे. म्हणून ते पूर्णोऽहम् आणि धन्योऽहम चा आनंद अनुभवत आहेत. सैषा वारुणी विद्या - तिलाच वारुणी विद्या म्हणतात. तिलाच भार्गवी विद्या म्हणतात. जीवनात ही विद्या ...