इष्टान्भोगान्हि वो देवा........|


    
अन्न सत् असले पाहिजे. म्हणजे ब्रह्म समजून अन्नाची उपासना करायची. ही उपासना करायची म्हणजे काय? भगवंतापाशी तांदळाचे चार दाणे वाहिले आणि नमस्कार केला म्हणजे काय पूजा झाली? नाही. जे संस्कृती सांगते ते पूर्णपणे करणे हे तिचे पूजन आहे.
    
आपले अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र असे असले पाहिजे की समाजात प्रत्येकाला अन्न मिळेल. अन्न सत् असले पाहिजे‌. आपले शास्त्रकार अन्न शुद्धी विषयी सांगतात ते सविशेष आहे. जेवताना माणसाने शुद्धता पाळली पाहिजे. हात- पाय धुऊन बसले पाहिजे. जेवताना कपडे देखील स्वच्छ असले पाहिजेत. बूट घालून जेवण ही आपल्याकडे पद्धत नाही. परंतु इथल्या पद्धतीमध्ये काय आहे ते समजून घेतले पाहिजे. अन्न सत् असले पाहिजे म्हणजे काय घरात खांडवा गहू घेतला म्हणजे चांगला गहू? नाही. खांडवा गहू ज्या पैशाने आला तो पैसा चांगला असला पाहिजे. कोणी म्हणतो, 'आमच्या माणसाच्या घरी स्वयंपाक खूप चांगला बनतो.' परंतु आपले जुने लोक विचारतात, 'त्याच्या घरी पंच महायज्ञ होतो का?' नसेल होत तर त्या घरचे अन्न खाऊ नका. त्याचे अन्न चांगले नाही. नाहीतर वृत्ती बिघडेल. आपल्याकडे एक म्हण आहे - अन्न तसा ढेकर. ज्या पैशांचे तुम्ही अन्न खाल तो पैसा चांगला असला पाहिजे. कोणी विचारेल, 'शास्त्रीजी! चांगला पैसा म्हणजे काय? पैसा कधी वाईट असतो का? गटारात बंदा  रुपया पडला तर तो घ्यायचा की नाही?' 'अरे रुपया आहे, तो धुवून घ्या. नाणे धुतल्याने स्वच्छ होईल,' पण तो धुतल्याने सत् होईल का? कमाईतून भगवंताचा भाग काढून दील्यानंतर बाकीचा जो पैसा राहतो तो सत् आहे, पवित्र आहे. ज्याने भगवंताचा हिस्सा खाल्ला नाही त्याचा पैसा चांगला म्हटला जातो. जे लोक स्वतःच्या कमाईतून भगवंताचा भाग काढत नाहीत ते चोर आहेत‌. हरामखोर आहेत. हे शब्द गीताकाराने स्वतः उच्चारले आहेत. मी तर गीताकारांचा शिष्य आहे. ते माझे गुरु, शिक्षक आहेत‌. त्यांनी जे सांगितले तेच मी सांगतो आहे. भगवंताच्या भागाचा एक आणा ही असला तरी तो भगवंताचा आहे. प्रभुकार्याचा पैसा प्रभू कार्यातच वापरला पाहिजे. त्यात माझे नाव येता कामा नये. आज सगळेच भगवंताला बनवायला निघाले आहेत. आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं आहे की 'मानवाच्या हातात पहिले मनुचे मानवधर्मशास्त्र द्या' आणि नंतर त्याला उपनिषद द्या.' त्याखेरीज उपनिषद वाचण्यात काहीच अर्थ नाही. चार आणे मजुरी मिळवणाऱ्या मजुराने सुद्धा त्यातून भगवंताचा भाग काढला पाहिजे. तो भाग काढला तरच त्याचे अन्न चांगले होते. ही फार मोठी उपासना आहे. त्या उपासनेतून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नही सुटतील. त्यात वैयक्तिक अन्नाची व्यवस्था आहेच. अकरा वाजले की सर्वजण घराकडे धावतात. अन्न सर्वांना मिळाले पाहिजे. अन्न सत् असले पाहिजे.

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता:|
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङत्के स्तेन एव स:||

कोणतेही काम करीत असाल तेव्हा त्यात भगवंत तुमचा सहाय्यकर्ता आहे. त्याचा भाग त्याला न देता खाणारा माणूस चोर आहे.

  वरील उतारा गीतेच्या अध्यात्मिक तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ज्यात अन्न, धन, आणि यज्ञ यांचे महत्त्व पटवून सांगितले आहे. यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

1. अन्नाची शुद्धता:
अन्न फक्त शरीर पोसण्यासाठी नव्हे, तर आत्मशुद्धी आणि जीवनशैलीसाठी महत्त्वाचे आहे. अन्न सत् (पवित्र) असले पाहिजे, म्हणजे केवळ चांगल्या गहू, भाताने नव्हे तर तो मिळविण्याच्या प्रक्रियेदेखील नैतिक आणि पवित्र असावी.

2. पैशाचा नैतिक वापर:
धन पवित्र असावे. भगवंताचा भाग (देवकार्य, समाजकार्यासाठी अर्पण) काढल्याशिवाय जे उरते तेच खरे पवित्र धन आहे. अन्यथा, तो पैसा चांगला मानला जात नाही. गीतेत असे स्पष्ट म्हटले आहे की भगवंताचा हिशोब न देणारा चोर समजला जातो.

3. यज्ञभावना आणि सामाजिक कर्तव्य:
प्रत्येकाने समाजाच्या भल्यासाठी यज्ञभावनेने (त्याग आणि सेवा वृत्तीने) योगदान दिले पाहिजे. हे केवळ वैयक्तिक पातळीवर नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरदेखील महत्त्वाचे आहे.

4. संस्कार आणि परंपरा:
आपल्या परंपरांमध्ये अन्न, धन, आणि कर्माच्या शुद्धतेवर भर दिला आहे. अन्न घेताना किंवा तयार करताना पंच महायज्ञाचे पालन (वातावरण, पशू-पक्षी, देव, पितर, अतिथी यांचा आदर) झाले आहे का, हे महत्त्वाचे मानले जाते.

5. अन्नाचे महत्त्व:
"अन्न तसा ढेकर" या म्हणीचा आधार घेत अन्नाचे प्रभाव आपल्यावर कसे पडतात हे समजावून सांगितले आहे. अन्न पवित्र असेल तर शरीर आणि मन पवित्र राहील.

गीतेतील श्लोकाचा अर्थ:
भगवंताला यज्ञभावनेने अर्पण करून दिलेली फळे देव तुम्हाला परत देतात. पण जो ती फळे स्वतःसाठी ठेवतो, तो चोर आहे.

ही शिकवण आजच्या जीवनातही अत्यंत उपयुक्त आहे, जिथे प्रत्येकाने नैतिकता आणि समाजसेवेवर भर दिला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन