Posts

Showing posts from January, 2024

भगवंताने मनाला दिलेल्या प्रेरणा - प्रेप्सा

Image
    प्रेप्सा -             म्हणजे भौतिक वस्तूंची इच्छा किंवा भौतिक वस्तूवर प्रभुत्व प्राप्तूं इच्छा प्रेप्सा. उचलण्याची एक सह सहज प्रेरणा आहे. काही सांभाळायचं आहे अशा वृत्तीमुळे माणूस भांडवलवादी बनला आहे. जर वस्तू दुसर्याकडे असेल तर त्यात आनंद नाही. जी कोणाकडे नाही ते आपल्याकडे आहे त्याचा आनंद आहे. हा एक विकार प्रेप्सेमध्ये घुसला आहे.        ज्याला मूर्तिपूजा करायचे आहे त्याने या सहजपणे प्रेरणेला वळण दिले पाहिजे. आपण प्रेप्सेचा स्वीकार करतो. भौतिक सुखा कर्ता तिचा स्वीकार करतो. आपल्याला मुक्ती कशासाठी हवे जगाला कंटाळलो आहोत म्हणून आपल्याला मुक्ती हवी आहे. त्याच्या मागे काही बुद्धीपूर्वक तर्क नाही. त्यामागे कोणती बौद्धिक विचारधारा नाही.        कंटाळलेले मन जगापासून मुक्ती मागते आहे. कारण जगामध्ये जे सुख मिळाले नाही ते मुक्ती मध्ये मिळेल असे माणसाला वाटते म्हणून तो मुक्ती मागतो. प्रेप्सेची ही बैठक बदलावी लागेल. वास्तविक आपल्याला भक्तीची प्रेप्सा हवी. भौतिक वैभवचा स्वीकार करायचा पण सुखार्थ स्वी...

ज्ञानाच्या सात भूमिका

Image
1. शुभेच्छाखा- तुझे भले आणि माझे भले म्हणजेच आपले भले. मी अज्ञानी आहे असे मला वाटते तेव्हा शुभ सुरू होते. मी ज्याला शुभ समजतो ते शुभ नाही याची खात्री झाली पाहिजे. भगवंता तुला जे योग्य वाटते तेच कर अशी भावना झाली पाहिजे.  2. विचारना- मला समजले नाही मला समजून घ्यायचे आहे. समजावण्याची पात्रता असलेला माणूस समजलेला असेल तर त्याला ओळखायचे आहे. जो आचार्याचा झाला, ऋषींचा झाला असा समजलेला माणूस आपल्याला कसा भेटेल.? त्याची परीक्षा देखील आपण कसे करू शकू.? पहिली गोष्ट समोरच्यावर विश्वास. आणि दुसरी समोरचा सांगेल ते स्वीकारण्याची तयारी. 3. तनुमानसा- (सद्गुरु) त्याच्या पाठी ऋषींचा अधिकार आहे. ज्याने जीवनात भोगात देखील भाव पाहिला. ज्याच्या जवळ गेल्यानंतर जन्म मरणाचे भव नाहीसे होतात. तो ज्ञानाची मूर्ती आहे. तो सुखदुःखात समान राहतो. सर्व ठिकाणी राहून निर्दोष राहतो. ज्याचे लक्ष तत्त्वमसी आहे. कोणत्याही अवस्थेत असलो तरी तो माझा तिरस्कार करत नाही. तो शुद्ध व अचल असतो. भावाहुन आतीत असतो. तो  त्रिगुणाच्या पलीकडे असतो. अशा तनुमाणसा सद्गुरूला मी नमन करतो. त्यामुळे माणसाचे मन तनु होते. तेजस्वी होते, स्...

दैविकार्यनिष्ठा - जिवन जगण्याची कला म्हणजे निस्वार्थ काम

Image
भीती किंवा फळा शिवाय काम करणे हे प्रमुख कार्य आहे. स्वतः भगवंताचे काम करतात व दुसऱ्याकडून विकासात्मक काम करतात ते दैविकार्य आहे. माझ्या ईशाभिलाषेला शास्त्र छेदू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही. पाणी भिजू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही अशी आहे. माझी ईशाभिलाषा रक्ताने स्नान करते पण डोळ्यात अश्रू येत नाही. ती शास्त्राने विद्द होते पण अंतकरणात भय नाही. जीवनात पराभव पदरी येतो पण वृत्ती पराजित नाही. जीवनाने प्रज्वलित झालेली व मृत्यूमुळे अमर बनलेली अशी माझी ईशाभिलाषा संक्रमणात सामर्थ्य व तेजोमयता देते. सोन्याच्या सिंहासनाचे चूर्ण करणारी, सम्राटाच्या वैभवाला तुच्छ लेखणारी, गुलामाला मानव बनवणारी, दासाला स्वामी बनवणारी आणि जोडणारी अशी माझी ईशाभिलाषा आहे.  भक्तीने केवळ मार्जन करून नाही चालणार. तिच्यात सुर मारला पाहिजे. ही शुराची, वीराची भक्ती आहे. दिनदुबळ्याचे येथे काम नाही.

आमृतमय विद्या

Image
समर्पणात्मक जीवन, समर्पणात्मक कर्म आणि सुंदर जीवन या तीन गोष्टीमुळे आत्मानंद मिळतो. कृतज्ञता, कृतिशीलता, भावमयता, त्यागमयता आणि समर्पण शक्ती हे पंचामृत मानवात असले पाहिजे. भगवंताने जसा या गोष्टी टिकवल्या आहेत तशा मलाही टिकवायच्या आहेत. वैदिक वाङ्मय पूर्ण आहे. त्याच्यामागे एक निश्चित जीवनदृष्टी आहे. एक निश्चित रस्ता आहे. भगवंताचे ऐक्य झाल्यानंतर जी विचारधारा येते तिच्या मागे वासना नसते, भोग नसतो आणि असा जो विचार असतो तो स्वतंत्र शुद्ध विचार असतो त्यालाच आपण वेद म्हणतो. त्याचीच आपण पूजा करतो. त्यालाच आपण अमृतम तू विद्या म्हणतो. ती विद्या व्यक्तीच्या जीवनात आवेश, चैतन्य, भाव उभा करू शकते. मानवाचे वैचारिक मज्जातंतू मजबूत बनवते. तीच मानवाला जीवनदृष्टी देऊन वर घेऊन जाते. तिलाच आपण अमृता विद्या म्हणतो.

भगवंतांनी जिवन जगण्यासाठी दिलेल्या देणग्या

Image
समर्पणात्मक जीवन, समर्पणात्मक कर्म आणि सुंदर जीवन या तीन गोष्टीमुळे आत्मानंद मिळतो.  कृतज्ञता, कृतिशीलता, भावमयता, त्यागमयता आणि समर्पण शक्ती हे पंचामृत मानवात असले पाहिजे.  भगवंताने जसा या गोष्टी टिकवल्या आहेत तशा मलाही टिकवायच्या आहेत. वैदिक वाङ्मय पूर्ण आहे. त्याच्यामागे एक निश्चित जीवनदृष्टी आहे. एक निश्चित रस्ता आहे. भगवंताचे ऐक्य झाल्यानंतर जी विचारधारा येते तिच्या मागे वासना नसते, भोग नसतो आणि असा जो विचार असतो तो स्वतंत्र शुद्ध विचार असतो त्यालाच आपण वेद म्हणतो. त्याचीच आपण पूजा करतो. त्यालाच आपण अमृतम तू विद्या म्हणतो. ती विद्या व्यक्तीच्या जीवनात आवेश, चैतन्य, भाव उभा करू शकते. मानवाचे वैचारिक मज्जातंतू मजबूत बनवते. तीच मानवाला जीवनदृष्टी देऊन वर घेऊन जाते. तिलाच आपण अमृता विद्या म्हणतो.

राम मंदिर नेमके कसे आहे? संपूर्ण माहिती,

Image
  राम मंदिर Ayodhya Ram Mandir :       रामलल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ अयोध्येतल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. देशातीलच नव्हे, तर जगभरातील प्रभू श्रीरामभक्तांना या मंदिराबाबत उत्सुकता आहे. हे मंदिर नेमके कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, सुविधा कोणत्या असतील आदी गोष्टींवर एक नजर.... मंदिरासाठी १८ एकर जागेत बांधकाम होईल, त्यातील ३५ टक्के जागेत बांधकाम असेल. उर्वरित जागेत रस्ते असतील. १० टक्के जागेत भाविकांसाठी विविध सुविधा असतील. मंदिराच्या ६७ एकर जागेत ५ लहान टेकड्या आहेत( अंगद टिला, कुबेर टिला,नल टिला, शेषनाग टिला, पिंडारक) . पाचव्या टेकडीवर मंदिर असेल.  २३५ फूट मंदिराची रुंदी ३६० फूट मंदिराची लांबी २.७ एकरवर मुख्य मंदिराचे बांधकाम ६७.७ एकर मंदिर उभारणी ५७ हजार ४०० चौरस फूट एकूण बांधकाम १२ मंदिरासाठी प्रवेशद्वारे १८ एकर मंदिर परकोटा (प्रदक्षिणा मार्ग) ५ एकूण डोम ३ एकूण मजले २० फूट प्रत्येक मजल्याची उंची तळमजला :  राम मूर्ती  पहिला मजला : श्रीराम पंचायतन दुसरा मजला : विविध देवतांच्या मूर्ती तळमजल्यावरी...

वसंत पंचमी - महाग शुद्ध पंचमी

Image
   महाग शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात वसंताचा उत्सव आणि सर्वांचा उत्सव आहे तो ह्या दिवसापासून सुरू होतो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलाने फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे.  महर्षी वाल्मिकीने रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहरि चित्रण केले आहे.  भगवान श्रीकृष्णाने गीतेत ऋतू नाम कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताचे बिरूदावली गायीली आहे.  कवी कवीश्वर जयदेव तर वसंत ऋतुचे वर्णन करता करता थकलाच नाही. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतू मध्ये लोभस बनतो.  स्वतःच्या कोवळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.  भगवान स्वतःच्या अस्वस्थ मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्त बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेले पाहिजे.  निसर्गात एक असा आजब जादू आहे . की जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करतो. जर या निसर्गाचे सान्निध्य सातत्य राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो, त्याचा परिणाम ठरतो. निसर्गात आनन्...

मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर स्नान

Image
  Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १२ लाख भाविकांनी केले प्रयागराज त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान;  Makar Sankranti : प्रयागराज येथेल गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती या तीन नद्यांचा संगम होणाऱ्या घाटावर तब्बल १२ लाखाहून अधिक भाविकांनी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर स्नान केले. मकर संक्रांती पासून सुरू होणाऱ्या दीड महिन्याचा 'माघ मेळाव्याल' देखील सुरुवात झाली. प्रयागराजमधील संगम घाटावर  वार्षिक 'माघ मेळा' दरम्यान 'मकर संक्रांती' निमित्त गंगा नदीत पवित्र स्नान करताना भाविक. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सवासाठी राज्यभर व्यापक व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. एका भविकाणे  कपाळावर "राम" हा शब्द लिहून  मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगा नदीत पवित्र स्नान केले. 

स्व-चिंतन

Image
  Meditate and you"ll be able to make silence  खरे मंदिर ते की ज्यात वैदिकांची मूर्ती पूजा, मशिदीची शांती व चर्चची भव्यता एकत्र दिसते. श्रेष्ठ असा आत्मनिष्ठ आनंद प्राप्त करायला योग्य बनते. चित्त एकाग्र करण्यासाठी मूर्तिपूजा आहे . चित्ताची एकाग्रता जीवनाला अखंड शक्ती प्रदान करते. मानवाने चित्त शुद्ध करून भौतिक , सांस्कृतिक व आध्यात्मिक विकास साधावा. पर लोकात श्रेय प्राप्त करावे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गतानुगतीक चाललेली मूर्ती पूजा का उपयोगी पडत नाही. कारण त्यात चित्त शुद्ध होत नाही. विकार जात नाही. कर्माचा हेतू शुद्ध करण्यासाठी मन शुद्ध पाहिजे. त्यासाठी चित्र एकाग्रतेची गरज आहे. नीतिशास्त्र मिळालेल्या जन्माचा योग्य रीतीने वापर केला नाही तर काय दोष येतील त्याचा विचार कर. मनुष्य जन्म मिळाला मग मी मनाचा विकास केला का? धर्म क्रियाशील आहे म्हणून मी काय केले?  गेल्या जन्मात मला ज्या शक्ती मिळाल्या होत्या त्यांचा मी योग्य उपयोग केला नाही.  भगवंत विचारतो माझा भाग काढलास का? माझे काम केलेस का? ज्या हेतूसाठी शक्ती दिली आहे ते काम करण्यासाठी दिलेले शक्ती वापरलीस का? तू आज माझ...

कर्मयोगीला प्रेरणादायी उत्सव - मकर संक्रात

Image
कर्मयोगीला प्रेरणादायी उत्सव मकर संक्रात         मकर संक्रात  या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. त्यांच्या पाठीमागे विशिष्ट अर्थ आहे. सामान्य रित्या पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छप्परावर किंवा आगाशीवर जावे लागते. आणि थंडीच्या दिवसात सूर्य स्नान घडते अशा दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंग ह्या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडीत असते . संक्रातीच्या दिवशी असे आकाशात लाल, पिवळे, हिरवे वगैरे रंगाचे पतंग उडताना दिसतात. तसे या विश्वाच्या विषयाला सत्ताधीश, श्रीमंत, विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात. पतंगाचे अस्तित्व तोपर्यंत राहते की जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते. सूत्रधाराच्या हातातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डाळीवर. विजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेले व विकृत दशेत पडलेला पाहायला मिळतो. भगवंताच्या हातातून सुटलेला मानव पतंग हे थोड्याच दिवसात रंग उतरलेला,  फिका व अस्वस्थ झालेला दिसतो.        सारांश या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्...

सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव - मकर संक्रात

Image
  सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव         या उत्सवा निमित्त स्नेहाकडे जायचं असत. तिळाचे लाडू द्यायचे असते. जुने मतभेद काढून टाकायचे असतात. भांडणे विसरायचे असतात. स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असते.  महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय प्रचलित आहे. ते एकमेकांना तिळगुळ देतात व देताना म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गुजरातीत आजही ब्राह्मणांना लाडू देण्याची प्रथा आहे. त्याच्या पाठीमागे एक वेगळा भाव लपलेला आहे. आपल्या व त्याचे संबंध दुरावले जातात ते तुटू नयेत म्हणून ब्राह्मणाकडे जाऊन तिळगुळाच्या लाडवा द्वारे आपल्या मनाची शितलता वाढवायची, गोडवा द्यायचा, जुना स्नेह पुन्हा उभा करायचा आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात त्याचे गौरव आणि भरलेले स्थान टिकून ठेवायचे.  तिळाच्या लाडवात पैसा घालून देण्याची प्रथा होती ती गुप्त दानाचा महिमा समजावते. संस्कृती कार्य करणारे ब्राह्मण. ब्राह्मणांची जीवन व्यवस्था समाजाने गुप्त रीतीने चालवली पाहिजे.          तिळांच्या लाडवात असलेले तेल पुष्टीप्रधान आहे. सांस्कृतिक कार्याचा क्रांतिवीर पुष्ट बुद्धी...

कर्तृत्व शक्तीला आव्हान - मकर संक्रात

Image
   कर्तृत्व शक्तीला आव्हान  मकर संक्रात कर्तृत्व शक्तीला आव्हान !         मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. मानवाचे जीवनही अंधकार व प्रकाश यांनी वेष्टीलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढऱ्या तंतुंनी विणलेले आहे. आजच्या दिवशी माणसाने संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करावयाचा आसतो .        संक्राती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाचे आकांक्षा असते तर संक्रातीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी केवळ संदर्भ नाहीत तर मानवी मनाचे संकल्प ही बदलले पाहिजेत. हे विचार क्रांतीने शक्य आहे.  क्रांतीमध्ये संघर्षाला महत्त्व असू शकते परंतु संक्रातीमध्ये समजूतीचे साम्राज्य पसरलेले असते. संक्रांत म्हणजे संग क्रांती माणसाने या दिवशी संगयुक्त होण्याचा संकल्प करायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ मोह, मत्सर इत्यादी विकारांच्या परिणामापासून शक्य तेवढे मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संग मुक्तीतून हळूहळू आपण मुक्त संग बनले पाहिजे. म्हणजे मुक्त जीवनाच्या लोकांचा संघ केला पाहिजे. असे जीवन मुक्...

मकर संक्रात

Image
 सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस. संक्रातीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात.  सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे.  पुन्हा मकर राशीत प्रवेश करण्यास 365 दिवस 6 तास 9 मिनिट 10 सेकंद लागतो. 400 वर्षांनी 3 दिवस संक्रात पुढे जाते. दर वर्षी 9 मिनिट 10 सेकंद कालावधी शिल्लक राहतो. 157 वर्षांनी मकर संक्रात एक दिवस पुढे जाते. 525969 एक वर्षाचे मिनिट.  मकर राशीत प्रवेश करणारा लागणारा कालावधी मिनिटात, सन 200 मध्ये 22 डिसेंबर  1899 मध्ये 13 जानेवारी  1972 मध्ये 14 जानेवारी  1975 ते 2085 मध्ये 14 जानेवारी तर कधी 15 जानेवारी  2085 ते 2100 मध्ये 15 जानेवारी  2100 नंतर 16 जानेवारी  3246 नंतर एक फेब्रुवारीला संक्रात येईल.      तमसो मा ज्योतिर्गमय - अंधकारातून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना. कर्मयोगी सूर्य...

सांस्कृतिक जीवन - काळाची गरज.

Image
सांस्कृतिक जीवन वाढवायचे असेल तर कृतज्ञता व शील निर्माण झाले पाहिजे. ज्याच्या जीवनात कृतज्ञता आली त्याचे जीवन सांस्कृतिक असे म्हणता येते. कृतज्ञतेची सुरुवात भगवंतापासूनच होते. भगवंता प्रती जो कृतज्ञ असतो तो सुशील झाला. सुशिलता नसेल तर बाकीचे गुण असूनही शून्य आहेत.  पैसा गमावला तर काही गमावले नाही असे म्हणता येईल.  आरोग्य गमावले तर थोडे गमावले. शील गमावले तर सर्वच गमावले. चारित्र्य ज्याने गमावले त्याने सर्वच गमावले.  जर आपल्यात  कृतज्ञता व शील हे दोन्ही गुण असतील तर आपले जीवन सांस्कृतिक जीवन झाले असे ठरेल. तिसरे अध्यात्मिक जीवन आहे या तिन्ही जीवनाचा दाता व्हाल तर ते भगवंत कार्य आहे. भगवंताचे कार्य हे भगवंताच्या भागाने झाले पाहिजे. मनुष्यात कृतज्ञता, शील व अध्यात्म या तीन गोष्टींची सांगत असेल तर आपण आपल्या जीवनाचा दाता.

भक्ती धारा

Image
  भक्ती धारा  विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही तर विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा.  माझ्या दुःखी व्यथेत मनाच तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही तर दुःखावर मला विजय मिळवता यावा हीच माझी इच्छा.  माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही तर माझं पण मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा.  माझी फसवणूक झाली म्हणुन तू मला सावराव अशी माझी अपेक्षा नाही तर माझं मन खंबीर राहावं हीच माझी इच्छा.  सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री जग जेव्हा माझी फसवणूक करेल, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये हीच माझी इच्छा.

जीवन कसे असावे?

Image
जीवनात आकाशाची स्वच्छता,   नदीची प्रसन्नता,  सागराची गंभीरता असावी तरच मन प्रसन्न राहते.  जन्माला येऊन प्रभुकार्यात उपयोगी पडता आले नाही,  जीवन भगवंतमय बनले नाही तर जीवन व्यर्थ जाते.  दिवाळीला पैशांचा हिशोब करतो तसे वर्धापनदिनीही जीवनाचा हिशोब करावा. जीवनात मिनिटा- मिनिटांचा वेळेचा सदुपयोग जो व्यक्ती चांगल्या कामासाठी म्हणजेच भगवंतासाठी, भगवंत कार्यासाठी वापरत असेल तर तोच महान बनतो. जो व्यक्ती प्रेमाने हृदयाचा, ज्ञानाने बुद्धीचा व शक्तीने शरीराचा विकास साधतो त्याचे जीवन सुंदर व यशस्वी बनते. त्याच्या जीवनात प्रभुचे चरणामृत आहे. त्याचे जीवन प्रभूचा प्रसाद आहे असं म्हटलं जातं. तेच खरे जीवन जगतो मृत जीवनापेक्षा जिवंत मृत्यू चांगला.

अधिक मास

Image
  अधिक मासात सूर्य चैत्र महिनात मीन राशित  मेष राशित वैशाखात तर वृषभ राशीत जेष्ठ महिन्यात येतो. कधीकधी एका राशीत सूर्य असताना दोन चंद्र महिन्याचा प्रारंभ होतो, त्यात पहिला अधिक मास,दुसरा निजमास . या महिन्यात सूर्यात राशी बदल होत नाही.  पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना 365 दिवस पाच तास 48 मिनिट 46 सेकंद लागतात.  चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणेचा काळ 354 दिवस 8 तास 48 मिनिट 34 सेकंद लागतो.  यामुळे दरवर्षी 10 दिवस 21 तास 12 सेकंदाचा फरक पडतो. चंद्र वर्षात 360 तिथी. सूर्यवर्षात 371 तिथी. 3 वर्षात एक अधिक मास येतो. दोन अधिक मासात 27 ते 35 महिन्याच्या आंतर असते.

मानवी जीवनाच्या अवस्था

Image
स्वतःचे जीवन बदलणे ही माणसाच्या स्वतःच्या हातची गोष्ट आहे. त्यासाठी खालील गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.  मानवी जीवनाच्या   तीन अवस्था  -  1. कौमार्य- विकासासाठी प्रयत्न करणे.  2. यौवन- तारुण्यात आवेश उत्साह असला पाहिजे.  3. जरा- म्हातारपणात शांती पाहिजे.   त्रिदल -                 1.प्रेम                 2.भाव                 3.ज्ञान,  ज्याच्या जीवनात प्रेमचक्षु, भावचक्षु व ज्ञानचक्षु असतात. त्याच्या जीवनात त्रिदल असते. तीन अवस्था -                 1. जागृती 2. स्वप्न 3. सुषुप्ती. सत्कार्यार्थ जागृत असले पाहिजे. विकासासाठी जागृत आहोत का? ईश्वर कार्यासाठी जागृत आहोत का? स्वप्न सतकार्यासाठी, विकासासाठी स्वप्न पडली पाहिजे. सुषुप्ती माणसाने काम करण्यासाठी जागृत असावे व फळासाठी झोपलेले असले पाहिजे.  पंचदल  1. विवेकी जीवन - या सृष्टी मध्ये वासन...

मनाचे शुद्धी करा

Image
   मूर्तीपूजेने, एकाग्रतेनेच मन आणि बुद्धी समर्थ होते. त्यासाठी मूर्ती पूजा हाच मार्ग आहे.  मूर्ती पूजा शास्त्रीय दृष्टीने व्हायला हवी. फर्निचर वर धूळ बसली असेल तर कोणी फर्निचर फेकून देत नाही. त्यावरील धूळ साफ करतो. त्याचप्रमाणे मूर्तीपूजेवर काही कचरा जमला असेल, काही गंज चढला असेल तर तो साफ केला पाहिजे. त्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही.  बुद्धीशाली लोकांचे हे काम आहे पण ते काम करत नाहीत आणि मूर्ती पूजा करणारे लोक विचार केल्याशिवाय असमंजसपणे मूर्ती पूजा करत असतात. बुद्धिमान लोकांनी त्यांना मूर्ख समजून मूर्तिपूजा सोडून दिली आहे. अशा प्रकारे मूर्ती पूजा करणारे लोक जेवढे मूर्ख आहेत त्याहून जास्त मूर्ख मूर्ती पूजा सोडणारे लोक आहेत. दहा दहा हजार वर्षापासून चालत आलेल्या मूर्ती पूजेबद्दल विचार करायलाही ज्यांना वेळ नाही ते लोक सर्वाधिक मूर्ख आहेत.        चित्त एकाग्र करण्यासाठी भगवंताची मूर्ती समोर पाहिजे. चित्त ज्यात एकाग्र होते त्यासारखेच ते बनते. म्हणून सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तिमान कारुण्यपूर्ण भगवंतामध्ये एकाग्र व्हायचे. जे जे गुण चांगले वाटत...

अयोध्येचे राम मंदिर

Image
राम मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे . जे अयोध्यामध्ये उत्तर प्रदेशात भारतात निर्माणाधीन आहे . हे हिंदू धर्माचे प्रमुख दैवत, रामाचे जन्मस्थान असलेल्या रामजन्म भूमीच्या ठिकाणी आहे .  Ayodhya Ram Mandir म्हणजेच प्रभू श्रीरामा ची जन्मभूमी . रामायण हा आपल्या हिंदूचा महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्यात प्रभू श्रीरामांबद्दल लिहलं गेलं आहे. अयोध्येत जिथे रामाचा जन्म झाला, त्या जागी भव्य राम मंदिर उभे राहिले. रामा चा 500 वर्षांचा वनवास संपुष्टात येणार आहे. त्या मंदिरात श्रीरामाच्या आगमनाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. 22 जानेवारी 2024 ला रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आयोजित केला आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित काम वेगाने चालू आहे. या सोहळ्यासाठी अयोध्याच्या रस्त्यांवर सुंदर नक्षीने सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुरेख देखावा दाखवला आहे.

अध्यात्मिक प्रेमाचे वर्णन

Image
अध्यात्मिक प्रेमाचे वर्णन भगवंतांनी   गुणरहितम,कामनारहितम , प्रतिक्षणम, वर्धमानम, अविछिन्नम, अनुभव रूपंम् या रूपात केले आहे. 1.  गुणरहितम - या प्रेमामध्ये सापेक्षाता नाही. 2. कामना रहितम- भगवंता तूला योग्य वाटलं तर कर. 3. प्रतीक्षनम वर्धमानम- भगवंता प्रति प्रेम दिन प्रतिदिन वाढत गेले पाहिजे. 4.  - अविछिन्नम -प्रेमाचा प्रवाह सतत असला पाहिजे. आज अनेक वर्षे झाली स्वाध्याय परिवाराला कुठेही निरस, फिके, प्रेम अनुभवास आले नाही की भक्ती एक समर्थ तत्त्वज्ञान आहे. सामान्यांसाठी  तत्त्वज्ञान आहे . आपण सगळे उपासक आहोत. जेव्हा जेवतो, झोपतो, उठतो तेव्हा भगवंत स्पर्शाची जाणीव होईल तेव्हा ते अध्यात्मिक अविच्छन्न प्रेम होय. 5. सूक्ष्मत्तरम - मी भगवंताचे स्मरण करतो हे कोणाला समजतात कामा नये. 6. अनुभव रूपम् - अध्यात्मिक प्रेमाचा अनुभव घेऊ लागलो तर दोन गोष्टी घडतील. प्रेमाचे गणित बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी रडायचे नाही आणि तक्रार करायची नाही. अशा दोन गोष्टी जीवनात आल्या की तुम्ही भक्तीच्या मार्गावर आहात समजून चला.