Posts

Showing posts from January, 2026

कर्तृत्वाची जाणीव आणि नैतिक जबाबदारी

Image
          माणूस अध्यात्माची भाषा सहज बोलतो— अहं ब्रह्मास्मि, मी आत्मा आहे, मी साक्षी आहे असे म्हणतो. पण ही वाक्यं जर केवळ दिलासादायक घोषवाक्यं ठरली, तर त्यांचा उपयोग आत्मोन्नतीऐवजी पलायनासाठीच होतो. आजच्या मंत्रात एक कठोर पण मुक्त करणारा विचार सांगितला आहे— मीच ब्रह्म आहे, मीच ईश्वर आहे. आणि म्हणूनच मी माझ्या प्रत्येक कृत्याला जबाबदार आहे. हा मी म्हणजे मन नव्हे, हा मी म्हणजे इंद्रिये नव्हेत, हा मी म्हणजे बुद्धीही नव्हे— हा मी म्हणजे जिवात्मा. इंद्रिये कृती करतात, मन इच्छा निर्माण करतं, बुद्धी त्याला तर्क देते; पण या सगळ्यांना करून घेणारा जिवात्मा असतो. म्हणूनच नैतिकदृष्ट्या करणाऱ्यापेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार ठरतो. बाह्य जगात आपण हे सहज मान्य करतो. एखाद्याने खून केला, तर खून करणारा दोषी ठरतोच; पण खून करवून घेणारा अधिक गंभीर गुन्हेगार मानला जातो. कारण निर्णय त्याचा असतो— हात दुसऱ्याचा असला तरी बुद्धीमागचा संकेत त्याचा असतो. योगसूत्र हे सत्य थेट सांगतं— कर्ता, करविता आणि अनुमोदन देणारा— हे तिघेही कर्माचे भागीदार आहेत. म्हणजेच फक्त कृती करणं न...

इंद्रियांचा पट्टा कोणाच्या हातात?

Image
    सकाळी सकाळी मुंबई शहरात फिरायला गेलात, तर एक मजेदार पण अंतर्मुख करणारे दृश्य हमखास दिसते. मोठमोठे लोक आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघालेले असतात. सामान्य माणसांच्या मुलांना जितके खायला मिळत नसेल, त्याहून अधिक पौष्टिक आहार हे लोक आपल्या कुत्र्याला देतात. परिणामी कुत्रे लठ्ठभरी, दमदार आणि उन्मत्त झालेले दिसतात. खरं पाहिलं तर मालक म्हणतो की, “मी कुत्र्याला फिरायला घेऊन आलो आहे.” पण प्रत्यक्षात चित्र उलटं असतं. कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा मालकाच्या हातात असतो, पण कुत्र्याच्या अंगात रग इतकी असते की तो पुढे धावत असतो आणि मालकाला त्याच्या मागे धावाधाव करावी लागते.  बाहेरून पाहणाऱ्याला स्पष्ट कळतं—इथे मालक कुत्र्याला फिरवत नाही, कुत्राच मालकाला फिरवत असतो. हेच चित्र आपल्या जीवनात इंद्रियांच्या बाबतीत घडतं. इंद्रिये उन्मत्त झाली, तर जिवात्म्याला त्यांच्या मागे पळायला भाग पाडतात. पण यासाठी इंद्रिये जबाबदार नसतात. मालक जबाबदार असतो. इंद्रिये म्हणजे साधनं आहेत; स्वामी नाहीत. “मी प्राण आहे” ही जाणीव माणसाने एक गोष्ट मनापासून मान्य केली की— “मी प्राण आहे”, तर तो दोषा...

हंसः — जबाबदारीची जागरूक जाणीव

Image
उपनिषद् माणसाला एकच गोष्ट सतत आठवण करून देतात— “तू प्राण आहेस.” हा प्राण म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास नव्हे; तो चैतन्य, साक्षीभाव आणि कर्तृत्वाची अंतिम जबाबदारी आहे. याच अर्थाने उपनिषद् जिवात्म्याला हंसः म्हणतात. हंसः म्हणजे जो दूध आणि पाणी वेगळं करतो— म्हणजे विवेक. हंसः असणं म्हणजे काय? हंसः असणं म्हणजे मनाच्या लहरींना दोष न देता, इंद्रियांच्या ओढीवर खापर न फोडता, बुद्धीच्या चुकांमागे लपून न बसता “हे माझ्याकडून घडलं” असं शांतपणे स्वीकारणं. आज माणूस असं म्हणतो— “मन वाईट आहे.” “इंद्रियांनी ओढलं.” “परिस्थिती अशी होती.” उपनिषद् मात्र थेट विचारतं— “हे सगळं होत असताना तू कुठे होतास?” मन, बुद्धी, इंद्रिये — साधनं आहेत मन हे विचार निर्माण करतं. बुद्धी निर्णय देते. इंद्रिये विषयांकडे ओढतात. पण या सगळ्यांना दिशा देणारा कोण?  जिवात्मा — हंसः. जर जिवात्मा जागा असेल, तर मन शांत होतं, बुद्धी स्पष्ट होते आणि इंद्रिये मर्यादेत राहतात. हंसः झोपला, की मन उधळतं, इंद्रिये राज्य करतात आणि बुद्धी समर्थन पुरवते. जबाबदारीचा स्वीकार — अध्यात्माची पहिली पायरी व्यवहारात आपण म्हणतो— “सगळेच जबाबदार आ...

जबाबदारी कोणाची? — मन, इंद्रिये की जिवात्मा?

Image
जेवताना माणसाच्या मनात असा भाव असला पाहिजे की मी हंसः आहे, मी प्राण आहे, मी मुख्य आहे. कोणतीही कृती घडते तेव्हा मन, बुद्धी आणि इंद्रिये ही साधनं असतात; पण त्या कृतीचा करवणारा अहंयुक्त जिवात्माच असतो. म्हणूनच जबाबदारी ढकलून देण्याची सवय उपनिषद्‌ मान्य करत नाही. उपनिषद् स्पष्ट सांगते—खरी जबाबदारी जिवात्म्याचीच आहे. आपण बहुतेक वेळा काय करतो? चूक झाली की म्हणतो— “मन वाईट आहे”, “इंद्रियांनी ओढलं”, “बुद्धी चालली नाही” आणि स्वतःला मोकळं करून घेतो. पण ही पळवाट आहे; सत्य नव्हे. चार व्यापारी आणि मांजराची गोष्ट चार व्यापारी होते. कापसाचा व्यवसाय करणारे. एकत्र मिळून त्यांनी गोडाऊन भाड्याने घेतलं होतं. उंदरांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी एक मांजर पाळली. मांजराला चार पाय—म्हणजे चार भागीदार! हौसेपोटी नाही, तर व्यवहारबुद्धीने त्यांनी मांजर पाळली होती. तरीही गंमत अशी की, त्यांनी मांजरीचे चारही पाय आपापसांत वाटून घेतले होते. प्रत्येक जण आपल्या वाट्याच्या पायाला वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांनी सजवत असे. मांजर धावताना रंगीबेरंगी दिसायची—सगळ्यांना भारी कौतुक! एकदा मात्र त्या मांजरीच्या एका पायाला ...

हंसः — जबाबदारीची अंतिम सत्ता

Image
हंसः म्हणजे मी सगळ्यांचा प्राण आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि मी — जिवात्मा, हे चारही घटक एकत्र येऊन माणसाचं जीवन चालवत असतात. पण या चौघांमध्ये मुख्य स्थान जिवात्म्याचं आहे. तोच केंद्रबिंदू आहे. तोच निर्णयकर्ता आहे. आज आपण काय करतो? काहीही घडलं की त्याची जबाबदारी लगेच दुसऱ्यावर ढकलतो आणि स्वतः मोकळे होतो. आपण अगदी सहज म्हणतो, “शास्त्रीजी, काय करणार? मनच वाईट आहे. सगळं काही ह्या मनामुळेच घडतं.” ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. तत्त्वज्ञानात तिला अजिबात स्थान नाही. खरं विधान असं असायला हवं — “जे काही चांगलं किंवा वाईट घडलं आहे, ते माझ्यामुळेच घडलं आहे. मी त्याला जबाबदार आहे.” ही कबुली देण्याची तयारी जेव्हा माणसात येते, तेव्हाच आत्मबोधाची सुरुवात होते. गीतेत भगवान स्पष्ट सांगतात — अधिष्ठानं तथा कर्ता कारणं च पृथग्विधम् | विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पंञ्चमम् || कर्म घडताना अनेक घटक कार्यरत असतात — अधिष्ठान, कर्ता, साधनं, विविध चेष्टा आणि दैव. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कर्ता म्हणून जिवात्माच उभा असतो. मन, बुद्धी, अहंकार आणि जिवात्मा — हे चौघेही मिळून काम करतात. परंतु दोषाचा...

सूर्यासारखा मी आहे

Image
       हंसः या शब्दाचा एक अर्थ आहे — अहं सः : तोच मी आहे. आणि दुसरा, अधिक सूक्ष्म अर्थ असा — मी सूर्यासारखा आहे. सूर्य तेजस्वी आहे, सर्वांचा प्राण आहे. कारण सूर्य हा काही मुन्सिपालटीचा दिवा नाही. तो फक्त प्रकाश देत नाही, तर जीवन देतो. एकदा एक मनुष्य रोज सूर्याला नमस्कार करत असे. त्याची टिंगल करत कुणीतरी म्हणालं, “सूर्य प्रकाश देतो म्हणून त्याला नमस्कार करता? मग मुन्सिपालटीच्या दिव्यालाही करा!” पण त्या उपहास करणाऱ्याच्या ध्यानात हे आलं नाही की, दिवा केवळ उजेड देतो; सूर्य प्रकाशासोबत जीवन देतो. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च — सूर्य हा स्थावर-जंगम सृष्टीचा आत्मा आहे. वैज्ञानिक गणित सांगतं की सूर्य एका सेकंदाला चार लाख टनांपेक्षा अधिक ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणूनच तो अवघ्या जीवसृष्टीचा प्राण आहे. तसाच, माझ्या संपूर्ण जीवनाचा प्राण ‘मी’ आहे. या शरीरावर सत्ता माझी आहे. माणूस जेवायला बसतो तेव्हा त्याच्या मनात हा भाव असला पाहिजे — या शरीरावर नियंत्रण माझं आहे. किती खायचं, खायचं की नाही — हा निर्णय माझा आहे. भजी आवडतात? जरूर खा. पण रसना माझ्यावर राज्य करू नये. माझं र...

अहंकार आणि आत्मबोध

Image
     जसं ऋषींना वाटतं की, अहं ब्रह्मास्मी तसं रावणाला सुद्धा वाटतं. परंतु ऋषींना वाटतं ते सत्य आहे आणि रावणासारख्या उन्मत माणसाला अहं ब्रह्मास्मी वाटतं, तो त्यांचा विकार आहे. अर्थात कित्येकदा अज्ञानापोटी सुद्धा माणसाचा तसा समज झालेला असतो. याच्यावर एक कथा आहे. एक माणूस होता. तो कुठेतरी ऐकून आला की, 'भगवंत हा सर्वात मोठा आहे. त्याच्या मनात विचार आला की, देवामध्ये सुद्धा महादेव मोठा आहे. म्हणजे तोच भगवंत आहे. तेव्हा दुसऱ्या दिवसापासून त्याने महादेवाची पूजा, अभिषेक अरंभला. असेच दोन चार दिवस गेले. एकदा तो सकाळीच पूजा करण्यासाठी गेला होता. तिथे त्याला दिसलं की, शिवलिंगावर एक उंदीर बसलाय आणि वाहिलेले तांदूळ बिनधास्त खातोय. ते पाहून त्याला वाटलं, देवांचे देव महादेव आहेत, पण महादेवाच्या माथ्यावर साधा उंदीर चढून बसत असेल तर तो महादेवापेक्षा मोठा आहे. दुसऱ्या दिवसापासून त्या उंदराची पूजा त्याने सुरू केली. त्यांचं असं आहे की, भगवंत तर सगळ्यांमध्ये आहे ना! दुसऱ्या दिवसापासून त्याने उंदरावर अभिषेक सुरू केला. तर असेच चार-सहा दिवस झाले. एवढ्यात एक मांजर तिथे आली. तिला घाबरून...

जीवनाचा दृष्टिकोन बदलला तर!

Image
कधी विचार केला आहे का— आपल्याला दुःख खरंच परिस्थिती देते की आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन? अपमान, नुकसान, हानी, बदनामी—हे सगळं सारखंच असतं; पण त्यातून कोणी कोसळतं, तर कोणी मुक्त होतं. फरक असतो तो केवळ दृष्टीकोनाचा. जीवन जसं घडतं, तसं स्वीकारण्याची जी अंतःस्थ तयारी असते, तीच माणसाला साधारणतेतून असाधारणतेकडे घेऊन जाते. ज्ञानी लोकांना—ऋषींना, याज्ञावल्क्य, वसिष्ठ, विश्वामित्रांसारख्यांना—एक मूलभूत जाण असते: माझ्यात आणि ब्रह्मात फरक काय? ब्रह्म सत् आहे, मीही सत् आहे. ब्रह्म आनंदमय आहे, मीही आनंदमय आहे. म्हणूनच अशा अवस्थेत माणूस निर्भय होतो. जणू तो म्हणतो—“भगवंता! तुझ्यात ताकद असेल तर मला दुःखी करून दाखव.” तुकाराम बुवांच्या जीवनातील एक प्रसंग याच दृष्टीकोनाचं सुंदर उदाहरण आहे. एकदा लोकांनी त्यांना गाढवावर बसवून गावभर फिरवलं. लोकांनी विटंबना केली, अपमान केला. पण तुकाराम बुवा म्हणाले—  “देवा, आज तुला गरुड सोडून गाढवावर बसण्याची इच्छा झाली होय! कमाल आहे तुझी! काही हरकत नाही. माझी गावात बदनामी झाली, ते चांगलंच झालं. लोक मला मागे मागे सोडत नव्हते; आज मात्र कोणीही विचारत नाही. ...

अहंकाराचा कैफ आणि अहं ब्रह्मास्मी

Image
आपल्याजवळ चार दिडक्या जमल्या की अनेकांना अचानक अहं ब्रह्मास्मी चं साक्षात्कार झाल्यासारखं वाटायला लागतं. चार पैशांची खुळखुळ ऐकू आली, की अध्यात्माचं शिखर गाठल्याचा भास होतो. काही जण तर इतक्यावर थांबत नाहीत; ते थेट म्हणू लागतात, “शास्त्रीजी, मनूच्याही काही चुका आहेत.” म्हणजे अर्थ सोपा—सध्या खिसा चांगलाच गरम आहे. पैसा आला की माणूस मोठा होत नाही; तो फक्त मोठा असल्याचा आवाज करायला लागतो. खिशात पैसा खुळखुळू लागला की अहं ब्रह्मास्मी वाटायला नाही लागलं, तरच नवल! आणि गंमत अशी की, हा गैरसमज माणूस स्वतःहूनच तयार करत नाही; त्याला खतपाणी घालतात आजूबाजूचे चार जण—“तुमच्यासारखा कोणी नाही”, “तुम्हीच सगळं केलं”, “तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं.” म्हणूनच माणसाकडे एक महत्त्वाचं शहाणपण असलं पाहिजे—‘आपला कोण’ आणि ‘माझा कोण’ ओळखण्याचं. देव धनसंपत्ती देतो खरा; पण तिच्यासोबत विवेकाची हमी देत नाही. ‘माझा कोण’ हे ओळखण्याइतका निर्-क्षीर विवेक अनेकांकडे नसतो. ज्याच्याजवळ ही विवेकबुद्धी असते, त्यालाच गीतेने ‘शुची श्रीमान’ म्हटलं आहे. नाहीतर रावणालाही स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास नव्हता—त्यालाही अहं ब्रह...

तत्त्वज्ञानाचे एक साहस — हंसः ते अहं ब्रह्मास्मि

Image
या मंत्रात आत्म्याचं वर्णन केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही, तर सामाजिक पातळीवरचंही मोठं शिक्षण दडलेलं आहे.  निर-क्षीर परीक्षा — दूध आणि पाणी वेगळं ओळखण्याची क्षमता — ही फक्त मानवी योनीतच शक्य आहे. म्हणूनच जिवात्म्याला हंसः म्हटलं जातं. गाढव, घोडा, बैल यांना ही परीक्षा करता येत नाही. Animal life आणि Human life यांच्यातला खरा फरक हाच आहे — विवेक. हंसः या शब्दाचा उच्चार बारकाईने पाहिला, तर तो अहं सः असा ऐकू येतो. त्यातला ‘अ’ गळून पडला की हंसः उरतो. सः म्हणजे तो — भगवंत. “ते ब्रह्म मी आहे” हे जाणून घेण्याची शक्ती मानवी बुद्धीत आहे. म्हणूनच माणूस पशुपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून माणसाच्या भोजनात आणि पशूच्या भोजनात फरक असला पाहिजे. माणसाने जेवणापूर्वी मंत्र उच्चारावा, कारण शेवटी आपल्याला हीच अनुभूती घ्यायची आहे — ब्रह्म सच्चिदानंद आहे आणि मीही सच्चिदानंदरूप आहे.  चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ही केवळ ओळ नाही; ही एक गर्जना आहे. मी नेहमी सांगतो — तत्त्वज्ञानाने जर एखादं साहस केलं असेल, तर ते हेच आहे. पहिलं साहस — ब्रह्माचं मनुष्यीकरण. ज्याने पर्वत, समुद्र, आकाश, ग्रह-तारे निर्माण ...

हंसः — ‘माझा कोण?’ याचा निर्णय

Image
आत्म्याच्या वर्णनात पहिलंच विशेषण दिलं आहे — हंसः. आणि जो भगवंतापर्यंत पोहोचतो, त्यालाच म्हणतात — परमहंस. हंस म्हणजे काय? तो केवळ पांढरा पक्षी नाही. बगळाही पांढराच असतो, पण दोघांत फरक आहे. निर-क्षीर परीक्षा हंसाला करता येते — दूध वेगळं, पाणी वेगळं. बगळ्याला ते जमत नाही. हीच परीक्षा इतर सगळ्या सजीवांपेक्षा फक्त माणूस करू शकतो. खरं कोण? खोटं कोण? माझा कोण? या प्रश्नांवर विचार करण्याची क्षमता मानवाला आहे. आपण नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आप्त मानतो. आणि ते काही अंशी खरंही आहे. पण एक सत्य कटू आहे— जोपर्यंत आपली चलती आहे, तोपर्यंत आपलेपणा आहे. तुकाराम महाराज म्हणतात — “जव चाले मोठा धंदा तव बहिण म्हणे दादा दादा.” धंदा तेजीत असतो, स्थिती चांगली असते, तेव्हा सारेच जवळचे वाटतात. पण संकट आलं, आणि तरीही जो सोडून जात नाही— तोच खरा आपला. माणूस दुसऱ्याच्या दुःखात खर्‍या अर्थाने समरस होऊ शकत नाही. आपण सांत्वन करतो, ते व्यवहार म्हणून करतो. मनापासून प्रयत्न करतो, पण आतून तितकं दुखू शकत नाही. पाच-पन्नास लोकांच्या ओळखी असतील, तर पाच-पन्नास ठिकाणी जावंच लागेल. पण त्या सगळ्यांच्या दुःखात एकाच व...

माधुर्याची परिपक्वता — नामाचा गुप्त प्रवास

Image
जुन्या काळी मुला‑मुलींची लहानपणीच लग्नं लावली जात. बारा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी — दोघं एकाच अळीत राहत, एकत्र सागरगोटे खेळत. त्या वयात खेळता‑खेळता मुलगी सहजपणे, नि:संकोचपणे हाक मारायची — “अरे शंकर!” कारण पती म्हणजे काय, त्या नात्याची गरज काय, त्यातली मोहकता काय — याची तिला तेव्हा कल्पनाच नसायची. पण तीच मुलगी जेव्हा अठरा वर्षांची होते, तेव्हा त्या नात्याचा अर्थ तिच्या मनाला उमगतो. पतीपणाची गरज, त्यातला गोडवा, त्यातली मर्यादा — सगळं कळायला लागतं. आणि तेव्हाच तिच्या मुखातून “अरे शंकर” असे शब्द कधीच निघत नाहीत. नाव तेच असतं, पण संबोधन बदलून जातं. कारण प्रेम परिपक्व झालेलं असतं. अगदी असंच अध्यात्मातही घडतं. जोपर्यंत “भगवंत म्हणजे काय, तो माझा कोण आहे” याची उमज पडत नाही, तोपर्यंत माणूस मोठ्या मोठ्याने नाम घेत बसतो — “श्रीराम जय राम जय जय राम!” पण जेव्हा त्याला आतून कळतं — “प्रभू माझा पती आहे. गतिर्भर्ता प्रभू: साक्षी…” — तेव्हा नामस्मरणातली माधुरी उमगते. शारीरिक दृष्ट्या माणूस अठरा वर्षांचा झाला, तरी अध्यात्मिक दृष्ट्या आपण अजून दोन‑चार वर्षांचेच असतो. जेव्हा ही अध्या...

गोमुखीत नामजप

Image
प्रेमातून उमटलेलं नाम — गोडी नसली तर जप नाही माणसाने समजून परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे; प्रेमाने नाव घेतलं पाहिजे. परमेश्वराचं नाव मधुर वाटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे. नाव घेताना जर मनाला गोडी वाटत नसेल, तर ते नाव टिकणार नाही. पण एकदा का त्या नावात मधुरता आली, की आपोआपच नामस्मरणाची उत्कंठा लागते. “देवा! तुझी कमाल आहे! न बोलावता तू येतोस. तुझ्याच शक्तीने मी पाहू शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे! तुझ्याशिवाय माझ्यावर दुसरं कोणी इतकं प्रेम करूच शकत नाही.” हे जे जाणवणं आहे, तेच खरं नामस्मरण आहे. दुनियेतली बहुतांश प्रेमं क्षणिक आणि स्वार्थी असतात. मुलगा जर बापाचं ऐकत नसेल, तर तोच बाप आपल्या मुलाच्या चुका जगभर सांगत फिरतो. हे खरं प्रेम नाही. खरं, निरपेक्ष प्रेम जर कुणाचं असेल, तर ते परमेश्वराचंच आहे. “परमेश्वरा! तूच माझं सर्वस्व आहेस” — हे आतून वाटलं, तरच त्या वाक्याला अर्थ आहे. नाहीतर “परमेश्वर सर्वस्व आहे” हे वाक्य हजार वेळा लिहून काढलं, तरी ते कोरडंच राहतं. आज काही ठिकाणी सांगितलं जातं — “वहीवर एक लाख वेळा रामनाम लिहा, मग तुम्हाला प...

मोह गेला की विकार जातात

Image
मोह गेला की विकार जातात. तर्काने पाहिलं तर विकार मुख्यतः दोन कारणांनी निर्माण होतात — भीतीमुळे आणि मोहामुळे. भीती मनात आली की अंतःकरण अस्थिर होतं आणि त्यातूनच विकार जन्माला येतात. पण देवाचं नाव घेतलं की भीती हळूहळू विरघळते. प्रभूचं नामस्मरण मनाला सांगतं — "मी एकटा नाही; माझ्यासोबत कोणीतरी आहे." ही जाणीव निर्माण झाली की भीती आपोआप कमी होते. जपमाळ हातात घेतली की ती जणू आपल्याशीच बोलते — "घाबरू नकोस. देव तुझ्यासोबत आहे. तुझ्या जीवनातील सगळ्या समस्या तुला एकट्यानेच सोडवायच्या नाहीत; परमेश्वर सुद्धा तुला मदत करायला उभा आहे." एकदा का "माझ्यासोबत भगवंत आहे" ही भावना मनात खोलवर रुजली, की माणूस समुद्रही तरून जाईल. भावनेत अपार शक्ती असते. माणसामध्ये सामर्थ्य निर्माण होतं ते भावनेमुळेच. गीतेत भगवंत स्पष्टपणे सांगतात — नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना | न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् || भावना नसेल तर बुद्धी स्थिर राहत नाही; भावना नसताना शांती येत नाही; आणि जिथे शांती नाही तिथे सुख कसं असणार? माझ्या लहानपणीचा एक अनुभव मला आजही हे सत्य ठामपणे...

नामजपाची शांत शक्ती — जेव्हा विकार स्वतःहून घराबाहेर पडतात

Image
मानवी मनात किती थर असतात! विचार, भावना, आठवणी, आशा, भीती, अहंकार, इच्छा—या सगळ्यातून वाट काढताना आपण अनेकदा स्वतःलाच हरवून बसतो. पण या गोंधळात एक अत्यंत साधं, शांत आणि प्रभावी साधन आहे—नामजप. हातात माळ घेतली आणि भक्तिभावाने नाव घेतलं की, काहीतरी जादू घडतं. मनातील अव्यवस्था अलगद आवरली जाते. पण हा बदल कसा घडतो? विकार मूर्ख नसतात—तेही सज्जन असतात आपण कितीही चिडलो, रडलो, त्रासलो किंवा गोंधळलो तरी आपल्या मनातील विकार मूर्ख नसतात. उलट, ते अत्यंत सूक्ष्म बुद्धिमत्तेने वागत असतात. कारण तेही या विश्वकर्त्यानेच निर्माण केलेले आहेत. वेडे आपण असतो—विकार नाही. आपण चुकीची भाषा वापरूनही अर्थचुकी करतो; पण विकार मात्र परिस्थितीचा योग्य अर्थ ओळखतात. हातात माळ आली की संदेश स्पष्ट होतो जसा एखादा शहाणा, सन्मानी पाहुणा यजमानांच्या नजरेतूनच समजून जातो की— "आता निघण्याची वेळ आली," तसंच काहीसं विकारांचंही होतं. जेव्हा आपल्या बोटांतून माळ फिरायला लागते, जेव्हा मन ‘नाव’ या दिव्य स्पर्शाशी गुंफलं जातं, तेव्हा विकारांना शांत, सूक्ष्म संदेश मिळतो— “येथे प्रकाश वाढतो आहे. आमचं काम इथे संपत चालल...

विकार सज्जन आसतात

Image
कुणीतरी सांगितलं म्हणून जरी तुम्ही हातात माळ घेतलेली असेल, समज नसताना सुद्धा माळ घेतलेली असेल; तरी पण विकार समजूतदार असल्याने आपोआपच ते निघून जातील. समोरचा माणूस जर हुशार असेल तर आपल्याला अक्कल कमी असली तरी एक वेळ चालते. आपल्या बोलण्याचा तो योग्य तोच अर्थ घेणार. एकदा कालिदास तीर्थयात्रा करायला गेला होता. आणि ती संधी साधून प्रतिष्ठानपुरचा एक पंडित भोजराजाच्या दरबारात येऊन उभा राहिला. त्याकाळी लोक रिटर्न तिकीट काढून तीर्थयात्रा करत नसत. तीर्थयात्रा म्हटली म्हणजे आठ -दहा महिने सहज निघून जायचे. तो पंडित भोजराजाच्या दरबारात प्रतिष्ठानपूरहून आला तोच मुळात वाद विवाद करण्याची इच्छा बाळगून. त्याला बाकी कोणीच हरवू शकत नव्हता. मधल्या एका काळामध्ये निरनिराळ्या संप्रदायाचे लोक पंडितांना आपल्या पदरी बाळगत असत. त्या अशासाठी की, त्यांच्या विचारांचे कोणी खंडन करू नये. कोणी म्हणत, 'आम्ही केवलाव्दैती आहोत.' कोणी म्हणत, 'आम्ही विशिष्टाव्दैती आहोत.' कोणी म्हणत, 'आम्ही शुद्धाद्विती आहोत.' असे निरनिराळे पंडित वादविवाद करण्यासाठीच खास राखण्यात येत असत. याचं कारण त्याकाळी वा...

नामजपाची अंतःशक्ती — विकारांना शांतपणे निरोप देणारा मार्ग

Image
नामाने जागवलेली अंतःप्रकाशाची लय आणि त्यातून जन्मणारी शुद्धता १) नामजपाचा खरा स्पर्श नामजपामध्ये एक निरूपम, सूक्ष्म आणि तेजस्वी शक्ती दडलेली असते. हातात माळ घेतली की असे वाटते जणू आपल्या अंतःकरणात कुठेतरी एक शांत दिवा पेटतो. त्या दिव्याचा प्रकाश जितका वाढत जातो, तितके तितके आतले विकार शांत होऊ लागतात. २) विकार शत्रू नाहीत—ते बुद्धिमान पाव्हणे आहेत विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, विकार हे काही आपल्या जीवनाचे शत्रू नाहीत. ते देखील ईश्वरनिर्मितच आहेत. ते हट्टी नसतात, तंगडखोर नसतात—उलट चतुर आणि सज्ञान असतात. आपण कधी कधी चुकतो, चिडतो, भरकटतो; पण विकार मात्र अत्यंत बारकाईने वातावरण ओळखणारे असतात. एखादा सन्मानी पाव्हणा यजमानांच्या डोळ्यातून घरातील वातावरण समजून घेतो, आता उठून जायची वेळ झाली आहे हे त्याला कळतं— तसंच काहीसं विकारांचंही होतं. ३) माळ हातात आली की ते शांत कोनाड्याकडे सरकतात तुमच्या बोटांत माळ फिरायला लागते, जशी नामाची लय श्वासाशी गुंफली जाते, तशी अंतर्मनात एक नवी सत्त्वशक्ती जागी होते. या शक्तीची जाणीव होताच विकारांना एक स्पष्ट संदेश मिळतो— “इथे आता आमचं स्थान कमी होत ...

753 नामजप — अंतःकरणनिर्मळतेकडे जाणारी शांत वाट

Image
नामजप कशासाठी करायचा? हा प्रश्न आज अनेकांच्या मनात उभा राहतो. काहींना नामस्मरण हे भक्तीचे लक्षण वाटते, काहींना ते मनःशांतीचं औषध वाटतं, तर काहींना ते एक प्रकारचा अंधानुकरणाचा मार्ग वाटतो. पण या सर्वांच्या पलीकडे, नामजपाचा खरा अर्थ अगदी थेट आणि साधा आहे—अंतःकरणातील विकार कमी करण्याची साधना. विकार — अंतरातील पडदा भगवंत काही बाहेर दूर नाहीत. ते आपल्या अंतर्याम्यांतच आहेत. मग प्रश्न असा—त्यांचा अनुभव आपल्याला लगेच का येत नाही? कारण दोघांच्या मध्ये एक दाट पडदा उभा आहे—मनाच्या विकारांचा. राग, द्वेष, मत्सर, श्रेष्ठत्व, आसक्ती, लोभ, अभिमान… हे सर्व विकार मनाला सतत बाहेरच्या विषयांकडे खेचतात. मन बाहेर धावत असेल तर निराकार, निर्विकार भगवंताची अनुभूती कशी मिळणार? जितके विकार प्रभावी, तितका मनाचा विचारप्रवाह त्यांच्याकडेच वळतो. विकारांचे चिंतन मोठे आणि भगवंताचे चिंतन लहान. आणि जेथे चिंतन नाही, तेथे प्रचिती कशी येणार? नामजप — मनशुद्धीचा उपाय नामजपाचा हेतू अगदी स्पष्ट आहे— मन शांत करणे आणि विकारांची पकड सैल करणे. जप म्हणजे भगवंतासाठी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणासाठी केलेली सेवा. ज...

नामजपाचा खरा हेतू — अंतःकरणनिर्मळतेकडे जाणारी वाट

Image
नामजप कशासाठी करायचा? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काहींना वाटतं—नामस्मरण म्हणजे भक्तीचा भार; काहींना वाटतं—ते फक्त धीर देण्यासाठी किंवा काही ‘फळ’ मिळवण्यासाठी असतं; तर काहींना वाटतं—ते कमकुवत मनाची खूण आहे. परंतु सत्य अगदी साधं आहे— नामजप म्हणजे अंतःकरणातील विकार कमी करण्याची प्रक्रिया. भगवंत तुमच्या बाहेर नाहीत; ते तुमच्या अंतर्यामी आहेत. पण तरी त्यांची अनुभूती का येत नाही? कारण मध्यंतरी तो ‘पडदा’ आहे—विकारांचा, आसक्तीचा, राग-द्वेषाचा, मत्सराचा, अभिमानाचा. विकारांचा प्रभाव जितका प्रबळ, तितकं मन सतत बाह्य विषयांमध्ये गुंतून राहतं. आणि मन विषयांकडे धावत असेल तर ते भगवंताच्या शांत, सूक्ष्म, निरव अनुभवाकडे कसं वळणार? म्हणूनच शास्त्रांनी सांगितलं— नामजप हा मनशुद्धीचा मार्ग आहे. तो मनाला शांत करतो, स्थिर करतो, प्रसन्न करतो. जिथे स्थैर्य आहे, तिथेच अनुभूती आहे. परंतु समस्या अशी की, जप हा विकार कमी करण्यासाठी आहे, पण माणूस तोच जप विकार वाढवण्यासाठी करतो. काहींना काही मिळवायचं असतं— शांती, संपत्ती, नात्यातलं प्रेम, करियरमध्ये प्रगती… मग जप हा एक प्रकारचा ‘व्यवहार’ बनतो. जप करणा...

751 "जप म्हणजे ओठांचा नव्हे; अंतकरणाचा उच्चार"

Image
  जपाचा खरा अर्थ — प्रेम, समज आणि आत्मनिष्ठेची साधना जपाला किंमत आहे. अर्थ आहे. फक्त माळ फिरवणं किंवा ओठांनी नाव उच्चारणं म्हणजे जप नव्हे. जप म्हणजे अंतःकरणातून परमेश्वराचं नामस्मरण — प्रेम, कृतज्ञता आणि विश्वासाने. जगाची निर्मिती करणारा, आपल्याला श्वास देणारा, आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया चालवणारा जो सर्जक आहे, त्याचं नाव घेऊन जीवनातील प्रत्येक कृतीची सुरुवात करणं हे नैसर्गिक वाटलं पाहिजे. कारण आपण करतो ते काय? भीतीपोटी, अंधश्रद्धेने, किंवा बळजबरीने केलेला जप. असा जप मन रिकामं करतो, पण आत्मा जागृत करत नाही. काहीजण देवाचं नाव उच्चारून दुकान उघडतात— पण कारण? “देवाचं नाव घेतलं नाही तर धंद्यात नुकसान होईल” या भीतीमुळे. भीतीच्या छायेत केलेल्या नामाचा प्रकाश कसा प्रसन्न होणार? भगवंत — जो कधीही सोडून जात नाही मानवी नाती मर्यादित असतात. आरोग्य बिघडले तर जग आपल्यापासून दूर जातं. कुष्ठरोग झाला तर आपल्याला हात लावायलाही लोक कचरतात. पण त्यावेळीही भगवंत आपल्याला कधीही सोडत नाही. पत्नी पतीची काळजी घेते, औषध देते, उपचार करते. पण रात्री थकल्यावर तिलाही झोप लागते. पती अजून वेदनेने त...

750 प्रेम, ध्येय आणि नामस्मरण — भक्तीचा खरा उगम

Image
लोक विचारतात — “नामस्मरणात कसली भक्ती? माळ फिरवणं म्हणजे गुलामी नव्हे का?” पण हे प्रश्न तेच विचारतात ज्यांनी प्रेम, यातना आणि ध्येयाचा ज्वालामुखी आतून अनुभवलाच नाही. खरं तर, आत्यंतिक प्रेम जागृत झाल्यावर जपालाही किंमत राहत नाही. आणि ध्येयनिष्ठ, तेजस्वी, निर्भय जीवन बनल्याशिवाय असं प्रेम जन्मतच नाही. भित्रा, निस्तेज, स्वार्थी मनुष्य — तो भगवंतावर प्रेम करू शकणारच नाही. कारण प्रेमासाठीही शक्ती लागते. सामर्थ्य लागतं. हृदयाची विशालता लागते. आपण कोण? आणि आपण देवावर प्रेम करतो म्हणतो? हे काही थट्टेचं नव्हे. देवावर प्रेम म्हणजे स्वत्व विसरणं, अहं विसरणं, आणि सत्याशी एकरूप होणं. स्वामीनारायण — जेव्हा जीवन एका सत्याला अर्पित होतं “भगवंता, या जगात तूच एकमेव सत्य आहेस” ही समज ज्या क्षणी मनाला भिडते, तेव्हाच खरा सत्यनारायण घडतो. “माझ्यावर दुसऱ्या कोणीही सत्ता नाही. पहिला तू — नंतर सारे जग. माझ्या मनाचा, बुद्धीचा, वित्ताचा, जीवनाचा तूच स्वामी…” अशी वृत्ती जेव्हा चित्तात स्थिर होते, तेव्हा मन आपोआपच नामस्मरणाकडे वाहू लागतं. ना बळजबरी, ना भीती. नकळत, सहज, प्रेमाने जप सुरू होतो. नामस्मरणात...

ध्येय-जप आणि नाम-जप — जीवनाचा द्वयार्थ साधना मार्ग

Image
ध्येय-जपामध्ये अवघा कर्मयोग सामावलेला असतो आणि नाम-जपामध्ये भक्तीयोग प्रकटतो. दोन्हींचं अनुष्ठान एकत्र झालं की जीवनात ज्ञानाची पहाट उगवते. ते ज्ञान माणसाला सांगतं— "तत्त्वमसि" — तूच ते आहेस! मानवाने जप केला पाहिजे, पण कोणाचा? ज्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या सर्जकाचे नाव सतत अंतःकरणात फिरत राहिले पाहिजे. पण एक महत्त्वाची गोष्ट — ध्येयाशिवाय नाम-जपाला किंमत नाही. ध्येयरहित मनाने हजारो वेळा नामस्मरण केलं तरी ते केवळ ध्वनी बनून राहतं, ऊर्जा बनून नाही. दर्शनकारांनी म्हणूनच सांगितलं आहे — “तज्जपः तदर्थभावनम्”, म्हणजे जप समजून, भावनेने, ध्येयाच्या आधाराने केला पाहिजे. जप करणाऱ्यांचे तीन प्रकार 1. न समजता जप करणारे — त्यांनाही फायदा होतो, पण तो आकस्मिक. 2. समजून जप करणारे — त्यांच्या जपा मागे जागृती असते. 3. प्रेमाने जप करणारे — इथे जप साधनेतून साध्य बनतो. समजून केलेला जप जीवनाला दिशा देतो. प्रेमाने केलेला जप जीवनाचं रूपांतर करतो. मोठ्या माणसांच्या शब्दांची शक्ती — एक कथा एका नदीच्या किनाऱ्यावर एक साधू बसला होता. तेवढ्यात एक बगळा आला; चोच पाण्यात भिजवून दगडावर घासू ला...

ध्येय नसलेलं जीवन — अंधकाराची चाल

Image
आपण ध्येयहीन जीवन जगतो आहोत. ज्यात काही अर्थ नाही, अशा तऱ्हेचं जीवन आपल्यातील बहुतेक जण जगताना दिसतात. जगायचं ते कशासाठी? लहानपण, तरुणपण, लग्न, संसार, मुलं, नातवंडं, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू—हेच जर जीवन असेल तर मग त्यात माणसाच्या विशेषत्वाचा प्रकाश कुठे? लहानपणी शिकवली जाणारी Solomon Grundy ही कविता त्या वेळेस फक्त वार मोजण्यासाठी शिकवली जात असे. पण आज तीच कविता उपनिषदांसारखी खोल जाणवते. सोमवारी जन्मलो, मंगळवारी मुंज झाली, बुधवारी लग्न, गुरुवारी बाप, शुक्रवारी संसार, शनिवारी आजारपण आणि रविवारी मृत्यू—हेच सर्वसामान्य माणसाचं एक असूरी जीवन. संपूर्ण आयुष्यभर त्याने अशी एक तरी कृती केलेली नसते की जिच्यावर उभा राहून तो परमेश्वरापुढे उन्नत माथ्याने उभा राहू शकेल. ध्येय नसलेलं जीवन म्हणजे आळणी अन्न. मिठा शिवाय भाजी जशी बेचव, तसंच ध्येयाशिवाय माणसाचं आयुष्यही फिक्कट! माणसाकडे उत्कृष्ट बुद्धी असेल—हा त्याचा गुण. तो परीक्षेत अव्वल येईल—त्यात आश्चर्य नाही. आई-वडील सुंदर गृहिणी देतील—तेही योग. पण या सर्वांनंतरही जीवनात काही ध्येय नसेल तर काही दिवसांनी तत्किम्? —नंतर काय? काहीजण खूप प...

ध्येयाचा जप — कर्मयोगातील तेजस्वी मार्ग

Image
आपल्या जीवनात ध्येय हे फक्त एक शब्द नाही, संपूर्ण जीवनाचं केंद्र असतं. आणि म्हणूनच— माणसानं ध्येयाचा जप केला पाहिजे. या जपातच कर्मयोगाची संपूर्ण साधना सामावलेली असते. आजचा प्रश्न ध्येय कसं मिळवायचं हा नाही; प्रश्न आहे की माणूस ध्येय विसरून जगतोय. इंद्रियशक्ती कुठे वापरतो आहोत? प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्या इंद्रियांची अमूल्य शक्ती कुठे खर्च करतोय याचा विचार क्वचितच करतो. कामात?, चिंतेत?, लोभात? की स्वप्नात? संघर्ष याचाच आहे की ध्येय नसल्यामुळे प्रयत्न भरकटतात आणि जीवन विस्कळीत होतं. पैसा ध्येय नाही—पैसा साधन आहे आज माणूस पैसा कमावतो—पण कशासाठी हे त्यालाच ठाऊक नसतं. फक्त जमा करायचा, साठवून ठेवायचा, जणू आयुष्याचं अंतिम ध्येयच सरकारी बँकेत भरलेलं शिल्लक. ही ध्येयहीनता शेवटी थकवते. धनाची पर्वा असूनही जीवन रिकामं वाटतं. अतिरिक्त धनसंचयात समाधान नसतं; फक्त भीती असते — हरवण्याची. धर्म, अग्नी, नृप आणि चोर — धनाचे चार दावेदार नीतीशास्त्र म्हणतं— धनाचे चार भाऊ आहेत: 1. धर्म, 2. अग्नि, 3. नृप (राजा), 4. चोर धर्म हा मोठा भाऊ. त्याचा अनादर झाला की उरलेले ति...

जप म्हणजे मनाची दिशा

Image
जपाला अनेकदा लोक ‘बुरसटलेली गोष्ट’ समजतात. पण वास्तविक पाहिलं तर जप टाळण्याइतकी माणसात शक्तीच नाही. जप हा केवळ देवाचाच नसतो — जप हा जे काही मनात सातत्याने फिरत राहतं ते. म्हणूनच ज्याचा जप मनात चालू आहे तोच खरा आपला देव, आपले ध्येय, आपला धर्म आणि आपली शक्ती ठरतो. जेव्हा मनात पैसा अखंड फिरतो— तेव्हा पैसा जप बनतो. जेव्हा मनात मत्सर असतो— मत्सरच जप बनतो. जेव्हा मनात मुलांचं चिंतन असतं— मुलंच देव बनतात. म्हणून मोठा प्रश्न हा आहे— आपण काय जपत आहोत? आणि जे जपत आहोत ते आपल्याला दिशा देतं की आपल्याला बांधून टाकतं? जप का आवश्यक? मानवी मन रिकामं राहू शकत नाही. रिकामं मन हे रिकाम्या घरासारखं — कधी कोणते विचार येऊन ताबा घेतील ते सांगता येत नाही. त्यामुळे शास्त्र सांगते— मनाला दिशा दे. जपाला दिशा दे. आणि जपातूनच साधना निर्माण होते. जप हा मनावर बंधन नाही — जप हा मनाला दिशा देण्याचा मार्ग आहे. ध्येयजप आणि नामजप — साधनेचा सुवर्णमध्य जपाचे दोन मुख्य प्रकार — 1. ध्येयजप (कर्मयोग) माणूस आपल्या ध्येयाचा अखंड विचार करतो. ध्येयच मनात पुन्हा पुन्हा येतं. कृती, प्रयत्न, निष्ठा हे सर्व ध्येयाकडे वळत...