Posts

Showing posts from September, 2024

असुरक्षित असणाऱ्यांचे रक्षण देखील भगवंतच करतो.

Image
प्रारब्धवशात बाळाची आई जर मेली तर भगवंत तेच प्रेम मावशीमध्ये किंवा आत्ये मध्ये किंवा अन्य कोणामध्ये तरी भरतो आणि बाळ लहानाचे मोठे होते. जो आरक्षित आहे त्याचे रक्षण देव करतो आहे, मात्र सुरक्षित आहे ते भग्यवशात नाश पावते. वनात टाकलेल्या अनाथाचेही रक्षण होते आणि अनेक प्रयत्न करूनही घरात सांभाळलेले ही नाश पावतो.  मेनकेला विश्वामित्र पासून मूल झाले तिला ते मूल नको होते म्हणून तिने त्याचा त्याग केला. पण भगवान काय त्या बाळाला तसाच सोडणार? भगवंताने जी ममता मानवात भरली आहे तीच ममता पशुपक्षातही भरली आहे. त्या परित्यक्त बाळाचे शंकुत पक्षांनी रक्षण केले ते पक्षी चोचीत पाणी भरून आणून त्या बाळाच्या मुखात घालीत. शंकूत पक्षांनी त्या बाळाचे रक्षण केले असल्यामुळे तिचे नाव शाकुंतला ठेवण्यात आले. कण्व ऋषींनी तिला पाहिल्यावर तिला आश्रमात आणून लहानाचे मोठे केले आणि तिचे दुष्यंत राजाशी लग्न झाले . जंगलात एखाद्या वृक्षाच्या खाली त्यागलेली ही बालिका पुढे राणी झाली, वीर माता झाली. तिला जे वीर संतान झाले, त्याचे नाव भरत. त्या भरताच्या नावावरूनच आपल्या देशाचे नाव भारत पडले (INDIA THAT IS BHARAT). भारत नाव विच...

सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ( यह जो जिंदगी हमारी अमानत प्रभू तुम्हारे )

Image
  सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म परंतु सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म असे फक्त म्हणून ब्रह्माचे स्पष्ट कल्पना येत नाही. कारण की केवळ 'काय आहे' एवढ्याने त्याचे वर्णन होऊ शकत नाही. त्यामुळे 'काय नाही' हे देखील वर्णन केले पाहिजे. तत्त्वाचे अधिक स्पष्टता यावी यासाठी सांगावे लागते की ते सत्य आहे, अनृत नाही; ज्ञान आहे जड नाही आणि अनंत आहे, मर्यादित नाही. अनृत चे तीन अर्थ होतात.            (१) खोटा            (२) अप्रमाणिक व            (३) अनित्य.  ब्रह्म खोटे नाही, म्हणून ते सिद्ध करावे लागत नाही, खोटी गोष्ट सिद्ध करावी लागते.  भगवान खोटा नाही की त्याला सिद्ध करावे लागेल. अनेक लोक मला म्हणतात, 'भगवान आहे हे सिद्ध करा.' पण त्यांना कसे समजवायचे की जो सिद्धच आहे त्याला सिद्ध कसे करायचे? काही लोक 'अस्ति परमेश्वरो वा, नास्ति परमेश्वरो वा' परमेश्वर आहे की नाही हा चर्चेचा विषय बनवतात. एखादा म्हणतो 'मी आहे' हे सिद्ध करा. तर ती काही सिद्ध करायची गोष्ट नव्हे. 'मी नसेन' तर 'मी आहे' हे सिद्ध करावे...

ब्रम्ह - भगवंताची नित्यता

Image
भगवंताची नित्यता  ब्रह्म आपण कोणी पाहिलेले नाही.   किं नाम ब्रह्म ! ब्रह्म म्हणजे काय? त्याचे लक्षण काय? ब्रह्माची व्याख्या आहे उत्पत्ती, स्थिती, लय करणारे ते ब्रह्म. ब्रह्माचे ते तटस्थ लक्षण म्हटले जाते. कारण उत्पत्ती, स्थिती व लय करण्यापूर्वी ब्रम्ह नव्हते? होतेच. नाहीतर मग सृष्टीच्या सोबतच ब्रह्माचा जन्म झाला असे होईल. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा आहे तो ईश्वर. पण ही व्याख्या अपुरी आहे. जर उत्पत्ती, स्थिती आणि लय नसेल तर त्यावेळी ते ब्रह्म नव्हते काय? ब्रह्म ईश्वर नसेल तरी पण ब्रह्म ते ब्रह्मच आहे.  ब्रह्म हे ईश्वर केला केव्हा होते? सगुण साकार झाल्यानंतर, सृष्टी निर्माण करते तेव्हा ते ईश्वर होते, पण ते ब्रह्मरूप आहेच. व्यवहारिक दृष्ट्या विचार करायचा असेल तर बाळ जन्माला येते तेव्हा आईचा जन्म होतो. त्याप्रमाणे सृष्टीच्या सृजनकर्त्याचा जन्म सृष्टी बरोबरच झाला असे बोललो तर तो आला कुठून? सृष्टी निर्माण करण्याची शक्ती कोणी दिली? इत्यादी प्रश्न निर्माण होणारच. गीतेत भगवंत सांगतो : कविं पुराण.... त्यानुसार तो अतिशय जुना आहे. हजारो वर्षाचे आयुष्य मोजले तरीसुद्धा आय...

जीवनमुक्त ( जीवन एक कला )

Image
  जीवन मुक्ती जो ब्रह्मविद् आहे, म्हणजे ज्याने ब्रह्म जाणलेले आहे, तो म्हणतो, 'मी काम करत नाही, ब्रह्म करते आहे.' ब्रह्म खेळते आहे, ब्रह्म पाहत आहे, ब्रह्म खात आहे, ब्रह्म पित आहे, असा ज्याला अनुभव आला आहे, अशी ज्याने समज निर्माण केली आहे. त्या माणसाला परम् आप्नोति म्हणजे निरतिशय सुख प्राप्त होते, म्हणजे ज्याच्याहून अधिक सुखाची गोष्ट नाही, अशा स्थितीला तो प्राप्त होतो. या जगात निरतिशय सुखाची स्थिती मिळवणे म्हणजे कोणत्या जबाबदारीविना जगणे. जबाबदारी नसलेला माणूस हा जगात सुखी माणूस.  जबाबदारी विना जगतो म्हणजे, काय केले? किती केले? केले की नाही? असे प्रश्न ज्याला विचारण्यात येत नाहीत आणि त्याचे उत्तर द्यावे लागत नाही तो जबाबदारी विना माणूस. या जगातली ही परम सिद्धी आहे‌. या जगातून गेल्यानंतर तर कोणी याला विचारणार नाही आणि जगाला विचारण्याचे कारण देखील नाही. या जगात राहायचे, फिरायचे पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी शिरावर घ्यायची नाही, ही निरातिशय गोष्ट आहे; ही एक प्रकारची उत्कृष्ट कला आहे, It's an art. जीवन एक कला आहे. अशा प्रकारचे जीवन जगणे ज्याला जमले तो जीवन जगला. ब्रह्मच माझ्या...

ब्रह्मविद्

Image
  ब्रह्मविद्  सद्वर्तनाने, धर्माने जीव जवळ येताच सत्संगात एखाद्या महापुरुषाच्या संसर्गाने माणसाला कळू लागते की ईश्वर माझ्यासोबत आहे. ईश्वराला बाहेर शोधायची गरजच नाही. हे शरीर ईश्वर चालवतो, मी नाही. त्यानंतर त्याला पुढे असे वाटू लागते की, 'ईश्वर माझ्यासोबतच आहे' ह्यात 'माझे' स्वतंत्र अस्तित्व आहे. पण वास्तविक या जगात मला अस्तित्व कुठे आहे? तुम्ही गीता वाचाल तर तुम्हाला कळेल, हे शरीर दोन मसाल्यांनी भरलेले आहे एक मसाला चैतन्य व दुसरा मसाला पंचमहाभूते‌. पंचमहाभूते म्हणजे 'मी' नव्हे. पंचमहाभूते जड आहेत. 'मी' जड नाही. तर मग चैतन्य म्हणजे 'मी' आहे का? नाही. चैतन्य म्हणजे प्रभू. पंचमहाभूते आणि चैतन्य याशिवाय तिसरी गोष्ट इथे नाही, तेव्हा 'मी' उरलोच नाही. भगवंताच राहिला. ही सुंदर सृष्टी बनवल्यावर भगवान माझ्या मार्फत पाहतो आहे. या शरीरात सर्व कर्म ईश्वरच करतो आहे, ही समाज ज्याला आली त्याला ब्रह्मवीद् माणूस म्हणतात. आपण या जगात आलो हे खरे पण आपल्याला पाठवले कुणी? पाठवले कशासाठी? आलो कशाप्रकारे? ते आपल्याला ठाऊक नाही. पण आपण दिवस-रात्र एक करून काम धंद...

भगवंत आणि मानव यांच्यात असलेली सख्यभक्ती

Image
 सख्यभक्ती   आता ईश्वर निराळा नाही, आता ईश्वर सह्यकर्ता राहिला नाही, आता ईश्वर सखा झाला. ह्याला 'सख्यभक्ती' म्हणतात. मी सिनेमा बघतो तेव्हा माझ्यासोबत माझा भगवंत सिनेमा बघतो, कारण तो अंतरातच बसला आहे.  सर्वस्य चाहं हृदी सन्निविष्ट:| भगवंत माझ्यासोबत जेवतो. माझा हा पिता माझ्यापासून दूर राहू शकत नाही. तुमचा मुलगा जर असेल तर तो तुमचे पान प्रथम मांडेल आणि त्याचे पान नंतर मांडेल. कामकाजामुळे एखाद्या दिवशी मुलाने लवकर जेवून घेतले आणि बाप नंतर जेवला तर समजू शकतो. पण रविवारी तरी बाप- लेक एकत्रच जेवतील. सर्वसामान्य बाप आणि लेक एकत्र बसून जेवतात. जगदीशाचे पान आकाशात आणि माझे पान इथे हे शक्यच नाही. भगवंत माझ्यासोबत असला पाहिजे. शास्त्रकार सांगतात, सामान्य बाप जेवणाचे पान घेऊन जवळ बसतो, तर जगदीश संपूर्ण जगाचा पिता हा महान, दयाळू, परम कारूणिक बाप तुझ्या पानातच जेवतो. एकाच पानात दोघेच दोघांचे जेवण....   अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनां देहमाश्रित:| प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्न चतुर्विधम्|| (गीता 15/14) सामान्य बाप मुलाला सोबत घेतल्याशिवाय सिनेमाला एकटा जात नाही. बापाच्या खुर्चीजवळ मु...

भगवंताला सापडण्यासाठी माणसाची चुकीच्या मार्गाने चाललेली धडपड.

 कंदील तर तुझ्या हातातच माणसे भगवंताला शोधायला घर सोडतात, पत्नीला सोडतात, मुलाबाळांना सोडतात, सर्व सोडतात. हे सगळे सोडल्याशिवाय भगवंत मिळत नाही असे मानून सगळे सोडतात आणि मग संन्यास घेतात. काम्यानां कर्मणा न्यासम्| तो भगवी वस्त्र नेसतो. भगवे नेसलेला माणूस पाहिला की लोक पुर्वी समजून चालायचे की याला काहीच नकोय. हा फक्त भगवंताला शोधायला निघाला आहे . पण याच्या इतका दुःखी माणूस जगात दुसरा कोण असेल.  ज्या शक्तीच्या योगे तुझे पाय चालतात तीच भगवान होय, तर मग तू भगवंताला शोधायला कुठे निघालास? तुझ्यासोबतच भगवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी| तुझे तर तुझ्या जवळच आहे तू शोधायला कुठे निघालास? कंदील तर तुझ्या हातातच आहे; तू तो कुठे शोधतो आहेस? पूजा-अर्चा वगैरे करत असू तर शेकडो लोक येतात आणि जातात. 'भगत' म्हणून हाक मारतात. कोणाला वाटते की हा काय मागतो आहे. पण प्रत्यक्षात माणसाच्या अंत:करणात मागणी एकच असते की हे सुंदर जग बनवणारा शामसुंदर, प्रभू किती सुंदर असेल! त्याला शोधायचं आहे. सदवर्तनाने आणि धार्मिक आचणाने जीव ईश्वराच्या जवळ येऊ लागतो. परंतु जवळ येऊनही ...

संपूर्ण जग चालवणारा भगवंत मला पाहिजे.

Image
तुज आहे तुझ्यापाशी     एखादा ईश्वर भक्त येतो आणि हळूच विचारतो, 'अरे बाबा! तू पूजा का करतोस? तेव्हा तो म्हणतो, 'काय सांगू? आज पर्यंत इतके लोक माझी पूजा पाहत आहेत. कोणी मला भगत म्हणून हाक मारतात, कोणी वैष्णव म्हणून हाक मारतात, पण मला कोणी असे विचारत नाही की मी पूजा कशाकरता करतो आहे? कोणाला वाटते की हे मी नोकरीसाठी करत असेन, कोणाला वाटते मुलासाठी करत असेन, तर कोणाला वाटते की मेल्यानंतर स्वर्ग- पुण्य मिळावे म्हणून पूजा करत असेन. पण तू आज मला विचारलेस! मी मोकळ्या मनाने तुला सांगतो की मला पैसा नको, मला कीर्ती नको. मला मुक्ती, धनसंपदा... काही काहीच नको. हा जगदाधार जगदीश, की ज्याच्या आधारे हे संपूर्ण जग चालते आहे तो असा लपून का बसला आहे? मला त्याला पाहायचा आहे. यासाठीच हा माझा आटापिटा चालू आहे.'       तेव्हा ईश्वरभक्त म्हणतो, 'असं! यासाठी तू इतकी धावपळ करतो आहेस? यासाठी तू नामजप करतो आहेस? तुला असे वाटते का की भगवंताचा नामजप केल्याने भगवंत मिळेल? हा तुझा मूर्खपणा आहे. तू ज्या शक्तीने नामजप करतो आहेस ती शक्तीच भगवंत होय.' नाम घेतल्यानंतर नव्हे तर नाम घेऊ...

जीवानाचा विकास

जीवाचा विकास  केवळ सदवर्तन किंवा पुण्यकारक कर्मावरच समाधान मानून चुपचाप न बसता तो जीव मग भगवंताला शोधू लागतो. खूप शोध घेऊ लागतो की ईश्वर कुठे आहे?  एक माणूस हातात जळता कंदील घेऊन इथे तिथे फिरत होता. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते. कोणाला असे वाटले की त्याची काहीतरी वस्तू हरवली असेल. पैसे पडले असतील, हिरा पडला असेल, दागिना हरवला असेल किंवा दुसरे काहीतरी पडले असेल ते तो शोधत असेल. कोणाला वाटले त्याच्या मुलाला शोधत असेल. असे एक एक समजून रस्त्यातून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे पाहत होते की गरीब माणूस आहे. काही हरवले आहे ते शोधतो आहे, शोधू द्या त्याला आपण कोणाच्या वैयक्तिक बाबी मध्ये पडण्याची काय गरज? इतकी माणसे जात-येत होती. त्यामध्ये एक कोणी ईश्वर भक्त होता. त्याला वाटले की हा माणूस काय शोधतो आहे ते त्याला विचारू या. तर मग थोडे अंतर थांबून त्याच्याजवळ जाऊन त्याने विचारले, 'अहो तुम्ही ते काय शोधत आहात?' तेव्हा तो माणूस म्हणाला, 'काय करू, माझ्या कंदील शोधतो आहे . 'कंदील? कंदील तर हा काय तुमच्या हातातच आहे.' तेव्हा तो शोधणारा माणूस म्हणाला, 'अरे हे काय! खरच की! बरं झ...

श्राद्धपक्ष

श्राद्धपक्ष     भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्षाचा पंधरवडा श्राद्धपक्ष अथवा पितृपक्ष किंवा महालय पक्ष म्हणून संबोधण्यात येतो. हे दिवस म्हणजे पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या स्मरण तर्पनाचे दिवस. श्राद्ध म्हणजे श्रद्धाया यत् क्रियेते तत्| श्रद्धेने जी अंजली अर्पण करण्यात येते. त्याला श्राद्ध म्हणण्यात येते. या पूर्वजांनी व पितरांनी आपल्या कल्याणासाठी चामडी झिजविली, रक्ताचे पाणी केले, त्या सर्वांचे श्रद्धेने स्मरण करून ते ज्या योनीत असतील त्या योनीत त्यांना दुःख होऊ नये, सुख व शांती मिळावी, यासाठी पिंडदान व तर्पण करायचं म्हणजे श्राद्ध.      तर्पण करायचं म्हणजे तृप्त करायचे, संतुष्ट करायचे. ज्या विचारासाठी ज्या धर्म व संस्कृतीसाठी त्यांनी स्वतःचे जीवन खर्च केलेले असेल ते विचार धर्म व संस्कृती टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्यांची अब्रू, प्रतिष्ठा वाढावी असे वर्तन व जीवन ठेवले तर ते आवश्य तृप्त होतील. रोज देव, पितर व ऋषी तृप्त राहावेत असे जीवन जगले पाहिजे आणि वर्षभरात एक दिवस ज्या पितरांना, ऋषींना आपण मानलेले असेल त्यांच्या श्रद्धा निमित्त आपण आपल्या जीवनाचे आत्मपरी...

गौरी पूजन

गोवरी पूजन हा एक पारंपरिक हिंदू सण आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्रातील महिलांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गोवरी पूजन श्रावण महिन्यातील महत्वाचे व्रत आहे आणि याचा संबंध प्रामुख्याने गौरी व महालक्ष्मीच्या पूजनाशी असतो. हे व्रत श्रावण महिन्याच्या शेवटी, भाद्रपद महिन्यातील पहिल्या आठवड्यात साजरे केले जाते. गोवरी पूजनाचा महत्व: गोवरी पूजन हे स्त्रिया आपल्या कुटुंबातील समृद्धी, सुख, शांतता आणि संपन्नतेसाठी करतात. यामध्ये गौरी किंवा महालक्ष्मीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा केली जाते. स्त्रिया गहू, हरभरा, फळे, फुलं, मिठाई आणि नारळ ठेवून देवीची मनोभावे पूजा करतात. हा सण स्त्रिया एकत्र येऊन समूहाने साजरा करतात. विधी: 1. मूर्ती स्थापना: भाद्रपद महिन्यातल्या कोणत्याही शुभ दिवशी गौरीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी मातीतून किंवा धातूमधून मूर्ती तयार केली जाते.    2. पूजन: पूजेसाठी केळीचे खांब, पानांचे तोरण व फुलांची सजावट केली जाते. देवीची पूजा करताना अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण केले जातात.    3. नैवेद्य: नैवेद्य म्हणून विविध प्रकारचे पदार्थ बनवल...