Posts

Showing posts from March, 2024

स्वाध्याय म्हणजे काय ?

Image
                 स्वाध्याय जेव्हा तेजस्वी ग्रंथाचा झाला पाहिजे. स्वाध्याय करणारा आणि करावीनाराणामध्ये आत्मिक प्रेम असले पाहिजे. स्वाध्याय म्हणजे व्याख्यान नाही. स्वाध्याय आख्यान पण नाही. स्वाध्यायात जाहिरात नसते. अमुक दिवशी फलाना वक्ता बोलणार आहे. अशी जाहिरात असेल तर त्याला व्याख्यान म्हणतात. अख्यान, व्याख्यान वेगळे आणि स्वाध्याय वेगळा. स्वाध्यायात श्रोता, वक्ता यांच्यात एकता असली पाहिजे. वक्त्याला स्रोत्यांना बघण्याची उत्कट इच्छा झाली पाहिजे. आणि वक्त्याला पाहून श्रोत्यांचा हृदय सागर उच्चंबळून आला पाहिजे. अशी श्रोता व वक्ता यांच्यात ऐक्य ज्या ठिकाणी असेल तिथे स्वाध्याय सुरू होईल. जिथे ऐक्य आहे तिथे भगवंत येतो .        स्वाध्यायात आत्मियतेचा संबंध आहे. स्वाध्यायात वैदिक तत्त्वज्ञान पाहिजे. स्वाध्याय येणारा स्वतः श्रद्धेनेच येतो. तो प्रेमाने स्वाध्याय करतो. स्वाध्यायाला येणाऱ्या श्रद्धाचे वर्णन केले पाहिजे. श्रद्धा भक्ती समायुक्ता नान्यकार्येसू लालसा| याला पुण्यशाली श्रद्धा म्हणतात. तो जे ऐकतो त्याला श्रवण...

तिन्ही काळांचा विचार करत चाललेले आध्यात्मिक जीवन

Image
गती               भुतं, भविष्य आणि वर्तमान हे तीन काळ बघणारा , विचार करणारा अध्यात्मिक आहे, त्याचे समृद्ध जीवन सुखी होते. भूतकाळात कृतज्ञता येते. एकेकाळी कुणी प्रेम केले होते, आता त्याची जरूर नाही, तरी पण त्याची आठवण ठेवली पाहिजे. ज्याच्या प्रेमामुळे आता मी उभा राहिलो आहे त्याची आठवण ठेवणे हा भूतकाळ आहे, त्यात कृतज्ञता आहे. अशी कृतज्ञता उभी केली पाहिजे. वर्तमानात भाव आणि प्रेम येते. मला कुणाला भाव आणि प्रेम द्यायचे आहे. प्रेम ही मिळविण्याची गोष्ट नाही, देण्याची गोष्ट आहे, ही विशुद्ध जीवनाची परिणती आहे. प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही. तुम्ही प्रेम देत जा म्हणजे समोरच्याचे प्रेम मिळत राहील. आपण देण्यात कंजूष आहोत आणि घेण्यात? ते सांगण्याची गरज नाही की आपण घ्यायला शिकलो आहोत. तुम्ही कुणाला प्रेम दिले नाही, तुमच्यावर कोणी केलेले प्रेम समजण्याची जाण पण तुमच्यात नाही, प्रेम उचलण्याची तयारी नसेल, प्रेम समजण्याची बुद्धीत शक्ती नसेल तर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये असले तरी पण तुम्ही सुखी होणार नाहीत. देवाने स्वतः येऊन तुम्हाला सुखी करण्याचा प्रय...

अहम ब्रह्मास्मी - भगवंत सर्वव्यापी आहे का ?

Image
  Aham Brahmasmi (ah-HUM brah-MAHS-mee) is a Sanskrit sutra  अहम ब्रह्मास्मी          भगवंत सर्व व्यापक आहे. प्रथम माझ्यात भगवंत आहे. जोपर्यंत ही दृष्टी येत नाही तोपर्यंत व्यक्ती दिनच राहते. भगवंत माझ्यासोबत आहे ही दृष्टी सतत मिळायला हवी. यासाठी जाणवे घालायचे असते. जाणव्याचा आणि कर्मकांडाचा काही संबंध नाही. पण जानवे आणि अध्यात्माचा संबंध आहे. परंतु ते कर्मकांड बनले आहे. त्यामुळे जातिवाद उभा राहिलेला आहे. जाणव्याचा मूळ अर्थच निघून गेल्यानंतर दुसऱ काय होणार? जाणव्यामध्ये आपण आपल्या हातानेच भगवंताला बसवतो, प्राणप्रतिष्ठा करतो.               माझ्याबरोबर भगवंत आहे ही दृष्टी आली तर व्यक्तीचे जीवन नियंत्रित तर होईलच पण त्याचबरोबर व्यक्तीला उत्साह पण मिळेल. माझ्याबरोबर माझा भगवंत आहे ही कल्पना व्यक्तीला गुदगुल्या करते. ज्याला याचा प्रत्यक्ष अनुभव होत असेल त्याचे काय होत असेल? अहम ब्रह्मास्मी| चे ज्ञान आधीपासूनच असले पाहिजे आणि शेवटी त्याचा अनुभव येतो. मानवी जीवन विकसित करण्यासाठी माझ्यात भगवंत आहे हे ज्ञान झालेच पाहिजे. ...

शरीरातील चमत्कार - आपल्या शरीरातील होणारे चमत्कार

Image
 शरीरातील चमत्कार          विचार करा, झोप कोणी दिली? झोप कशासाठी दिली? झोप म्हणजे काय? त्या शरीराच्या बाबतीत विचार केला तर बुद्धीला चक्कर येईल. प्रथम आपल्या स्वतःला ओळखा. तरीदेखील बुद्धीला चक्कर येते. भगवंताने मला किती चांगल्या रीतीने सांभाळले आहे. कसे दात दिले आहेत! संपूर्ण शरीर पोटात तयार होते, पण आईच्या पोटात जीव असतो तेव्हा दात तयार होत नाहीत. जन्माल्यानंतर काही महिन्याने दात येतात. त्याचे कारण काय? जीव जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतो तो कशाप्रकारे, त्याचे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटते. ही बाब लाजवाब आहे.              जोपर्यंत शरीरात ऑक्सिजन जात नाही तोपर्यंत लिव्हर मध्ये शक्ती पैदा होत नाही. अन्नरस तयार होत नाहीत. जर जन्मा सोबतच बालकाला दात असते तर काय झाले असते? या बालकाच्या अठरा वर्षाच्या आईच्या हातात पुष्कळ मोठा जीव भगवान देतो. आई बिस्किट खाते तेव्हा बाळाला सुद्धा भरले तर काय होईल? बाळ मरून जाईल. भगवंताला त्याला सांभाळायचं आहे. म्हणून जन्माल्यानंतर बाळाला हळूहळू दात देतो. भगवंताने आपल्यावरती केवढे प्रेम केले आह...

सृष्टीवर असलेले भगवंताचे अस्तित्व

Image
भगवंताचे अस्तित्व          ते तत्व बुद्धिहून पर आहे. तुम्ही बुद्धीने ते समजून घेऊ शकता; परंतु त्याचा अनुभव बुद्धीने घेता येत नाही. बुद्धीने भगवंताचे अस्तित्व निश्चित होते. तो तुझ्या सोबत आहे आणि आतल्या साऱ्या क्रिया तो चालवत आहे हे समजले पाहिजे. तू स्वतःला जाणून घे. तू कोण आहेस, तुझ्या आत काय मसाला भरला आहे, तुझे जीवन कसे चालते आहे, कोण चालवतो आहे, हे जाणून घे.              मला दोन डोळे कशासाठी दिले आहेत? दोन डोळ्यांची काय गरज आहे? एकच डोळा असता तर काय झाले नसते? एका डोळ्याने त्रिमिती समजत नाही असा शोध लागला तेव्हा आपल्याला लक्षात आले की दोन डोळे असले पाहिजेत. कोणी हा विचार केलाय का की मला दोन डोळे कोणी दिले? ना बापाला माहित, नाही मला माहित.           देणारा कोणी दुसराच आहे. हे आधी बुद्धीने नक्की करावे लागेल की भगवंत माझ्यासोबत आहे. भगवंताने केवढे सुंदर डोळे दिले आहेत!  बोलतो कोण, तर तो;  फिरवतो कोण, तर तो;  चालवतो कोण, तर तो.         पण आपल्याला असे व...

भगवंताची जागा कुठे असावी ?

Image
हृदयस्थ भगवंत              आज आपण भगवंतावर प्रेम करतो. पण ते सापेक्ष प्रेम आहे. आपल्याला काही ना काही पाहिजे आणि ते भगवंताकडून मिळेल असे वाटते म्हणून आपले भगवंतावर प्रेम आहे. त्याच्यापुढे जाऊन, बुद्धी चालवली तर भगवंताबद्दल कदर भावना निर्माण होते, नी प्रेम सुरू होते. त्या स्थितीच्याही पुढे गेल्यावर ऐक्य पूर्ण गुढ अशरीरी प्रेम सुरू होते. गीतेचा हाच पुरुषार्थ आहे. जोपर्यंत ज्ञानासाठी आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत व्यक्ती वा समाज सुधारणे अशक्य आहे. मला माझ्या भगवंताला जाब द्यावा लागणार आहे. माझ्यासोबत माझा भगवान आहे. ही प्रथम समज आली पाहिजे. त्याच्या योगे माणसाचा आत्मसन्मान वाढेल.           मी कोण आहे? माझ्यापाशी काय आहे? माझ्यापाशी वित्त नाही, माझ्यापाशी बुद्धी नाही, माझ्यापाशी खुर्ची नाही तर मग माझी काय किंमत? अरे तुझ्यासोबत विश्व चालवणारा आहे; हे ध्यानात आले तर तुझ्या डोळ्यात चमक येईल, तेज येईल. आज सगळ्यांना पिडीत, गरीब, बिचारे म्हणून त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण वास्तविक त्याच्यामुळे ते अजून खाल...

होळी का साजरी करावी ?

Image
होळीचा संदेश           प्रल्हादाने लहान मोठ्या सर्वांना प्राणवान बनवले. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी खांबातून नरसिंह प्रगटला तो हाच! खांबासारख्या जड, चेतना शून्य व निष्क्रिय बनलेल्या लोकात प्रल्हादाने प्राण भरला. नरांमध्ये सिंह प्रगटवला. नरातील प्रेम व सिंहात असलेला अविवेक किंवा साहस एकत्र झाले आणि त्याने हिरण्यकश्यपूला मारले. लोक हृदयात असलेल्या प्रलादाबद्दलच्या प्रेमामुळे लोक अविवेकी बनले आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या सहासवृत्तीने त्यांना हिरण्यकश्यपू ला मारण्याची प्रेरणा दिली. हिरण्यकश्यपूला नर किंवा पशु, घरात किंवा बाहेर, रात्री केव्हा दिवसा कोण मारू शकणार नाही असे वरदान होते. ते त्याच्या अतिशय कडक आत्मरक्षणाच्या व्यवस्थेचे द्योतक होते. असत् वृत्ती आतून घाबरलेलीच असते. ती स्वतःच्या रक्षणाचे नेहमी अशीच कडक व्यवस्था करते. परंतु जनमानसात जागृती झाल्यानंतर त्या असत वृत्तीला विराट नरसिंहसमोर नमावेच लागते. लोकजागृती व लोकसंघटन यांच्यासमोर दुष्ट वृत्तीचा पराभव होतो; ही गोष्ट होळी आपल्याला समजावते.       होळीमध्ये केवळ निकामी वस्तू कि...

होळीची अग्निपूजा विधी

Image
होळीची अग्निपूजा      आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादा सारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेची हजारो वर्षापासून आपण कशासाठी पूजन करतो? होलिकेच्या होत असलेल्या पूजनाच्या मागे एका दुसऱ्याच गोष्टीचे स्मरण आहे. ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्निप्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये यासाठी त्याची प्रार्थना केली होती. प्रल्हादाने लोक हृदयाला इतके जिंकले होते. त्याचे या घटनेवर प्रतिबिंब पडलेले आहे. आग्नीने लोकांच्या अंतकरणाची प्रार्थना स्वीकारली. लोकांनी इच्छिले होते ते घडले. होलिका नष्ट झाली आणि अग्नीदिव्यातून पार उतरलेला प्रल्हाद नर श्रेष्ठ बनला. प्रल्हादाला वाचविण्याच्या उद्देशाने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमांमध्ये सामुदायिक पूजेत रुपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौका-चौकात होत असलेली होलिका-पूजा रूढ झाली. यादृष्टीने पाहता, होली का पूजन हे असद्वृत्तीच्या नाश्यासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या ह्रदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतिक आहे आण...

होळीची कथा -हिरण्यकश्यपू आणि मुलगा फक्त प्रल्हाद यांच्यावर आधारित

Image
    होळीची कथा        होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याला सर्वत्र हिरण्य म्हणजे सोनेच दिसत होते. भोगच त्याच्या जिवनाचा प्रधान भाग होता. राक्षस म्हणजे खा, प्या, मजा करा अशा मनोवृत्तीचा मानव. भोगाशिवाय हालत नाही व स्वार्थाशिवाय पाऊल उचलत नाही. त्याच्या राज्यात ही त्याने सर्वांना खायला भाकरी व राहायला घर मिळावे एवढेच पाहण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या भाव- जीवनाकडे त्यांनी निरंतर दुर्लक्ष केले. स्वतःलाच ईश्वर समजणारा तो दुसरा ईश्वर कोठून स्वीकारणार?         चिखलात कमळ, तसा त्याच्या घरात भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदाच्या आश्रमात राहिली होती. तेथील संस्काराचा परिणाम प्रलादावर झाला होता. प्रल्हादाचे अंतकरण भगवद्भक्तीने भरलेले होते. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचा अनेक प्रयत्न केले पण निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रल्हादाचा ईश्वरवाद जर...

होळी - फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा उत्सव

Image
होळी  फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी. ' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. त्या दिवशी लोक थोड्या स्वौरपणे वागतात.कडक शिस्त व शिथिल स्वौराचार यांच्या मधला बिंदू जो शोधून काढतो तोच होळीचा उत्सव मनापासून साजरा करू शकतो.        होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव! परंतु वसंताच्या वैभवातही संयमाचे सूत्र विसरता कामा नये. भगवान शंकराने केलेले काम दहनही एक सुंदर तत्व सांगून जाते. वसंतला निमित्त करून जर काम शिवत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर तो स्वतःचा नाशच जवळ आणिल. मर्यादित असलेला काम भगवंताचे विभूती आहे आणि मर्यादा ओलांडली तर ते त्याला आत्मघातक आहे.

संतती - उद्याचा काळ जगण्यासाठी चांगल्या संगतीत वाढलेली संतान.

संगती              संगतीची वेगवेगळी रूपे आहेत. गुणसंगती, विचार संगती, स्वाध्याय पण सत्संग आहे, जर तो चांगल्या प्रकारे समजलो तर! आपल्याला मुक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, एवढ्यासाठी सत्संग आणि स्वाध्याय आपण करत असतो. मुक्ती पाहिजे ही तर उच्च गोष्ट आहे. मुक्ती पाहिजे ही दुसरी गोष्ट आहे. आपल्याला संगती पाहिजे- विचारांची आणि व्यक्तीची संगत पाहिजे. संतती चांगली मिळाली तर अर्थातच संकल्प चांगला होतो.            इथे येणारे लोक वेगवेगळ्या वृत्तीचे असतात. तरुणांना जर चांगली संगती मिळाली, चार स्वाध्याय मित्र मिळाले, परिवार मिळाला तर तरुण बिघडणार नाही, त्यांना भक्ती कळली आहे की नाही ते मला माहित नाही, परंतु तरुण बिघडणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. दहा स्वाध्यायी तरूण एकत्र आले तर त्यांना चांगली संगती लाभेल. अशा संगतीसाठी पण स्वाध्याय आहे. ही गोष्ट लोक समजत नाहीत.             सुखी घरातल्या मुलांना अत्यंत आवश्यकता आहे ती संगतीची. ज्याप्रमाणे जमवलेली लग्न होतात तसेच जमवलेली मित्रता झाली पाहिजे. रस्त्यात मैत्री ...