Posts

Showing posts from February, 2025

Manifestation Affirmations | सिद्धीच्या सकारात्मक पुष्टि

Image
    जगातली कीर्ती मिळते. जगातली कीर्ती मिळाली की सगळी दुनिया कीर्ती देते आहे असं समजून आपण जगदीशाला विसरतो. खरं तर जी गोष्ट सामान्य कुत्राही करत नाही ती आपण करतो आणि स्वतःला शहाणे समजत असतो हेच एक आश्चर्य आहे! कुत्र्याला तुम्ही काठी मारली तर कुत्रा काठीला चावतो की तुम्हाला? तुम्हाला चावतो. कारण त्याला हे कळतं की मला काठीचा मार माणसामुळे मिळाला आहे. एवढं साधं logic - तर्क सामान्य कुत्र्याकडे आहे, परंतु तेही शंकररावाकडे नाही. त्याला लोकांकडून कीर्ती लाभू लागली की तो लोकांची पूजा करू लागतो. अरे लोकांनी कीर्ती दिली, जगाने कीर्ती दिली याचं खरं कारण जगदीश आहे. पण हे तो विसरतो. त्यामध्ये logic तर्क कनेक्ट चालवतच नाही तो. अशा बथ्थड शंकररावाबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं की I pity him त्याची कीव करायला हवी. किंवा करण्यासारखा कोणी प्राणी असेल तर तो हा मानवप्राणीच होय. कारण की त्याची अक्कल क्षणाक्षणाला कमी कमीच होत जाते आहे. तेव्हा त्याची उरली सूरली अक्कल केव्हा नाहीशी होईल याचा काही नियम नाही. जगातली कीर्ती मिळताच माणसाला लोकांचे पाय धरण्याची इच्छा होते आणि तो जगदीशाला पार ...

A lifelong addiction | अजन्म जडलेलं व्यसनच

Image
      देवाचे जे प्रथम श्रेणीचे - फर्स्ट क्लास लोक आहेत त्यांनी स्वाध्याय करायला हवा असं आमच्या शास्त्रकारांनी सांगून ठेवला आहे. परंतु होतं काय की हे प्रथम वा द्वितीय श्रेणीचे लोक स्वाध्याय करण्यासाठी हॉल बांधून देतात आणि तृतीय श्रेणीतले थर्ड क्लास लोक गीता शिकतात. हे फर्स्ट क्लास लोक मात्र चीरूट ओढीत क्लब मध्ये पत्ते खेळत बसलेले असतात. हे जे चित्र आहे ते काही बरोबर नाही. एखादी व्यक्ती गीता हॉल बांधायला निघाली तर तिला सांगा की, 'आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही तुमची गरज आहे‌. तुम्ही नियमित स्वाध्याय करायला येणार का? तुम्ही स्वाध्याय करायला येणार असला तर बोला. नाहीतर हॉल बांधून आमच्यावर उपकार करण्याची काही गरज नाही. आम्ही झाडाखाली बसून गीता वाचू.' परंतु लोक असं बोलून दाखवण्याची हिंमत  दाखवत नाहीत. म्हणून मग ते शेठजीच्या घरी दहा दहा हेलपाटे मारतात. कारण की शेटजींना सुद्धा किती म्हणून काम असतं जगभरातलं!      अशी काही लोकांना दहा-दहा वेळा दहा ठिकाणी नको नको त्या कारणासाठी नाचण्याची खोडच असते. तशीच काही काही लोकांना भीक मागण्याची सवयच लागलेली असत...

Umbrella of Spirituality | अध्यात्माची छत्री

Image
    रघुवंशी राजांच्या कुळातून आठ - आठ पिढ्यापर्यंत लक्ष्मी गेली नाही असं वर्णन आहे. त्यांच्या जवळची लक्ष्मी जाईलच कशी? जाणेच शक्य नाही.       भले विश्वातले सगळे भोगेश्वर आहेत, पण आमचे पूर्वज भोगांना घाबरले नाहीत. त्यांनी ते ते भोग आपल्या खिशात ठेवले. त्या भोगांमध्ये अडकून भोगलंपट न होता, भोगांना ना भक्तीकडे घेऊन जाऊन पुढे आत्मज्ञानाचा मार्ग अनुसरणारे जे लोक आहेत त्यांनाच खरोखर हे भोग पचले आहेत असं म्हणायला हवं. त्यांनीच खरोखर पैसा पचवला आहे. या वैश्विक भोगामधल्या नश्वरतेची भीती काढून टाकून माणसाने पुढे जायला हवं‌. भोग समोर आल्यावरही माणूस चलित होणार नाही, हे फार कठीण आहे.       जोपर्यंत पैसा मिळालेला नाही तोपर्यंत हे बोलता येतं. पैसा मिळायला लागला, अरे, चारही बाजूंनी पैशांचा वर्षाव व्हायला लागला की माणसाचं डोकं ठिकाणावर राहतच नाही! मग चांगल्या कार्यासाठी सुद्धा तो म्हणतो no time हे असं होणारच हे समजून चला! देवाचं काम करण्याची वेळ आली रे आली की हा माणूस त्यातून आपलं अंग काढून घेणार. कारण की चारही बाजूने त्याच्यावर पैशांची बरसात होते आहे...

Fortune is fickle | लक्ष्मीवान चंचल आहे

Image
              जोपर्यंत पैसा नसतो तोपर्यंत किती मनोभावे नमस्कार करत असतो की देवा! जर का तू मला पैसा दिलास ना तर रुपयातले चार आणे तुझे ठरलं; पण पैसा मिळाल्यावर त्याचा विचार बदलतो आणि तो म्हणू लागतो की इतक्या पैशाची देवाला काय गरज? गीतेतही लिहिलं आहे की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्| भगवंताला एवढी काही गरज नाही असा विचार माणसाच्या मनात यायला लागला की माणूस भ्रष्ट व अधपतीत झालाच म्हणून समजा. तेव्हा चंचल वृत्ती ही लक्ष्मीची नाही तर लक्ष्मीवंताची आहे. लक्ष्मीला चंचल म्हणून दोष देऊ नका. लक्ष्मी क्षणभंगुर आहे, चंचल आहे असं बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण की ती पत्नी कोणाची आहे? नारायणाची ना! अरे तुमच्या पत्नीबद्दल जर तुम्हाला असं कोणी म्हणाला की, 'तुमच्या पत्नीत बाकी सगळे गुण आहेत, पण त्या चंचल आहेत.' तर तुम्ही पायातला जोडाच काढाल की नाही! तर नारायण नाही का काढणार?         जिथे आपल्यासारखा शरीरात धमक नसलेला माणूस हे ऐकून गरम होतो तिथे नारायण नाही का गरम होणार! बस, जो उठला तो लागला लक्ष्मीला शिव्या घालायला. कारण ...

Fearless attitude/mindset | निर्भयवृत्ती

Image
          जीवनात जर निर्भयवृत्ती आली तर उन्मतपणा येण्याचाही संभव आहे. माणूस श्रेष्ठ बनला की मग आध्यात्मिक दृष्टीने त्याला दुसऱ्याची क्षुद्रता येऊ लागते. अध्यात्मिक श्रेष्ठता मिळू लागली की त्याचा अहंकार पुष्ट होतो आणि मग विस्तीर्ण प्रतिष्ठा त्याला मिळू लागते. अहो लोक भगवान म्हणूनच त्याची पूजा करू लागतात. मग त्याला स्वतःला देखील वाटायला लागतं की, 'मला देव मानून लोक पाया पडतात म्हणजे माझ्यात काहीतरी दिव्यत्व नक्कीच असलं पाहिजे. मी नक्कीच देव असलो पाहिजे.' हे सर्व त्यातले दोष आहेत. अध्यात्मिकतेत माणसाने अतिशय खंबीरपणे प्रगतीपथावर चालण्याची गरज असते.        विश्वातल्या भोगामध्ये नश्वरता आहे हे ध्यानात घेऊन हे भोग आपल्या खिशात ठेवून आत्मज्ञानाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे प्राप्त झालं ते खिशात ठेवा आणि जे मिळालं नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा. हेच जीवन आहे. कोणताही भोग आपल्या जवळ राखण्यात काही गैर नाही. मात्र त्याच्यासोबत यमराजाने सांगितलेला कानमंत्र महत्त्वाचा आहे. यमराज सांगतात की, अधृवात ध्रुव पहा,' याचा अर्थ अध्रुव टाकून ...

Neutrality is indeed a matter of appreciation | तटस्थता हा कौतुकाचाच विषय

Image
    अध्रुवात ध्रुव पाहण्याची शक्ती फक्त अशाच माणसात असते. इतकं सारं वैभव मिळाल्यावरही तो माणूस अधृवात ध्रुव पाहू शकतो‌. कारण त्याने या सर्व सिद्धी पचवल्या आहेत. यमराज येथे नचिकेत्याला समोर ठेवून हे समजावत आहेत. नाहीतर आज तर रस्त्यात बसलेला कोणीही माणूस बोलतो की, 'भगवंत सर्व व्यापक आहे. सगळ्यांच्या ठायी भगवंत आहे.' परंतु तसा दृष्टिकोन येण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी त्याने पचवलेल्या असल्या पाहिजेत. आणि ही एक एक परीक्षा इतकी कठीण आहे की त्यात माणूस उत्तीर्णच होत नाही. हे सार वैभव नचिकेत्याच्या पायापाशी आलेले असून देखील अतिशय धीरपणे, अतिशय गंभीरपणे तो त्या सर्वापासून तटस्थ आणि स्वतंत्र राहिला आहे हा एक कौतुकाचाच विषय आहे. यमराजांना नचकेत्याची केवळ स्तुती करायची नाहीये तर ते आत्मज्ञाना पर्यंत पोहोचवण्याचे रस्ते आणि पायऱ्या यातून समजावत आहेत. आणि ते नचकेत्याच्या स्तुती द्वारे समजावत आहेत. विविध प्रकारच्या सिध्दी जेव्हा पाया पाशी हात जोडून उभ्या असतात तेव्हा त्या पचवणं खरोखर कठीण आहे. कल्पवृक्षासारखं जीवन माणसाला लाभतं, समग्र जगात कीर्ती प्राप्त होते, यज्ञाची दीर्घ जीवी ...

Steadfast Man | धीर पुरुष

Image
छत्रपती शिवाजी महाराज  आजच्या मंत्रात यमराज नचिकेत्याला उद्देशून पुष्कळ काही सांगत आहेत. इच्छांचं टोक, परमावधी, जगात प्राप्त होणारी प्रतिष्ठा, यज्ञाच दीर्घजीवी फळ, अभयतेची पराकाष्ठा, स्तुत्य जीवन, महानता, मोठेपणा, व्यापक प्रतिष्ठा, हे सर्व पाहिल्यानंतर देखील अतिशय गंभीरपणे हे नचिकेता हे सर्व फेकून दिलं तेव्हा तू धीर आहेस. नाचेकेत्याने काय काय फेकून दिलय त्याचं हे वर्णन आहे. त्याने पायापाशी आलेल्या या सगळ्या गोष्टी अतिशय धीरपणे, गंभीरपणे दूर केल्या आहेत. हे सर्व वैभव स्वीकारलं तर मी मार्ग चुकेन की काय? मी या सगळ्या गोष्टी सांभाळू शकेन की नाही? या संख्येने त्याने या गोष्टी दूर केल्या नाहीत; त्याचप्रमाणे भीतीपोटी देखील त्याने त्या केलेल्या नाही. पुष्कळसे लोक भीतीपोटी त्या करतात. तर काही लोक क्षणिक मोहाला बळी पडून वैभवाचा त्याग करतात. नाचिकेत्याचा त्याग अशा प्रकारचा नव्हता. त्याने धीर गंभीरपणे हा त्याग केलेला होता. अतिशय गंभीरपणे त्याने या सगळ्याचा त्याग केला आहे‌. म्हणून तर नचिकेता सिद्ध आहे. या मंत्रात यमराजांचा नचिकेत्याचं कौतुक करण्याचाच केवळ उद्देश नाही, तर आत्मज्ञानाजवळ जाण्यासाठ...