Steadfast Man | धीर पुरुष
छत्रपती शिवाजी महाराज
आजच्या मंत्रात यमराज नचिकेत्याला उद्देशून पुष्कळ काही सांगत आहेत. इच्छांचं टोक, परमावधी, जगात प्राप्त होणारी प्रतिष्ठा, यज्ञाच दीर्घजीवी फळ, अभयतेची पराकाष्ठा, स्तुत्य जीवन, महानता, मोठेपणा, व्यापक प्रतिष्ठा, हे सर्व पाहिल्यानंतर देखील अतिशय गंभीरपणे हे नचिकेता हे सर्व फेकून दिलं तेव्हा तू धीर आहेस.
नाचेकेत्याने काय काय फेकून दिलय त्याचं हे वर्णन आहे. त्याने पायापाशी आलेल्या या सगळ्या गोष्टी अतिशय धीरपणे, गंभीरपणे दूर केल्या आहेत. हे सर्व वैभव स्वीकारलं तर मी मार्ग चुकेन की काय? मी या सगळ्या गोष्टी सांभाळू शकेन की नाही? या संख्येने त्याने या गोष्टी दूर केल्या नाहीत; त्याचप्रमाणे भीतीपोटी देखील त्याने त्या केलेल्या नाही. पुष्कळसे लोक भीतीपोटी त्या करतात. तर काही लोक क्षणिक मोहाला बळी पडून वैभवाचा त्याग करतात. नाचिकेत्याचा त्याग अशा प्रकारचा नव्हता. त्याने धीर गंभीरपणे हा त्याग केलेला होता. अतिशय गंभीरपणे त्याने या सगळ्याचा त्याग केला आहे. म्हणून तर नचिकेता सिद्ध आहे.
या मंत्रात यमराजांचा नचिकेत्याचं कौतुक करण्याचाच केवळ उद्देश नाही, तर आत्मज्ञानाजवळ जाण्यासाठी इतकं सगळं करावं लागतं असा त्यामागचा अभिप्राय आहे. ही समजावण्याचे त्यांची पद्धत आहे. यमराज नचिकेत्याला समक्ष ठेवून समजावत आहेत की, 'या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांमध्ये तो उत्तीर्ण झाला आहेस. माणसाला ही एक एक परीक्षा एका एका जन्मात द्यावी लागते. ही सगळी प्रलोभने तुझ्या पायाशी आलेली होती तरीदेखील तू बाधला नाहीस. आणि तू या परीक्षेमध्ये पास झालास. बुद्धीचा विकास साध्य करून हे नचकेता! तू तर पुण्याची आवश्यकता देखील बंद करून टाकली आहेस असं यमराज येथे सांगत आहेत. त्याला फलरूपतेची आता आवश्यकता नाही आणि पुण्यरूपतेचीही अपेक्षा राहिलेली नाही. पुण्यरूपतेद्वारे शक्ती प्राप्त होते बुद्धी शुद्ध आणि जीवन शुद्धी घडते. अशा माणसाची सत्कार्मे भगवंताला ही आकर्षित करतात. बाकी कुणाची सत्कार्मे स्वीकारायला भगवंत तयार नाही. म्हणून आजच्या मंत्रात नचिकेत्याचे जे वर्णन आहे ते खरोखरच अतिशय कमाल आहे.
नचिकेत्याच्या धैर्याचे आणि त्याच्या निश्चयाचे हे वर्णन अत्यंत प्रेरणादायी आहे. कठोपनिषदातील हा प्रसंग माणसाला त्याच्या ध्येयासाठी किती मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागतो आणि तो करताना कोणत्या गोष्टींचा त्याला मोह सोडावा लागतो, हे दाखवतो.
यमराज नचिकेत्याच्या परीक्षेचा उल्लेख केवळ त्याचे कौतुक करण्यासाठी करत नाहीत, तर आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या तपश्चर्येचे आणि त्यागाचे महत्त्व पटवून देतात. बहुतांश लोक मोह, भीती किंवा क्षणिक सुखाच्या आशेने या परीक्षांमध्ये अपयशी ठरतात, पण नचिकेत्याने मात्र धैर्य, विवेक आणि गंभीरता यांच्यासह त्या सर्व प्रलोभनांना नाकारले.
यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "फलरूपतेची आणि पुण्यरूपतेची आवश्यकता संपली"—जेव्हा साधक शुद्ध बुद्धीने आणि नि:स्वार्थपणे आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतो, तेव्हा त्याला पुण्य-कर्मांचीही आसक्ती राहत नाही. कारण त्याचं जीवनच पावित्र्याने भारलेलं असतं.
हा दृष्टिकोन आजच्या जीवनातही लागू पडतो. मोह, भय, प्रसिद्धी यांचे आकर्षण बाजूला सारून जर माणूस ध्येयावर केंद्रित राहिला, तर तो खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. "धीर पुरुष" म्हणजेच असा जो मोहाने ढळत नाही, भयाने थांबत नाही आणि संधींच्या प्रलोभनाने मार्ग विसरत नाही.

Comments
Post a Comment