Posts

Showing posts from November, 2024

लोकवत्तु लीलाकैवल्यम्

Image
                 सृष्टीकर्त्याचे हेच वैचित्र्य आहे. त्याने भेद निर्माण केला आहे. लोकवत्तु लीलाकैवल्यम्| भेदाशिवाय लीला संभवू शकत नाही. फूल नाकापासून निराळे आहे म्हणून फूलाचा सुगंध अनुभवता येतो. भूक पोटात आहे आणि गहू पोटापासून दूर शेतात आहेत म्हणूनच ते खाण्याचा आनंद आहे. भेदात आनंद आहे, ही एक मोठी तात्विक विचक्षणा आहे. पण ती जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर त्यातील मर्म ताबडतोब ध्यानात येईल.       मी तुम्हाला तुमचा दृष्टांत देतो. रात्री बारा वाजता तुम्ही झोपता तेव्हा तुमचे अस्तित्व होते की नव्हते? माणसाला उठावेसे वाटते कारण जागृती मध्ये खेळायचे असते, झोपेत खेळायचे नसते.      झोप ही घटना दृष्टांत म्हणून समजून घ्यायची तर तिथे अभेद आहे. तिथे खेळणे नाही. मला खेळायचे आहे म्हणून मी उठतो. याप्रमाणे भगवंताचे अस्तित्व अभेदात आहे, आणि भगवंताचे खेळणे भेदामध्ये आहे. म्हणून खेळण्यासाठी लोकवत्तू लीलाकैवल्यम बहु स्याम् प्रजायेयेति - 'मी अनेक व्हावे' अशी त्याला इच्छा झाली.

'ब्रह्माचे बहुभुवन'

Image
            श्रुतीने सांगितले आहे त्या प्रकारची जाणीव दृढ  झाली तर माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल.      भगवंताने, अवघी सृष्टी निर्माण करूया अशी  कामना केली नाही, तर बहु स्यां प्रजायेयेति - मी अनेक बनीन अशी कामना केली आहे.      इथे प्रजायेय या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासारखा आहे. एखादा चित्रकार इच्छा करतो की मी पुष्कळ चित्रे काढीन अथवा एखादा कुंभार इच्छा करतो की मी पुष्कळ मडकी बनवीन, असे हे नाही. चित्रकार चित्र काढतो आणि त्या चित्रापासून निराळा होतो. कुंभार मडके घडवून मडक्यापासून निराळा होतो‌. तो काही मडक्यांमध्ये शिरून त्यात वास करत नाही. मडके पुरे झाले की मडक्या सोबतचा त्याचा संबंध संपला‌. भगवंताचा सृष्टीशी अशा प्रकारचा संबंध नाही. तो तर सृष्टी निर्माण करून त्यातच वास करून आहे. त्याने 'मी सृष्टी निर्माण करतो' अशी इच्छा न करता 'मी स्वतःच अनेक होईल' अशी इच्छा निर्माण केली आहे. म्हणून बहु स्यां प्रजायेये- असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे ब्रह्माचे व्यापक होणे यालाच 'ब्रह्माचे बहुभुवन' म्हणतात, ज...

'जीवन हे काव्य आहे'

Image
        जिवंत असताना आपण काय केले ते प्रत्येकाला माहीत असतेच, पण मरणोत्तर काय स्थिती प्राप्त होणार आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे‌. विद्वान, अविद्वान दोघांमधूनही चैतन्य कधी न कधीतरी निघून जातेच ही वस्तुस्थिती आहे. पण नंतर ते व्यापक चैतन्यामध्येच मिसळून जातात की मग दोहोमध्ये काही अंतर आहे काय?       मरण ही एक अशी समस्या आहे की तिच्याविषयी विचार केल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. गीतेने सांगितले आहे की मरण म्हणजे कपडे बदलणे. आपण म्हणूया की मरण म्हणजे माहेरी जाणे. तर कोणी म्हणेल की मरण म्हणजे आईला भेटायला जाणे‌. पण अशी एवढी साधी सरळ हृदयांगम गोष्ट आहे का? मरणात आकर्षकता असेल तरी ती भयानक आकर्षकता आहे. सामान्यतः असा कोणी माणूस नाही की त्याला मरण हवे आहे!        हा! असे शक्य आहे की दारिद्र्यापायी कंटाळून माणूस असे बोलतोही की,  'यापेक्षा मरण बरे!' पण तो भाव क्षणिकच असतो. शूद्रकाने 'मृच्छकटिक' नाटक लिहिले आहे. त्यात एकदा चारुदत्ताला त्याचा मित्र विचारतो की, 'दारिद्र्य आणि मरण या दोहोतून तू काय पसंत करशील?' तेव्हा तो म्हणतो, द...

भगवंताला जीवनातून वजा करून जीवन निरांदी होईल.

आनंदमयता हा परब्रम्हाचा शारीर आत्मा आहे. जो चोवीस तास तुष्यन्ति च रमन्ति च आहे. म्हणजे आनंदमय आहे त्याला सतत आत्मतत्त्वाचे प्रस्फुरण असते. आनंदमयतेचे वर्णन करताना ऋषी सांगतात, असत् एव स भवति| भगवंताला जीवनातून वजा करून जीवन आनंदमय होणे शक्य नाही. काही जण कदाचित् म्हणत असतील की, 'आम्हाला भगवंताची गरज नाही, आम्ही सुखीच आहोत.' दुनियेला दाखवायला ते सुखी असतील पण आतील आत्मा तर त्यांना डंख मारत असतो. त्यांना वाटत असतेच की जीवनात काहीतरी उणीव आहे, कुठेतरी गफलत होते आहे. त्यांच्या मनात पोकळी असते. मग ती भरून काढण्यासाठी कोणी कीर्तनाच्या नादी तर कोणी क्लबच्या नादी लागतात. कारण ते स्वतःला विसरायला बघत असतात. म्हणून माणूस सर्वत्र जी धावपळ करतो ते स्वतःला विसरून जाण्याच्या इच्छेने करतो. त्याच्या जीवनात तो पळवाट शोधत असतो आणि त्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न सुरू असतात. ज्याप्रमाणे सतत मृत्यूला बरोबर घेऊन फिरणारे सैनिक त्याला विसरण्यासाठी दारू पीत असतात.       सृष्टीला आनंदमय बनवायचे असेल तर सर्वप्रथम सृष्टीमध्ये ईश्वराला घेऊन जा. अर्थात सृष्टीत तर ईश्वर आहेच, पण लोक ते विसरले आहेत.

वैचारिक आनंद

                       जसा अध्यात्मिक आनंदा आणि निद्रेचा आनंद सारखा असतो तसा वैचारिक आनंदही सारखाच असतो. त्यात काडी मात्र ही फरक नसतो. भगवंताने संपूर्ण सृष्टी आनंदमय बनवली असूनही माणूस निरानंदी आहे, हे खरोखरच आश्चर्य आहे.      लोक आपल्याला रडवतात आणि आपण वेड्यासारख्या रडत बसतो. कोणी येऊन मला विचारले की, 'काय, इतकी वर्ष झाली मुंबईत राहून. एखादे घर तरी बांधले नाही? आणि मी म्हटले, 'नाही' तर म्हणतील की, 'एवढी वर्ष मुंबईत राहून फायदा काय?' तेव्हा मलाही वाटते की गोष्ट तर खरी आहे. त्यामुळे मी दुःखी होतो. पण एखादा असे विचारेल की असे फाउंटन पेन तुमच्याकडे नाही आणि मला वाटते अशी एखादे पेन आपल्याकडे असले पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की, वृथा गतं तस्य नरस्य जीवितम् - माझे जीवन फुकट गेले. अशावेळी मला विचार केला पाहिजे की माझ्यापाशी काय आहे आणि काय असले पाहिजे, हे नक्की करणारा तू कोण? त्याच्यापेक्षा मी विशेष आनंदी आहे असे मला वाटले पाहिजे.      भगवंताची भीती आणि त्याच्यावरील अविश्वासामुळे माणूस...