Posts

Showing posts from June, 2024

क्लेश- अभिनिवेश ( आग्रह)

क्लेश- अभिनिवेश अभिनिवेश हा देखील क्लेशच आहे. अभिनवेश म्हणजे आग्रह. हे झालेच 'पाहिजे' असा ज्याचा आग्रह ओसरला असेल त्याचा भगवान सखा होतो. त्याच्याशी भगवंत संबंध बांधतो. म्हणजेच 'ठेविले आनंते तैसेची रहावे' ही वृत्ती जीवनात आणली पाहिजे. काही गोष्टी आपल्याला सोडता आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे जे स्वीकारण्यायोग्य असेल ते स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे.      ज्याच्या जीवनातून हे पाच क्लेश जातात त्याच्यासोबत भगवान संबंध बांधतो. विज्ञान  ज्ञानाने समज निर्माण होते आणि विज्ञानाने अनुभूती येते, त्यामुळे तृप्ती येते. येथे पदार्थ विज्ञानाला उद्देशून विज्ञान शब्द वापरलेला नाही. प्रयोग शाळेत अनुभवाला येथे ते विज्ञान नाही त्या विज्ञानाचे प्रयोग दुसऱ्याच्या शरीरावर होऊ शकतात, माकडांवर, उंदरांवर वैज्ञानिक लोक प्रयोग करतात. परंतु अध्यात्मातले प्रयोग स्वतःच्या शरीरावरच होतात. दुसऱ्याच्या शरीरावर अहं ब्रह्मास्मि चा प्रयोग होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे जाणीव, समज व विज्ञान म्हणजे प्रयोगाद्वारे स्वतःच्या जीवनात त्याचे अनुभूती घेणे. या दोहोंमुळे ज्याचा आत्मा तृप्त झाला आहे, ज्याला हा तृप्तीचा ...

क्लेश- अस्मिता (अहंकार)

 क्लेश- अस्मिता (अहंकार) जशी अविद्याही क्लेश आहे तशी अस्मिता देखील क्लेश आहे. अस्मिता म्हणजे अहंकार. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवान बंधू होऊ शकत नाही. हा अहंकार कोणालाही सोडवत नाही. सगळेच कीर्तनकार रावण, हिरण्यकश्यपू, कीचक या सगळ्यांचे वर्णन करताना सांगतात की, ते सगळे अहंकारी होते म्हणून त्यांचा नाश झाला. मात्र हे कीर्तनकार स्वतः आपला अहंकार सोडू शकत नाहीत. त्यांचे कीर्तन पूर्ण होताच लगबगिनी शेठजींना विचारतात, 'काय शेठजी आजचे कीर्तन कसे काय वाटले? शेठजी जेव्हा म्हणतात, महाराज आजच्या कीर्तनाचे काय वर्णन करायचे! आज तर जणू साक्षात नारद स्वर्गातून उतरून आले होते असे वाटत होते' तेव्हा कीर्तनकार खुष! अशाप्रकारे, वस्तूत: माणूस अहंकारावरच जगत असतो. माणसाला अहंकाराचा मोह आहे. त्याचा अंकार सुटत नाही म्हणून स्वतःचा अहंकार भले बाळगू दे पण त्या अहंकाराला देवाबरोबर जोडायचे आणि 'मी तुझा आहे' असा अहंकार बाळगायचा. 'मी तुझा आहे' हा अहंकार आहे, पण तो अहंकार निर्लेप आहे. जोपर्यंत अस्मिता आहे, स्वतःचा अहंकार आहे तोपर्यंत भगवान् बांधत नाही. राग-व्देष हे देखील क्लेश आहेत. राग- व्द...

क्लेश - माझा कोण आणि शेवटी माझ्यासोबत येणार काय ?

क्लेश - अविद्या अविद्या म्हणजे विरुद्ध समज. योगदर्शन फारच बुद्धिपूर्ण ग्रंथ आहे. त्यात अविद्येची व्याख्या करताना योगदर्शनकार सांगतात. अनित्याला नित्य समजणे, अशुचितेला शूचि समजणे. अनित्याला नित्य समजणे ही अविद्या आहे. आपला जीवनव्यहार तपासला तर जाणवेल की आपले निर्णय टूसतत बदलत राहतात, कोणताही एक निर्णय कायम राहत नाही. अहो आपण आपले संबंध देखील पक्के धरून ठेवू शकत नाही, जीवनात माझा कोण? आणि माझे काय? हे निश्चित नाही. माझे कोण आणि माझे काय? हे ज्याचे पक्के होते तो पुढे जाऊ शकतो. माझे काय? तर ते तर जे माझ्यासमोर येते ते. माझ्यासोबत केवळ माझे कर्म येते. त्यामुळे कर्म माझे.            त्याचप्रमाणे माझा कोण? तर फक्त प्रारब्ध माझा. दुनियातील सगळे सबंध गरज आणि परिस्थितीनुसार बदलतात. आपले सगळे सबंध स्वार्थाचे आहेत. स्वार्थ पूर्ण होताच सबंध सुटतो. पण सबंध प्रभूसोबत चा संबंध से मुअसा आहे की कधीही बदलत नाही‌ आपण वाटल तसे वर्तन केले तरी प्रभू आपल्याला कधीच सोडत नाही. त्याचा सबंध निरंतर आहे. आणि दुसरे सगळे सबंध अनित्य आहेत. प्रभूसोबतच्या अशा नित्य संबंधाला महत्व न देता जे अ...

भगवंता आणि आपल्यात बंधुत्व आणायचा असेल तर दृष्टी बदलली पाहिजे.

Image
 भगवान् बांधव म्हणून आपल्याकडे पाहत असेल तर आपले मन, आपले जीवन असे असले पाहिजे की आपल्यासोबत बंधुत्व करायला भगवंताचे मनही तयार झाले पाहिजे. भगवान आपला रंग किंवा वय पाहत नाही, शिक्षण देखील पाहत नाही. इतकेच नाहीतर भगवान् आपल्याकडे किती पैसे आहेत हे देखील पाहत नाही. तर भगवान आपली जीवनपरंपरा अमुक एक प्रकारचे आहे किंवा नाही ते पाहतो. भगवंताने आपला बंधू हवे म्हणून प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचे? त्याकरता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कपडे बदलले किंवा भगवी वस्त्रे परिधान केली तरी दृष्टिकोन बदलत नाही. दोन पैशाचा गेरू घेऊन कपडे भगवे करता येतातही, त्यामुळे लोक कदाचित नमस्कार ही करतील परंतु भगवान मान्यता देणार नाही.  भगवंताला बांधव बनवायचे असेल तर भगवंताला आवडेल अशी जीवन परंपरा, जीवन संहिता असायला हवी. योगदर्शनकारांनी याचा फार सुंदर उपाय दाखवताना म्हटले आहे. अविद्यास्मिता रागद्वेषाभिनवेश: पंञ्च क्लेशा:| हे क्लेश कमी केल्यानंतरच चित्तवृत्तीनिरोध: होऊ शकतो माणसात जोपर्यंत अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनवेश हे पाच क्लेश आहेत तोपर्यंत भगवान माणसाचा बंधू ...

26 जून 1874 - राजश्री शाहू महाराज जयंती

Image
राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. त्यांचे पूर्ण नाव छत्रपती शाहूजी महाराज होते आणि ते कोल्हापूर संस्थानाचे महाराज होते. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले आणि दलित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले, गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली. शाहू महाराजांनी महिलांच्या शिक्षणावरही भर दिला आणि स्त्रियांना शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांचे शासन कालखंड सामाजिक समता आणि न्यायासाठी प्रेरणादायी होता. 1922 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी 26 जून रोजी शाहू महाराज जयंती साजरी केली जाते.

अनन्यता - या जगात फक्त भगवंत माझा आणि मी भगवंताचा.

Image
अनन्यता      ' या जगतात माझे दुसरे कोणीच नाही. भगवान्! तूच माझी गती आहेस. तूच माझा खरा बंधू आहेस. प्रभू शिवाय आपला या जगतात दुसरा कोणी बांधव नाही.' ही भावना ज्याची दृढ होते त्याला भगवान् उचलतो, तोच अनन्याश्चिन्तयन्तो माम् झाला असे म्हटले जाते.      जोपर्यंत भगवान आहे आणि दुसरा पण आहे अशी समज डोक्यात खेळते आहे तोपर्यंत भगवान देखील विचार करतो की दुसरा मदत करतो आहे तर करू दे! म्हणून केवळ भगवानच आणि दुसरा कोणी नाही'. ही भावना दृढ होणे जरुरी आहे. 

स्वतःच्या पायावर स्वतः उभं असणं गरजेचं.

उद्धरेदात्मनात्मानम् हा गीतेचा सत्य सिद्धांत आहे. Self- Made होण्यात - स्वतःच्या पायावर उभा राहण्यात जो आनंद आहे तो कोणाच्या आधाराने उभा राहत नाही. स्वतः सोडवलेले गणित बरोबर ठरले तर त्याचा जो आनंद होतो तो कोणी दुसऱ्याने सोडवलेले गणित कॉपी करण्यात नाही. कॉपी करणाऱ्याला माहीत नसते की या गणितात एके ठिकाणी समजा तीन आणि दुसऱ्या ठिकाणी सतरा कशासाठी लिहिलेत! अशाच प्रकारे भगवद्भक्त, योगारूढ, स्थितप्रज्ञ किंवा त्रिगुणातीत यांची जी एक विशिष्ट स्थिती आहे, त्याची कोणी 'कॉपी' केली तर त्यात काही अर्थ नाही. हे सर्व सिंह आहेत आणि जगनमाता सिंहीण आहे. सिंहाचा छवा असण्याची पात्रता असलेली व्यक्तीच अशा आईपाशी पोहोचू शकेल! बकरा तिथे पोहोचूच शकणार नाही.  ईश्वर भक्ती केल्याशिवाय आणि ईश्वराचे तादात्म संबंधाशिवाय कोणीही माणूस वर जाऊ शकत नाही. म्हणजेच त्याची उन्नती शक्य नाही. एवढ्या भूमिकेवर पोहोचल्यावरही माणसाने, गीतेत सांगितल्याप्रमाणे स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे. ईश्वरभक्ती आणि गुरुचे मार्गदर्शन या दोहोंचीही आवश्यकता आहे, पण चालायचे आहे ते माणसाने स्वतःच! तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जायला ना...

वटपौर्णिमा

                     वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या सणामागे सत्यवान-सावित्रीची एक प्रसिद्ध कथा आहे. सावित्री एक रूपवती आणि धाडसी स्त्री होती. ती राजा अश्वपतीची कन्या होती. सावित्रीने सत्यवान या राजकुमाराशी विवाह केला. सत्यवान हा अत्यंत धर्मनिष्ठ आणि पराक्रमी होता, परंतु त्याचे जीवन एक वर्षच राहिले होते, अशी भविष्यवाणी झाली होती.                          त्यांच्या विवाहानंतर एक वर्षानंतर सत्यवानाच्या मरणाची वेळ येते. सत्यवान एकदा जंगलात लाकूड तोडण्यासाठी जातो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. यमराज त्याची आत्मा घेऊन जातात. सावित्री यमराजाच्या मागे जाते आणि तिच्या पतीच्या प्राणांची परतफेड करण्याची विनंती करते. तिच्या भक्तीने आणि समर्पणाने प्रभावित होऊन यमराज तिला सत्यवानाचे प्राण परत देतात.              ही घटना ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला घडली, असे मानले जाते. सावित्रीने वडाच्या झाडा...