निर्णयाच्या क्षणीतो डगमगत नाही.
आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा गर्व नव्हे,
तर स्वतःच्या अंतरात्म्यावरचा विश्वास.
बहुतेक लोक म्हणतात—
“मी श्रीमंत होईन, मोठा अधिकारी होईन, यशस्वी होईन.”
पण जेव्हा उपनिषद सांगतात “तत्त्वमसि”, “अहं ब्रह्मास्मि”
तेव्हा मात्र ते अशक्य वाटतं.
इथेच आत्मविश्वासाची खरी कसोटी आहे.
आत्मविश्वास म्हणजे
परिस्थिती अनुकूल आहे म्हणून पुढे जाणे नव्हे, अपयश नसल्यामुळे धाडस करणे नव्हे,
तर अपयश, भीती, गोंधळ यांच्यातही “मी मार्ग शोधू शकतो” ही निश्चयबुद्धी.
गीता म्हणते—
उद्धरेदात्मनाऽत्मानं
स्वतःनेच स्वतःला उचलावं लागतं.
इतर कोणी नाही.
खरा आत्मविश्वास असा म्हणतो :
मी अजून पूर्ण नाही, पण अपूर्णतेतही मी साधक आहे.
मी पडतो, पण मी उठू शकतो.
मी मर्यादित आहे, पण माझ्यात अमर तत्त्व आहे.
ज्या दिवशी माणूस
देह, भूमिका, पद, मान्यता यांवरचा विश्वास कमी करून
स्वतंत्र चेतनेवर विश्वास ठेवतो,
त्या दिवशी आत्मविश्वास जन्माला येतो.
तो गर्जना करत नाही.
तो शांत असतो.
पण निर्णयाच्या क्षणी
तो डगमगत नाही.
Comments
Post a Comment