ईशदर्शन
आपल्यासारख्या सामान्य माणसाला समजा भरपूर पैसा मिळाला तर सर्वात पहिल्यांदा मनात कोणता विचार येईल? भोगाचाच विचार येईल. त्याला म्हणतात भोग चिंतन. 'पैसा मिळताच बंगला घ्यायचा आहे, मोटार घ्यायची आहे' वगैरे विचार सुरू होतात. इतर सामान्य लोकांपेक्षा तुम्ही जर थोडे शहाणे असाल तर तुमच्या मनात भवितव्याचा विचार येतो की, 'काल माझ्यापाशी काहीही नव्हतं आणि आज इतक सगळं मिळाल आहे; पण उद्या हे सारं राहीलच याची काही शाश्वती नाही.' या भूमिकेमध्ये तुम्ही पैशाकडे जरा विवेकी नजरेने पाहता, पण त्यात देखील एक प्रकारचे आगतिकताच असते की नाही! भवितव्याच्या चिंतेत आगतिकता तर आहेच. त्यानंतर प्रभू चिंतन येतं की, 'भगवंता! कमाल केलीस तू! तुझ्या कामासाठी माझ्याकडे तू पैसा पाठवलास! आता मी तुझं पुष्कळ कार्य करीन.' अशा प्रकारे कर्मामध्ये सुद्धा प्रभू दर्शन असेल तर त्याला शुभचिंतन म्हणतात.
हनुमान इतका मोठा गणला गेला त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. त्याने त्याला मिळालेला रत्नहार तोडून फोडून बघितला असं वर्णन आहे. पण तो काय निर्बुद्ध नव्हता. हनुमानाने रत्नाचा स्वीकार केला, पण प्रत्येक रत्न त्याने फोडून पाहिलं, चोखून पाहिलं वगैरे वर्णन आहे ते कशासाठी हेच आपल्याला समजत नाही. हिऱ्यासारख्या रत्नाचा वास घेऊन, चाटून, पाहून, चोखून पाहून काहीही निष्पन्न होणार नाही एवढी ही समज नसेल इतका हनुमान मूर्ख नव्हता. पहिली गोष्ट अशी की हनुमान हा माकड नव्हताच. मनोजवं मारूततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठम् असा तो एक वरिष्ठ बुद्धिमान व्यक्ती होता. भगवान रामचंद्राकडे माणसांची मत दूर सारून हनुमानाच्या मतानुसार चाललेले आहे एवढं त्यांचं मत प्रभावी होतं. बिभीषणाला आपल्या पक्षात घ्यायचं की नाही याच्याबद्दल बहुतेक सर्वांचाच विरोध होता. तो शत्रु पक्षाचा आहे त्यामुळे तो हेरगिरी करण्यासाठी ही आलेला असेल तेव्हा त्याच्याबद्दलची खात्री पटत नाही तोपर्यंत त्याला आपल्या पक्षात घेऊ नये असंच सगळ्यांचं मत होतं. पण बिभीषणाला तत्काळ आपल्यामध्ये घ्या असं सांगणारे एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे हनुमान आणि भगवान रामचंद्राने सर्वांचं मत बाजूला सारून हनुमानाचं मत मान्य केलं आहे आणि बिभीषनचा स्वीकार केला आहे. अशाच प्रकारे वनवासामधून परतण्याच्या वेळी अयोध्येमध्ये ही प्रवेश करताना, भरताच्या हृदयात काय भावना आहे याबाबत सुद्धा हनुमानाच्या मतालाच भगवंतांनी प्रमाण मानल आहे. याचं कारण हनुमानाच्या बुद्धीवर रामाचा पूर्ण विश्वास होता. इतका बुद्धिमान असलेला हनुमान रत्न हातात घेऊन चावून, चोखून पाहील आणि फेकून देईल? बिलकुल नाही. त्यामध्ये हनुमानाची एक आगळीच दृष्टी होती की, 'हे वैभव पुष्कळ आहे खरं, पण याच्यात राम दिसत आहेत का? या वैभवामुळे रामाचं काही काम घडणार आहे का? रामाच्या कामाला त्यामुळे काही साथ सोबत मिळणार आहे का? नसेल तर हे वैभव मी फेकून देतो.' हनुमानाची ही जी भूमिका आहे तिलाच शुभचिंतन म्हणतात.
शुभदर्शन. ज्याला सर्व ठिकाणी प्रभू स्पर्श दिसतो त्याला संपूर्ण सृष्टी रमणीय आणि आत्मीय वाटते. त्याला कावळा देखील सुंदर वाटतो आणि कोकिळ देखील सुंदर वाटतो. अशी माणसं संपूर्ण दुनियायला आत्मशक्तीच्या वस्त्राने आवृत्त असलेलेच पहात असतात. त्यामुळे त्यांना संपूर्ण विश्व रमणीय आणि आत्मीय वाटते. त्यांनी आपल्या डोळ्यांच्या पुतळीतच प्रभुला बसवलेलं असतं. त्यामुळे त्यांना सर्व ठिकाणी ईशदर्शनच घडत असतं.
1. मानसिक स्थितीचा प्रवास – भोग चिंतन ते शुभ चिंतन
> “आपल्यासारख्या सामान्य माणसाला भरपूर पैसा मिळाला तर सर्वप्रथम काय विचार येतो?”
यातून 'भोग चिंतन' ही पहिली पायरी उलगडते. म्हणजेच मनुष्य सहजपणे भौतिक सुखसाधनांकडे वळतो. पुढे ‘भविष्य चिंतन’ हा विचार पुढे आणतो, जे जरा विवेकी मनाला लागू पडणारे आहे.
हे चिंतन काहीसं सत्त्वगुणी वाटतं, पण त्यातही “आगतिकता” आहे – कारण ते भीतीवर आधारित आहे.
आणखी एक पायरी वर – “प्रभू चिंतन” – हे केवळ सकारात्मक नाही, तर ‘सेवाभाव’ निर्माण करणारं आहे.
> “भगवंताने पैसा कार्यासाठी दिला आहे” – हा दृष्टिकोन म्हणजेच शुभ चिंतन.
हे काय शिकवतं?
आपल्या मनाची स्थिती केवळ संसाधनांवर नव्हे, तर दृष्टिकोनावर अवलंबून असते. भोग, चिंता, आणि सेवा – या तिन्ही मन:स्थिती आपल्या हातात आहेत.
2. हनुमानाचं रूप – प्रतीकात्मकतेचा अर्थ
हनुमानाचा रत्नहार फोडणे, चाटणे – ही गोष्ट अनेकदा लहान मुलांच्या कथा म्हणून सांगितली जाते, पण इथे तिचा अर्थ फार खोल आहे.
> “रत्नाच्या आत राम दिसतात का?”
हनुमानाचा हा दृष्टिकोन आहे – कोणतीही गोष्ट रामकार्यात उपयोगी पडते का हेच त्याचं अंतिम मूल्यांकनाचं कसोटीदंड.
बुद्धिमत्तेचं खरे रूप हे आहे – गोष्टींची उपयुक्तता आत्मकार्यासाठी ओळखणे.
त्यामुळे हनुमान मूर्ख नव्हे, तर ‘विवेकशील तपासक’ आहे. त्याचा हेतू आहे – वैभवात प्रभू दर्शन होतंय का?
हे काय शिकवतं?
प्रत्येक संसाधन, गोष्ट, संधी ही रामकार्यासाठी (म्हणजे जीवनमूल्यांसाठी) किती उपयुक्त आहे, हे तपासणं – हीच खरी बुद्धिमत्ता.
3. ईशदर्शन – जगात परमात्मा पाहणं
> “ज्याने डोळ्याच्या पुतळीत प्रभूला बसवलं आहे, त्याला सर्व ठिकाणी प्रभू दिसतो.”
ही भावना म्हणजे 'ईशदर्शन' – ती केवळ ध्यानधारणेची नाही, तर दृष्टिकोनाची स्थिती आहे.
कावळा असो किंवा कोकिळ – या दोघांतही सौंदर्य पहाणं, कारण ते दृष्टीवर अवलंबून आहे, दृश्यावर नव्हे.
‘दृश्य’ हे बदलतं, पण ‘दृष्टी’ जर प्रभूपूर्ण असेल, तर सर्वत्र सौंदर्य दिसतं.
या अवस्थेला आपण ‘साक्षात्कार’, ‘समत्व योग’ किंवा ‘पूर्ण ईश्वर दर्शन’ असंही म्हणू शकतो.
एकत्रित संदेश:
> “मनुष्याच्या व्यवहारात ईश्वराचा स्पर्श असला, तर त्याचं जीवन हे केवळ यशस्वीच नव्हे, तर पवित्र बनतं.”
Comments
Post a Comment