The path to self-realization
आत्मतत्व मिळवण्यासाठ भक्ती समजावली होती आणि ती देखील उच्च कोटीची भक्ती समजावली होती. त्याप्रमाणे उपनिषद समजावते आहे की संसारात राहून देखील आत्मज्ञान मिळवायचं असेल तर भक्तीच्या सोबतच शुद्ध आचरण, पवित्र आचरण, इंद्रियांचा उपशम, शुद्ध वर्तन करणारी इंद्रिये आणि समाहित चित्त म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि या सर्वांच्या सोबतच स्वतःच्या कह्यात असलेले समाधानी मन - इतक्या गोष्टी जीवनामध्ये मिळवल्या पाहिजेत. हे सर्व घडून आलं तर आत्मतत्व मिळवणं शक्य आहे, नाहीतर नाही. केवळ ज्ञानाने ते मिळवता येणे शक्य नाही. म्हणूनच आपल्या जुन्या काळच्या लोकांनी सांगून ठेवल आहे की, जर आत्मज्ञान मिळवायच असेल तर पहिल्यांदा तीर्थ स्नान करा. पण त्याच्यामुळे काय झालं की लोक तीर्थाटनाला जाऊन तिथे स्नान करायला लागले. आणि ते देखील रिटर्न तिकीट काढून घ्यायला लागले! परंतु जुन्या काळच्या लोकांनी जे तीर्थ स्नान करायला सांगितला आहे त्याचा अर्थच निराळा आहे. तीर्थस्नान करण्यासाठी अमुकच ठिकाणी जाण्याची गरज काय? आपल्या पूर्वजाने सप्ततिर्थात, सप्तकुंडात स्नान करा असं सांगितलं आहे. ती सप्ततिर्थ कोणती? ती स...