आत्मा + ईश्वर = आई

आई ही केवळ बालकाचीच नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे. आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे. 'मातृदेवो भव' असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे. जे हात पाळणे हलवतात ते हात जगावर शासन करतात. जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी; ही म्हण मात्र महिन्याचे गुणगान करते, माता हे प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे. स्वतः ओल्या जागेत झोपून मुलाला कोरड्या जागेत झोपविणाऱ्या आईच्या वाचल्याला जगात उपमा मिळणे कठीण आहे. आई म्हणजे सतत वाहणारा प्रेमाचा झरा! अधिक प्रमाणात महापुरुषांचे जीवन बनवण्यात त्यांच्या मातांनी अमूल्य सहयोग दिलेला आहे.
     
भारतीय संस्कृती अनेक वीर मातांनी विभोषित आहे. ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत नाव पडले, असा सिंहाचे तोंड फाडून त्याचे दात मोजण्याचे हिम्मत दाखवणारा सर्व दमान म्हणजेच भरत. त्याला जन्म देणारी त्याची जननी शकुंतला आजच्या दिवशी कशी विसरता येईल?
    
भगवान रामाला जन्म देण्याचे सौभाग्य जिल्हा लाभले एवढेच नाही तर जिने रामाला जीवनाकडे पाहण्याचे शुभदृष्टि दिली अशा 'शुभदर्शना' कौशल्य कडून प्रत्येक मातेने जीवनदर्शन प्राप्त करण्यासारखे आहे. तसेच स्वपुत्राला योग्य शिकवण देऊन सुयोग्य वयात त्याचा मित्र बनवून उभे राहणारे लक्ष्मण -जननी सुमित्राही वंदनीय आहे. अंजनी हनुमानाला जन्म देऊन कृतार्थ बनली. तिचे देखील आजच्या दिवशी स्मरण केले पाहिजे. लव-कुशासारख्या तेजस्वी बालकांना जन्म देणाऱ्या सीतेचे स्मरण करून प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला संदेश दिला पाहिजे.
    
महाभारत काळातही कोणतीने मातृपदाचा गौरव उज्वल केला आहे. अनंत अडचणींना तोंड देऊन त्यांना स्वतःच्या पुत्रांना मोठे केले. तिच्या तपश्चर्येमुळे तिच्या पुत्राचे जीवन उत्तम घडले गेले. तिचे पुत्र संकटांच्या तुफानांना कधी घाबरले नाहीत किंवा विघ्नांना वावटाळीने त्यांना कधी झुकवलं नाही. तिचा पुत्र अर्जुन तर तिच्या 'पृथा' नावावरून पार्थ म्हटला जात होता. अर्जुनाचाच पुत्र अभिमन्यू. त्याच्यात वीर रस भरणारी त्याची आई सुभद्रा देखील नमस्कार आहार आहे. अर्जुनाच्या अनुपस्थितीत संस्कृती रक्षणाच्या अटी-तटीच्या काळात, विचार न करता ज्याने जीवनाचे बलिदान करण्याचा निश्चय केला अशा ह्या अभिमन्यूचा आदर्श प्रत्येक मातेने स्वतःच्या बालकाला दाखवून दिला पाहिजे.
    
स्वतःच्या मातेनंतर राजपत्नी, गुरुपत्नी, भातृपत्नी तशीच पत्नी माता यांच्याकडेही मातृदृष्टीने पाहण्याचा आदेश आहे. राष्ट्रमाता किंवा संस्कृती मातेला ही आजच्या दिवशी आठवण त्यांच्या चरणावर शक्ती हवन करण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. या सर्व मातांमध्ये देवत्व पाहता पाहता शेवटी देव म्हणजे भगवानच आई जगदंबा वाटायला लागणे ही भक्तीची पराकाष्टा आहे. 'विठाई माऊली माझी' हे ज्ञानेश्वरांचे कथन किंवा 'क्षुधा तुषार्ता जननी स्मरणती' हे शंकराचार्यांचे वचन ह्या उन्नत अवस्थेची प्रतिती आणून देते. आई मध्ये भगवान पाहायचे सांस्कृतिक दृष्टीने सुरू करून भगवंतातच आई निरखण्याची अध्यात्मिक दृष्टी देणारा हा 'मातृदिनाचा' उत्सव आपण खऱ्या समजूतीने समाजात पुन्हा जिवंत केला पाहिजे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन