प्रत्येक वेळी कुशल पाहायला हवे.
कुशल पाहायला हवे
सामान्य माणसांना विचार केला ना तरी देखील त्याला समजेल की जीवनात दैव किती महत्त्वाचे आहे. गावातून दोरी व लोटा घेऊन मुंबईत सगळे करोडपती बनण्यासाठी आले. पण किती करोडपती झाले? पण जे करोडपती झाले त्यांना भागवत शक्तीने काही विशेष मदत केली म्हणून त्यांना हे फळ मिळाले. परंतु भगवंताला दुःख वाटू नये की मी त्याला सगळे दिले आणि हा काही करतच नाही.
संत तुकाराम महाराजांची मामेसासु एक वेळा त्यांना रस्त्यात दिसली. ती गाढवीच्या रूपात फिरत होती. तुकारामांना जेव्हा कळले की ही माझी मामेसासू आहे. तेव्हा तुकाराम म्हणाले. माझ्या रामा विसरलीस म्हणून गर्दभी झालीस| आता कैचे चोळी लुगडे सदा ढुंगण उघडे|| आता कैची पुरणपोळी सदा उकिरडे धुंडाळी| तुका म्हणे अहो मामी माझ्या रामा विसरला तुम्ही||
प्रभू रामचंद्राला विसरलास की माणसाची ही अशी अवदसा होते.
Comments
Post a Comment