बळीच्या राज्यात उद्धार अशक्य आहे
उद्धार अशक्य
तेजस्विता, दिव्यता, शांती आणि स्वास्थ्य इत्यादी गोष्टी निर्माण करण्यासाठी जे कार्य करायला हवे होते ते बळीने त्याच्या राज्यात केले नाही. बळीचे असे होते की मी जे म्हणतो तेच योग्य आहे. मला योग्य वाटेल तो धर्मच योग्य, अशा समजुतीने यज्ञ करणाऱ्या बलीलाही भगवंताने मारले आहे.
माणूस सत् च्या नावाने असत् आचरण करून भगवंताला फसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु भगवंताला फसवणे फार कठीण आहे. माणूस भले भगवंताला किंवा जगाला फसू देत परंतु माणूस स्वतःलाच फसवतो ते चालणार नाही. जो माणूस स्वतःला फसवतो त्याचा उद्धार शक्यच नाही. म्हणून जीवनात सत्यावर प्रेम ठेवा, त्याप्रमाणे आचरण ठेवा, आणि ते स्वाध्यायात शक्य आहे.
Comments
Post a Comment