अन्न – श्रम – यज्ञ (उपनिषदात्मक त्रिसूत्री)
उपनिषद मानवजीवनाकडे तुटक घटकांमधून पाहत नाहीत. ते जीवनाला यज्ञरूप प्रवाह मानतात. या प्रवाहात तीन तत्त्वे अविभाज्य आहेत—अन्न, श्रम आणि यज्ञ. आज आपण या तिन्ही गोष्टी वेगळ्या केल्या आहेत; उपनिषदांनी मात्र त्यांना एकच सत्य मानलं आहे. १. अन्न : अस्तित्वाचं मूळ उपनिषद सांगतात— अन्नाद्भवन्ति भूतानि. संपूर्ण सृष्टी अन्नावर उभी आहे. पण अन्न म्हणजे फक्त पोटभर भरण्याची वस्तू नाही. अन्न म्हणजे जीवनशक्तीचा स्थूल अवतार. अन्न नसेल तर देह नाही, देह नसेल तर श्रम नाही, आणि श्रम नसेल तर यज्ञ नाही. म्हणून अन्न ही केवळ वस्तू नाही; ते ब्रह्माचं पहिलं रूप आहे. २. श्रम : अन्नाचा प्रवाह चालू ठेवणारी शक्ती अन्न स्वतःहून निर्माण होत नाही. ते यज्ञातून उत्पन्न होतं— आणि यज्ञ श्रमांशिवाय घडत नाही. पण उपनिषद इथेच थांबत नाहीत. ते विचारतात—श्रम करणारा कोण? हात काम करतो, डोळे पाहतात, मेंदू विचार करतो— पण या सर्वांच्या मागे जो प्रेरक आहे, तो होता आहे. म्हणून श्रम हे मुळात देहाचे नसतात; ते आत्मशक्तीचे असतात. याच कारणामुळे श्रमाला मालकी देता येत नाही. जे आपलं नाही, त्याची किंमत कशी करणार? आजचा माणूस म्हणतो— “म...