मानवी जीवनात असलेले आध्यात्मिक वैभव.
अध्यात्मिक वैभव 'मी आहे' चे अध्यात्मिक वैभव आहे. खरोखरच हे भव्य वैभव आहे. आज आपल्या मागे 'मी विद्वान आहे' 'मी कंगाल आहे' 'मी श्रीमंत आहे' 'मी मोठा आहे' 'मी छोटा आहे' वगैरे विशेषणे लागतात. परंतु हे दिव्य वैभव नाही. दिव्य वैभव हे केवळ 'मी आहे' चे वैभव मानले जाते. रात्री आपण झोपलो होतो तेव्हा आपण श्रीमंत नव्हतो, गरीब नव्हतो, विद्वान नव्हतो, अविद्वान नव्हतो. त्यावेळी 'मी आहे' हीच भूमिका आपली असते. परंतु ही झोपेतल्या भूमिकेची गोष्ट झाली. मात्र जीवन- व्यवहारात अशीच भूमिका बाळगून जो जीवन जगत असेल त्याचे जीवन धन्य मानले जाते. वशिष्ठ, वाल्मिकी यांची जीवने धन्य मानली जातात. तत्र श्रीर्विजयो भूति हे यांच्या जीवनाचे वैभव आहे.