Posts

Showing posts from July, 2024

मानवी जीवनात असलेले आध्यात्मिक वैभव.

  अध्यात्मिक वैभव        'मी आहे' चे अध्यात्मिक वैभव आहे. खरोखरच हे भव्य वैभव आहे. आज आपल्या मागे        'मी विद्वान आहे' 'मी कंगाल आहे'        'मी श्रीमंत आहे' 'मी मोठा आहे'         'मी छोटा आहे'  वगैरे विशेषणे लागतात. परंतु हे दिव्य वैभव नाही. दिव्य वैभव हे केवळ 'मी आहे' चे वैभव मानले जाते. रात्री आपण झोपलो होतो तेव्हा आपण श्रीमंत नव्हतो, गरीब नव्हतो, विद्वान नव्हतो, अविद्वान नव्हतो. त्यावेळी 'मी आहे' हीच भूमिका आपली असते. परंतु ही झोपेतल्या भूमिकेची गोष्ट झाली. मात्र जीवन- व्यवहारात अशीच भूमिका बाळगून जो जीवन जगत असेल त्याचे जीवन धन्य मानले जाते. वशिष्ठ, वाल्मिकी यांची जीवने धन्य मानली जातात. तत्र श्रीर्विजयो भूति हे यांच्या जीवनाचे वैभव आहे.  

अध्यात्मिक वैभव

अध्यात्मिक वैभव 'मी आहे' चे अध्यात्मिक वैभव आहे. खरोखरच हे भव्य वैभव आहे. आज आपल्या मागे 'मी विद्वान आहे' 'मी कंगाल आहे' 'मी श्रीमंत आहे' 'मी मोठा आहे' 'मी छोटा आहे' वगैरे विशेषणे लागतात. परंतु हे दिव्य वैभव नाही. दिव्य वैभव हे केवळ 'मी आहे' चे वैभव मानले जाते. रात्री आपण झोपलो होतो तेव्हा आपण श्रीमंत नव्हतो, गरीब नव्हतो, विद्वान नव्हतो, अविद्वान नव्हतो. त्यावेळी 'मी आहे' हीच भूमिका आपली असते. परंतु ही झोपेतल्या भूमिकेची गोष्ट झाली. मात्र जीवन- व्यवहारात अशीच भूमिका बाळगून जो जीवन जगत असेल त्याचे जीवन धन्य मानले जाते. वशिष्ठ, वाल्मिकी यांची जीवने धन्य मानली जातात. तत्र श्रीर्विजयो भूति हे यांच्या जीवनाचे वैभव आहे.  

जीवनात वैभव कशाचे असावे ?

  भूत्य न प्रमदितव्याम्|   भूत म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्य वाढवण्यासाठी, वैभव वाढवण्यासाठी माणसाने प्रमाद करता कामा नये. वैभव वाढवायचं म्हणजे कोणते वैभव वाढवायचे? पैशाचे वैभव, बुद्धीचे वैभव की लोक मान देतील, हार घालतील ते प्रतिष्ठेचे वैभव? वस्तूत: हे जीवनाचे वैभव नाही. बँकेच्या खात्यात पाच लाख रुपये पडले असतील त्याचा जीवनाच्या वैभवाशी काय संबंध?         जीवनाचे वैभव म्हणजे,  (१) 'मी आहे' चे आध्यात्मिक वैभव  (२) मी वैभव 'मी प्रभुचा आहे' हे भक्तीचे वैभव आणि   (३) 'मी कोणत्यातरी निश्चित ध्येयाच आहे' हे दैवी वैभव.  ही तीन वैभवी जीवनात मिळून वैभव संपन्न बनायचा आचार्यांचा आदेश आहे. ज्यांच्या जीवनात हे वैभव दिसत नाही त्यांचे जीवन फुकट गेले- अशा लोकांसाठी भगवंताने गीतेत म्हटले आहे- मोघं पार्थ स: जीवती|    

करन्सी - अर्थव्यवस्था चालवण्यासाठी असलेले चलन.

करन्सी जिथे जायचे आहे ज्या देशात तिकडची करन्सी घेऊनच जावे लागते! आज आपल्याला दुसऱ्या देशात जायचे असेल तर तिथली करन्सी असणे आवश्यक आहे. इथली करन्सी तिथे चालत नाही. त्याचप्रमाणे आपल्या इथल्या कामांना सत्कार्मात, पुण्यकर्मात बदलले पाहिजे, ट्रान्सफर केले पाहिजे.          ज्या देशात जातो त्या देशाची करन्सी आपल्या जवळ असली पाहिजे. इथल्या बँकेत तुमचे करोडो रुपये असतील पण तिकडची करन्सी नसेल तर काही उपयोग होत नाही. तिकडच्या करन्सीत ते एक्सचेंज व्हायला हवेत, बदलायला हवेत. आणि एक्सचेंजची सूट कोणाला मिळते? जो तिकडच्या शेठजीचे काम करतो त्यांना एक्सचेंज मिळते. भगवंताकडे तर केवळ आपण केलेल्या कर्माचे गाठोडेच बरोबर येणार आहे.                  धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे          भार्या गृहव्दारि जन:श्मशाने |          देहश्चितायां परलोकमार्गे           कर्मानुगो गच्छति जीव एक:||        इकडच्या करोडपतीला देखील सगळी संपत्ती इथेच ठेवून जावे ला...