वाणीतील प्रज्ञा
तो मौनात होता – पण त्याचं मौन म्हणजे शून्य नव्हे, ते होतं गर्भित वचन – ज्यात शब्द जन्म घेतात. त्याच्या वाणीला वलय होतं ज्याला कोणतीही भाषा कुंठित करत नव्हती, कारण ती जिथून येत होती तो स्रोत होता प्रज्ञेचा अग्निकुंड. तो जे बोलत होता, ते केवळ ऐकण्यासाठी नव्हतं, ते जगण्यासाठी होतं – ते ऐकताना काळ गप्प बसायचा. त्याच्या ओठांवरून झरझर वाहायचं शुद्धतेचं अमृत – श्रुतीप्रमाणे प्रकट होतं जे, ते त्याच्याच अंतरातून उमटायचं. वाणी ही साधन असते, प्रज्ञा हे साध्य – पण जेव्हा वाणीच प्रज्ञेची वाहिका होते, तेव्हा ती तेज बनते, मुक्तीचं द्वार उघडते.
त्याचं बोलणं म्हणजे मंत्र नव्हे, ते एक दीर्घ प्रार्थना होती – जी आपल्याला स्वतःकडे नेणारी होती. आणि म्हणूनच, तो जेव्हा बोलायचा तेव्हा आपलं मौन जागं व्हायचं.
तो कुठे जात नसे, पण जिथे जाई, तिथे ओरखडे उमटायचे – काळजावर, भूमीवर, आणि मूढतेच्या पडद्यावर. त्याच्या अस्तित्वाचं अग्निचिन्ह दिसायचं फक्त संवेदनशीलांना, बाकींच्या दृष्टिला ते आग, धोका, भीती वाटायचं.
पण ज्यांनी हृदयाचं ओलं गवत केलं होतं, त्यांच्यासाठी तो अग्निचिन्ह झालं होतं – प्रकाशाचं स्त्रोत, अन्यायाचा अंत, आणि ध्येयाचा स्पष्ट आरसा. ते चिन्ह न जाळतं, ते स्वरूप बदलतं. ते नष्ट करत नाही, तर मूल्यांची राखेतून फुलवणं शिकवतं.
भूदेव कोणत्याही वास्तूमध्ये नसायचा, पण त्याचं अग्निचिन्ह दगडावर कोरल्यासारखं माणसाच्या अंतःकरणात उठायचं. संकटे आली की
लोक त्याच्या स्मरणाने उजळायचे, कारण त्याचं अग्निचिन्ह कधीही विझत नव्हतं – ते आंतरिक अग्निपर्व होतं, होतभूदेव कुठे बसतो? ना सिंहासनावर, ना सभागृहात तो बसतो तपस्वी वलयात, जिथे शब्द मौनात विरघळतात.
ते वलय काढलेलं नसतं रेतीत, ना विटा-मातीच्या रचनेत- ते असतं एक ओतप्रोत ज्वाळेचं वर्तुळ,
जिथे वासना राख होते आणि विवेक चेतवतो.
या वलयात प्रवेशासाठी पात्रतेचं प्रमाणपत्र लागत नाही— लागतो तपाचा झरा, जो अंतःकरणातून वाहतो. त्याच्या वलयात बसलेल्याचं हसूही व्रतानिष्ठ वाटायचं, आणि शांतताही धगधगत्या यज्ञासमान.
या वलयातून ना कोणी ओरडून निघालं, ना कोणी उठून अभिमानाने गेलं— कारण इथे असणं म्हणजे
स्वतःची राख झालेली पाहणं. भूदेवाचं हे वलय
कधी झोपत नाही, ते जागं राहतं साधकाच्या अंतरात, एक अनुभवाचं तपवलेलं वर्तुळ होऊन.
Comments
Post a Comment