शब्दांपलीकडचं मौन
(मनाचा एक तास – भाग २) कधी जाणवलं आहे का – की आपण खूप बोलतो, खूप ऐकतो, खूप प्रतिक्रिया देतो… पण त्यात काहीतरी हरवलेलं असतं? बोलणं संपल्यावर, संवाद थांबल्यावर, सगळं शांत झाल्यावर – एक वेगळी जागा उघडते. ती जागा असते शब्दांपलीकडची. तिथे नुसतं मौन असतं. आणि हे मौन म्हणजे केवळ आवाजाचा अभाव नाही, तर ते एक अंतर्नाद असतो – स्वतःशी होणाऱ्या संवादाचा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपलं अंतर्मन कोलाहलात हरवतं. बोलणं चालूच राहतं – इतरांशी, स्वतःशी, परिस्थितीशी. पण कधी बोलणं थांबवलं की, लक्षात येतं की खरं ऐकणं तर आता सुरू होतंय! म्हणूनच "मनाचा एक तास" माझ्यासाठी केवळ एक वेळ नाही, तर एक शांततेचा दरवाजा आहे. या वेळात मी मौनात जातो. कोणत्याही गोष्टीचा निषेध नाही, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. फक्त अस्तित्वाचं निव्वळ भान. शब्द अपुरे पडतात जेव्हा आत्मा बोलतो. शब्द थांबले की आत्म्याचं खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणवतं. मौन हे काही ‘पळवाट’ नाही. ते एक ‘पलटवाट’ आहे. जिथे आपण स्वतःकडे वळतो. स्वतःच्या श्वासांची जाणीव होते. डोळ्यांत साठलेलं पाणी नकळत वाहून जातं. विचारांची गर्दी कमी होते, आणि...