Posts

Showing posts from May, 2025

शब्दांपलीकडचं मौन

Image
(मनाचा एक तास – भाग २) कधी जाणवलं आहे का – की आपण खूप बोलतो, खूप ऐकतो, खूप प्रतिक्रिया देतो… पण त्यात काहीतरी हरवलेलं असतं? बोलणं संपल्यावर, संवाद थांबल्यावर, सगळं शांत झाल्यावर – एक वेगळी जागा उघडते. ती जागा असते शब्दांपलीकडची. तिथे नुसतं मौन असतं. आणि हे मौन म्हणजे केवळ आवाजाचा अभाव नाही, तर ते एक अंतर्नाद असतो – स्वतःशी होणाऱ्या संवादाचा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपलं अंतर्मन कोलाहलात हरवतं. बोलणं चालूच राहतं – इतरांशी, स्वतःशी, परिस्थितीशी. पण कधी बोलणं थांबवलं की, लक्षात येतं की खरं ऐकणं तर आता सुरू होतंय! म्हणूनच "मनाचा एक तास" माझ्यासाठी केवळ एक वेळ नाही, तर एक शांततेचा दरवाजा आहे. या वेळात मी मौनात जातो. कोणत्याही गोष्टीचा निषेध नाही, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही. फक्त अस्तित्वाचं निव्वळ भान. शब्द अपुरे पडतात जेव्हा आत्मा बोलतो. शब्द थांबले की आत्म्याचं खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणवतं. मौन हे काही ‘पळवाट’ नाही. ते एक ‘पलटवाट’ आहे. जिथे आपण स्वतःकडे वळतो. स्वतःच्या श्वासांची जाणीव होते. डोळ्यांत साठलेलं पाणी नकळत वाहून जातं. विचारांची गर्दी कमी होते, आणि...

मनाचा एक तास

Image
कधीतरी मनात असं वाटतं – की एखाद्या मोकळ्या जागेत उभं राहावं आणि पूर्ण ताणतणाव झुगारून एक जोरदार आरोळी ठोकावी… “या जगात सौंदर्याचा, सत्याचा, प्रेमाचा, भावनांचा आणि स्वतंत्र विचारांचा जयजयकार होवो!” अशी आरोळी ठोकण्याची गरज असते, इच्छा असते. मनाला ही परवानगी दिली पाहिजे. आपण रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत अडकलेलो असतो. सत्य गिळावं लागतं, सौंदर्याची उपेक्षा होते, प्रेमाला तडफडत ठेवलं जातं, आणि भावनांवर व्यवहाराची जळती ओढलेली असते. त्या सगळ्यापासून एक तासासाठी तरी बाजूला व्हावं... स्वतःसाठी. म्हणूनच मी माझ्या जीवनात एक मैदान राखलं आहे — रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा. हा वेळ केवळ माझा असतो. या एका तासात मी कोणाचंही ऐकत नाही, कोणासाठी काही करत नाही, कोणत्याही कामाच्या ओझ्याखाली वाकत नाही. हा वेळ म्हणजे माझी स्वतःवरची एक हक्काची "रजा". संसाराची, व्यवहाराची, जबाबदाऱ्यांची सुट्टी. ही वेळ आहे – आत्म्याला श्वास घेण्याची. माझ्यासाठी हा काळ स्वाध्यायाचा आहे. पुस्तकांच्या पानात, मौनाच्या नजरेत, मनाच्या गाभ्यात डोकावण्याची ही वेळ. इथे मी कोणालाही सिद्ध करायचं नसतं – मी फक्त स्वतःल...

‘स्वातंत्र्याची ही आरोळी’

                मी कधीतरी मोकळेपणी उभे राहून अशी आरोळी ठोकली पाहिजे की, 'या जगात सौंदर्याचा, सत्याचा, भावनांचा, प्रेमाचा आणि स्वतंत्र विचारांचा जयजयकार होवो.' विजय होवो अशा प्रकारे बोलण्याने मन मोकळं होतं, अशी आरोळी ठोकावी असं मनापासून वाटलं पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मनापासून वाटतं तेव्हा व्यवहारापासून थोडं दूर जाण्यासाठी आणि आरोळी ठोकण्यासाठी तुमच्याकडे मैदान कुठलं आहे?      त्याच्यासाठीच सांगितला आहे की, मृत्यू प्रोक्तं सनातनम्... हा ब्रह्मलोक म्हणजे  इहलोकांमधून जेव्हा थोड्यावेळासाठी सुट्टी घेता येते, तेव्हा त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताही नाही. आपल्याला अशी सुट्टी घेता येत नाही. मात्र रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा हा सुट्टीचा वेळ आहे आणि या वेळेमध्ये दुसरे काम करीत बसायचं नाही की काही कोणासाठी काम करीत बसण्याची वेळ नाही. त्याचप्रमाणे स्वाध्यायात आल्याने फार काही ऐकायला मिळतं म्हणून या असं पण सांगण्याची ही वेळ नाही. ही एक स्व: ची आवश्यकता आहे की, रविवारी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत कोणताही व्यवहार नाही.  ...